शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

व्होडाफोनचे १०५६ कोटींचे रोखलेले प्राप्तिकर परतावे लगेच चुकते करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 06:42 IST

व्होडाफोन इंडिया लि. या कंपनीचे मंजूर होऊनही विविध कारणांसाठी रोखून ठेवलेले गेल्या ११ करनिर्धारण वर्षांसाठीचे एकूण सुमारे १,०५६ कोटी रुपयांच्या परताव्यांची रक्कम प्राप्तिकर विभागाने कंपनीला व्याजासह लगेच चुकती करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

विशेष प्रतिनिधी मुंबई: व्होडाफोन इंडिया लि. या कंपनीचे मंजूर होऊनही विविध कारणांसाठी रोखून ठेवलेले गेल्या ११ करनिर्धारण वर्षांसाठीचे एकूण सुमारे १,०५६ कोटी रुपयांच्या परताव्यांची रक्कम प्राप्तिकर विभागाने कंपनीला व्याजासह लगेच चुकती करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

सन २०१३-१४ ते २०१३-१४ करनिर्धारण काळासाठीचा ४३ कोटी रु., २०१५-१६ या वर्षासाठी १५४ कोटी रुपये, २०१७-१८ या वर्षासाठी ६३४ कोटी रु व २०८-१९ या वर्षासाठी २२४ कोटी रु. असे हे परतावे आहेत. कंपनीने संबंधित वर्षांसाठी दाखल केलेल्या प्राप्तिकर रिटर्नची रीतसर छाननी व करनिर्धारण करून प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी एवढ्या रकमांचे परतावे मंजूर केले होते. मात्र विभागाने निरनिराळी कारणे पुढे करून या परताव्यांची रक्कम कंपनीला प्रत्यक्षात चुकती केली नाही. याविरुद्ध कंपनीने केलेल्या एकूण चार रिट याचिका मंजूर करून न्या. अकिल कुरेशी व न्या. एस. जे. काथावाला यांच्या खंडपीठाने परताव्यांची रक्कम ठराविक मुदतीत व्याजासह चुकती करण्याचे आदेश दिले. हे निकाल ४ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या काळात स्वतंत्रपणे गेले. काही परतावे चुकते करण्यासाठी तीन तर काही परताव्यांसाठी दोन आठवड्यांची मुदत दिली गेली.

यापैकी २००७-०८ ते २०१३-१४ या वर्षांचा ४३ कोटी रुपयांचा देय असलेल्या परतावा दुसºया कुठल्या तरी वर्षातील करापोटी ४९ लाख रुपये वळते करून घेण्याच्या नावाखाली प्राप्तिकर विभागाने थांबविला होता. परतावा रोखून ठेवण्याचे हे कारण न्यायालयाने बंकायदा व असमर्थनीय ठरविले.सन २०१५-१६ व २०-१७-१८ चे एकूण ७८८ कोटी रुपयांचे कर परतावे सन २०१७मध्ये नव्याने घालण्यात आलेल्या प्राप्तिकर कायद्याच्या कलम २४१-ए चा आधार घेऊन दिले गेले नव्हते. त्यानुसार परताव्याचा आदेश झाला असला तरी, संबंधित वर्षातील कर निर्धारणाची रक्कम काही कारणांनी वाढण्याची शक्यता असेल तर, संभाव्य महसूल हातचा जाऊ नये यासाठी, कर निर्धारण अधिकारी, वरिष्ठांच्या संमतीने, तो परतावा रोखून ठेवू शकतो.

न्यायालयाने म्हटले की, या अधिकाराबद्दल दुमत नाही. परंतु प्रस्तूत प्रकरणात त्याचा गैरवापर झाला आहे. याच कारण असे की, या प्रकरणात कोणाही कर निर्धारण अधिकाºयाने वरिष्ठांच्या संमतीने हा आदेश दिलेला नाही. बंगळुरु येथील ‘सीपीसी’मध्ये प्राप्तिकर रिटर्नचीे संगणकीय पद्धतीने छाननी झाल्यानंतर हा करदात्याला पाठविला गेलेल्या ‘आॅटो जनरेटेड’ संदेश आहे. कायद्यास अशा प्रकारचे करनिर्धारण अपेक्षित नाही. सन १९१८-१९ चा परतावा न दिला जाण्यासाठी ‘सीपीसी’मधील संगणकीय यंत्रणेतील काही तांत्रिक अडचणींची सबब दिली गेली होती. ती अमान्य करून न्यायालयाने म्हटले की, एकदा सक्षम अधिकाºयाने ‘रिफंड आॅर्डर’ काढल्यानंतर त्यानुसार परतावा देणे कोणत्याही परिस्थितीत प्राप्तिकर विभागावर बंधनकारक आहे. परतावा न देण्यास संगणकीय यंत्रणेतील तांत्रिक अडचणी ही सबब सांगितली जाऊ शकत नाही. जी रक्कम वळती करायची होती ती या परताव्यातून करता येणार नाही, हे तसेच तांत्रिक अडचण माहित झाल्यावर संगणकीय व्यवस्थेवर विसंबून न राहता संबंधितांनी ‘मॅन्युअल’ पद्धतीने परातावा द्यायला हवा होता.

इतर प्रकरणांतही लक्ष घाला

न्यायालयाने म्हटले की, ज्या तांत्रिक अडचणीमुळे या कंपनीचा परतावा खोळंबून राहिला होता तसेच इतरही अनेकांच्या बाबतीतही झाले असण्याची शक्यता आहे. अशा करदात्यांना कोर्टात यायला न लावता प्राप्तिकर विभागाने स्वत: अशा प्रकरणात लक्ष घालून ती मार्गी लावावीत.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIncome Taxइन्कम टॅक्स