शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मोबाइल तुमची स्मरणशक्ती कुरतडतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 08:42 IST

हे यंत्र कितीही जादुई असेल तरीसुद्धा प्रत्यक्ष भेटणारी माणसं याची भरपाई ते करू शकत नाही.

माणसं आणि मोबाइल लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपल्या सर्वांना सध्या गॅझेट्सची – विशेषत: मोबाइल फोनची अतिशय सवय लागलेली आहे. ‘आपण बरं आणि आपला मोबाइल बरा’ कारण आपलं सर्व काम मोबाइलद्वारे होतं. लहान मुलांना अभ्यास करायचा असेल तरीसुद्धा ते या मोबाइलद्वारे अभ्यास करतात. आपण एकमेकांशी गप्पा मारतो ते सुद्धा या मोबाइलद्वाराच. अशा प्रकारे गेल्या काही वर्षांत आपण एकमेकांवर, घरातल्या इतर माणसांवर, मित्र-मैत्रिणींवर, नातेवाइकांवर अवलंबून राहण्यापेक्षा या मोबाइलवर अवलंबून राहायला लागलेलो आहोत. आणि त्यामुळे काहीसे एकलकोंडेसुद्धा झालेले आहोत.

अशा प्रकारे हे यंत्र कितीही जादुई असेल तरीसुद्धा प्रत्यक्ष भेटणारी माणसं याची भरपाई ते करू शकत नाही. मात्र असं दिसतंय की मोबाइलची सवय आपल्यापैकी बहुतेकांना लागून गेलेली आहे. याचे दुष्परिणाम तर असंख्य आहेतच; परंतु सध्या जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार लहान मुलं एकाच यंत्रावर अवलंबून राहत आहेत, त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत.

या एका गोष्टीमुळे जी कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित व्हायला हवी, ती होत नाहीत. यातली एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे लहान मुलांच्या संदर्भात प्रश्न आहेत, त्यांचं सामाजिकीकरण योग्य पद्धतीने होत नाही. एकाग्रता, स्मरणशक्तीवर परिणाम होतो, भाषिक कौशल्यांच्या बाबतीत मुलं मागे पडतात. पण, अशा पद्धतीचे परिणाम सर्व वयोगटाच्या लोकांवर कमी जास्त प्रमाणात होत आहेत. काही काम केलं नाही तर स्मरणशक्ती टिकून कशी राहणार? कोणाचे फोन नंबर्स पूर्वीसारखे लक्षात नसतात, ही त्यातली ठळक गोष्ट. पण इतरांशी मारलेल्या गप्पा, एकत्र मिळून केलेली कोणत्याही प्रकारची कामं, एकत्र मिळून ठरवलेल्या योजना आणि त्या पार पाडणं, वेगवेगळ्या व्यक्तींकडून काही गोष्टी समजून घेणं, त्यांना काही गोष्टी सांगणं या सगळ्यातून जे काही सामाजिक अभिसरण होतं ते मेंदूमध्ये सकारात्मक परिणाम घडवून आणतं. म्हणूनच ही धोक्याची सूचना आहे. मेंदू जागता - चालता फिरता ठेवायला हवा. त्यासाठी एकलकोंडेपणा योग्य नाही आणि माणसांना पर्याय नाही.