शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

मोबाइल तुमची स्मरणशक्ती कुरतडतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 08:42 IST

हे यंत्र कितीही जादुई असेल तरीसुद्धा प्रत्यक्ष भेटणारी माणसं याची भरपाई ते करू शकत नाही.

माणसं आणि मोबाइल लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपल्या सर्वांना सध्या गॅझेट्सची – विशेषत: मोबाइल फोनची अतिशय सवय लागलेली आहे. ‘आपण बरं आणि आपला मोबाइल बरा’ कारण आपलं सर्व काम मोबाइलद्वारे होतं. लहान मुलांना अभ्यास करायचा असेल तरीसुद्धा ते या मोबाइलद्वारे अभ्यास करतात. आपण एकमेकांशी गप्पा मारतो ते सुद्धा या मोबाइलद्वाराच. अशा प्रकारे गेल्या काही वर्षांत आपण एकमेकांवर, घरातल्या इतर माणसांवर, मित्र-मैत्रिणींवर, नातेवाइकांवर अवलंबून राहण्यापेक्षा या मोबाइलवर अवलंबून राहायला लागलेलो आहोत. आणि त्यामुळे काहीसे एकलकोंडेसुद्धा झालेले आहोत.

अशा प्रकारे हे यंत्र कितीही जादुई असेल तरीसुद्धा प्रत्यक्ष भेटणारी माणसं याची भरपाई ते करू शकत नाही. मात्र असं दिसतंय की मोबाइलची सवय आपल्यापैकी बहुतेकांना लागून गेलेली आहे. याचे दुष्परिणाम तर असंख्य आहेतच; परंतु सध्या जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार लहान मुलं एकाच यंत्रावर अवलंबून राहत आहेत, त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत.

या एका गोष्टीमुळे जी कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित व्हायला हवी, ती होत नाहीत. यातली एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे लहान मुलांच्या संदर्भात प्रश्न आहेत, त्यांचं सामाजिकीकरण योग्य पद्धतीने होत नाही. एकाग्रता, स्मरणशक्तीवर परिणाम होतो, भाषिक कौशल्यांच्या बाबतीत मुलं मागे पडतात. पण, अशा पद्धतीचे परिणाम सर्व वयोगटाच्या लोकांवर कमी जास्त प्रमाणात होत आहेत. काही काम केलं नाही तर स्मरणशक्ती टिकून कशी राहणार? कोणाचे फोन नंबर्स पूर्वीसारखे लक्षात नसतात, ही त्यातली ठळक गोष्ट. पण इतरांशी मारलेल्या गप्पा, एकत्र मिळून केलेली कोणत्याही प्रकारची कामं, एकत्र मिळून ठरवलेल्या योजना आणि त्या पार पाडणं, वेगवेगळ्या व्यक्तींकडून काही गोष्टी समजून घेणं, त्यांना काही गोष्टी सांगणं या सगळ्यातून जे काही सामाजिक अभिसरण होतं ते मेंदूमध्ये सकारात्मक परिणाम घडवून आणतं. म्हणूनच ही धोक्याची सूचना आहे. मेंदू जागता - चालता फिरता ठेवायला हवा. त्यासाठी एकलकोंडेपणा योग्य नाही आणि माणसांना पर्याय नाही.