शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मोबाइल तुमची स्मरणशक्ती कुरतडतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 08:42 IST

हे यंत्र कितीही जादुई असेल तरीसुद्धा प्रत्यक्ष भेटणारी माणसं याची भरपाई ते करू शकत नाही.

माणसं आणि मोबाइल लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपल्या सर्वांना सध्या गॅझेट्सची – विशेषत: मोबाइल फोनची अतिशय सवय लागलेली आहे. ‘आपण बरं आणि आपला मोबाइल बरा’ कारण आपलं सर्व काम मोबाइलद्वारे होतं. लहान मुलांना अभ्यास करायचा असेल तरीसुद्धा ते या मोबाइलद्वारे अभ्यास करतात. आपण एकमेकांशी गप्पा मारतो ते सुद्धा या मोबाइलद्वाराच. अशा प्रकारे गेल्या काही वर्षांत आपण एकमेकांवर, घरातल्या इतर माणसांवर, मित्र-मैत्रिणींवर, नातेवाइकांवर अवलंबून राहण्यापेक्षा या मोबाइलवर अवलंबून राहायला लागलेलो आहोत. आणि त्यामुळे काहीसे एकलकोंडेसुद्धा झालेले आहोत.

अशा प्रकारे हे यंत्र कितीही जादुई असेल तरीसुद्धा प्रत्यक्ष भेटणारी माणसं याची भरपाई ते करू शकत नाही. मात्र असं दिसतंय की मोबाइलची सवय आपल्यापैकी बहुतेकांना लागून गेलेली आहे. याचे दुष्परिणाम तर असंख्य आहेतच; परंतु सध्या जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार लहान मुलं एकाच यंत्रावर अवलंबून राहत आहेत, त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत.

या एका गोष्टीमुळे जी कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित व्हायला हवी, ती होत नाहीत. यातली एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे लहान मुलांच्या संदर्भात प्रश्न आहेत, त्यांचं सामाजिकीकरण योग्य पद्धतीने होत नाही. एकाग्रता, स्मरणशक्तीवर परिणाम होतो, भाषिक कौशल्यांच्या बाबतीत मुलं मागे पडतात. पण, अशा पद्धतीचे परिणाम सर्व वयोगटाच्या लोकांवर कमी जास्त प्रमाणात होत आहेत. काही काम केलं नाही तर स्मरणशक्ती टिकून कशी राहणार? कोणाचे फोन नंबर्स पूर्वीसारखे लक्षात नसतात, ही त्यातली ठळक गोष्ट. पण इतरांशी मारलेल्या गप्पा, एकत्र मिळून केलेली कोणत्याही प्रकारची कामं, एकत्र मिळून ठरवलेल्या योजना आणि त्या पार पाडणं, वेगवेगळ्या व्यक्तींकडून काही गोष्टी समजून घेणं, त्यांना काही गोष्टी सांगणं या सगळ्यातून जे काही सामाजिक अभिसरण होतं ते मेंदूमध्ये सकारात्मक परिणाम घडवून आणतं. म्हणूनच ही धोक्याची सूचना आहे. मेंदू जागता - चालता फिरता ठेवायला हवा. त्यासाठी एकलकोंडेपणा योग्य नाही आणि माणसांना पर्याय नाही.