शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Jio युझर्ससाठी बॅड न्यूज! 'हे' चार किफायतशीर प्रीपेड प्लान बंद

By देवेश फडके | Updated: January 17, 2021 15:23 IST

Reliance Jio ने जिओ फोनचे चार प्लान बंद केले आहेत. हे प्लान विशेष करून नॉन-जिओ व्हॉइस कॉलसाठी उपयुक्त असे मानले जात होते.

ठळक मुद्देजिओफोनचे चार प्रीपेड प्लान बंदजिओकडून ७५ रुपये, १२५ रुपये, १५५ रुपये आणि १८५ रुपयांचे प्लान उपलब्धजिओ फोनचे ९९ रुपये, १५३ रुपये, २९७ रुपये आणि ५९४ रुपये असे प्लान बंद

नवी दिल्ली : Reliance Jio ने जिओ फोनचे चार प्लान बंद केले आहेत. हे प्लान विशेष करून नॉन-जिओ व्हॉइस कॉलसाठी उपयुक्त असे मानले जात होते. Jio कडून बंद करण्यात आलेले चारही प्लान अगदी किफायशीर होते. हे प्लान बंद झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असे बोलले जात आहे. 

जिओ फोनचे ९९ रुपये, १५३ रुपये, २९७ रुपये आणि ५९४ रुपये असे प्लान आता बंद करण्यात आले आहेत. जिओ फोन ऑल इन वन प्लान्सप्रमाणे यामध्ये नॉन-जिओ मिनिट्स देण्यात आले नव्हते, असे सांगितले जात आहे. या सेगमेंटमध्ये आता जिओकडे ७५ रुपये, १२५ रुपये, १५५ रुपये आणि १८५ रुपयांचे प्लान आहेत. ९९ रुपये, १५३ रुपये, २९७ रुपये आणि ५९४ रुपये या प्लानची वैधता अनुक्रमे २८ दिवस, ८४ दिवस आणि १६८ दिवस होती. तसेच यातील तीन प्लानमध्ये जिओ टू जिओ आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आता हे प्रीपेड प्लान बंद करण्यात आले आहेत. 

Jio कडून आता ७५ रुपये, १२५ रुपये, १५५ रुपये आणि १८५ रुपयांचे प्लान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ७५ रुपयांच्या प्लानमध्ये युझर्सना देशातील कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एमबी डेटा आणि ५० एसएमएस ऑफर केले जात आहेत. १२५ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज ५०० एमबी डेटा आणि ३०० एसएमएस ऑफर केले जात आहे. 

Jio च्या १५५ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत. तर, १८५ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जात आहेत. या सर्व प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइल