शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नजर हटी, दुर्घटना घटी! सरकारची वॉर्निंग, एका कोडने हॅक होईल फोन; 'ही' चूक पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 12:03 IST

गृह मंत्रालयाकडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा इशारा एका सायबर क्राईमबद्दल आहे, जो लोकांचं बँक अकाऊंट गुपचूपपणे रिकामं करत आहे.

सायबर फसवणुकीची रोज नवनवीन प्रकरणे वाचायला आणि ऐकायला मिळत आहेत. अशा फसवणुकीपासून सर्वसामान्य भारतीयांना वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा इशारा एका सायबर क्राईमबद्दल आहे, जो लोकांचं बँक अकाऊंट गुपचूपपणे रिकामं करत आहे. 

MHA च्या सायबर शाखेने सायबर क्रिमिनलची लेटेस्ट पद्धत पकडली आहे. सर्वसामान्यांना याची माहितीही नसते आणि त्यांचा बँक अकाऊंट बॅलेन्स अचानक शून्य होतो. यामध्ये हॅकर्स तुम्हाला हॅकिंगपासून मुक्त करण्याचं आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात सायबर क्राईमची ही सुरुवात असते.

MHA ने सुचविलेल्या या पद्धतीमध्ये स्कॅमर्स सामान्य लोकांना कॉल करतात. मंत्रालयाने म्हटलं आहे की, जर कोणी म्हणत असेल की तुमचा फोन हॅक झाला आहे, तर आता फोन बंद केला जाईल आणि डायल करा *401#9818×××××6 (अनोळखी नंबर), तर सावध राहा. असं करणं तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

स्मार्टफोन युजर्सनी *401# डायल केल्यानंतर एखाद्याचा कॉन्टॅक्ट नंबर डायल केला तर तुमचे सर्व मेसेज आणि कॉल्स तुम्ही डायल केलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर जाण्यास सुरुवात होईल.

स्कॅमर्सना एकदा OTP (वन टाइम पासवर्ड) चा एक्सेस मिळाला की, ते तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम देखील काढून टाकू शकतात. सायबर क्रिमिनल्स किंवा हॅकर्स देखील याच्या मदतीने तुमचे सीक्रेट्स कॉल ऐकू शकतात.

तुम्ही अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीला बळी पडल्यास, त्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करू शकता. यानंतर, तुमच्यासोबत घडलेली घटना सांगितल्यावर ते या संदर्भात मदत करतील. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँकMONEYपैसा