शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दिवाळीच्या निमित्ताने 5G Phone विकत घेताय? मग त्याआधी हे वाचा  

By सिद्धेश जाधव | Updated: October 29, 2021 18:24 IST

5G Phones In India: टेलिकॉम कंपन्यांच्या 5G चाचण्यांना हवे तसे यश मिळत नाही. परंतु 5G च्या लाटेवर स्वार होऊन अनेकांनी 5G Phone विकत घेतले आहेत. तसेच नवीन फोन घेताना लोक 5G आहे ना? हे विचारत आहेत.  

सध्या भारतीय स्मार्टफोन बाजारात 5G Phones ची लाट आली आहे. याची सुरुवात यावर्षीच्या सुरुवातीपासून झाली आहे. 2021 च्या अखेरपर्यंत Smartphone निर्माण करणात्या कंपन्या तसेच Telecom कंपन्यांनी या लाटेला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक देखील 5G Network ची उत्सुकतेने वाट बघत आहे. येणाऱ्या वेगवान भविष्यासाठी तयार होण्यासाठी अनेकांनी 5G Phone विकत घेतले आहेत. परंतु या फोन्समधील 5G फिचर आता तर निरुपयोगी आहे परंतु 2022 मध्ये देखील देशात 5G येणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.  

5G नेटवर्क लांबणीवर  

भारतात 5G लवकर येईल असे वाटत नाही. टेलिकॉम कंपन्यांना 5G चाचण्यांमध्ये हवे तसे यश मिळत नाही. त्यामुळे टेलीकॉम कंपन्यांनी भारत सरकारकडे 5G Trials पूर्ण करण्यासाठी अजून एक वर्षाची मुदत मागितली आहे. यात Reliance Jio, Bharti Airtel आणि Vodafone Idea या तिन्ही प्रमुख भारतीय टेलिकॉम कंपन्यांचा समावेश आहे. म्हणजे आता देशात 5G ची एंट्री पुढील वर्षाच्या अखेर पर्यंत तरी होणार नाही असे वाटत आहे. कारण चाचण्या यशस्वी झाल्यानंतर देखील संपूर्ण देशात 5G नेटवर्क पोहोचण्यास काही वर्ष लागू शकतात.  

आता 5G Phone विकत घ्यावे का? 

देशातीलप्रमुख स्मार्टफोन कंपन्या लागोपाठ 5G स्मार्टफोन्स सादर करत आहेत. कमी किंमतीत 5G फोन आणण्याच्या नादात कंपन्या स्मार्टफोन्समधील इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सशी तडजोड करत आहेत. 5G फोन आहे म्हणून तो 4G फोन पेक्षा वेगवान असेल असा समज करून घेऊ नका. या कंपन्या अगदी बजेट सेगमेंटमध्ये देखील 5G फोन लाँच करत आहेत. त्यात 5G चे कारण देऊन इतर कंपोनंट्समध्ये कॉस्ट कटिंग करत आहेत. असे 5G Phone भारतात 5G येण्याआधी जीव सोडू शकतात. त्यामुळे जो प्रीमियम 5G च्या नावाने घेतला जात आहे त्यात तुम्ही एक चांगला 4जी फोन विकत घेऊ शकता.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन