शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मित्र आणि नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनवर जास्त प्रेम करतात भारतीय - सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 14:44 IST

एकेकाळी गरज म्हणून वापरण्यात येणारा मोबाइल आता व्यसन झालं आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे व्यसन काही सुटत नाही

मुंबई - सध्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आला आहे. स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. एकवेळ आपलं पाकिट घरी विसरल्यावर जितकं टेंशन येणार नाही त्याहून जास्त टेंशन मोबाइल किंवा स्मार्टफोन विसरलो तर येतं. मोबाइल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक ठरला आहे. एकेकाळी गरज म्हणून वापरण्यात येणारा मोबाइल आता व्यसन झालं आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे व्यसन काही सुटत नाही. एका सर्व्हेनुसार, तंत्रज्ञानाचा फास इतका आवळला आहे की लोक नात्यांपेक्षा मोबाइलला जास्त महत्व देऊ लागले आहेत. लोक आजकाल आपल्या मित्र आणि नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनवर जास्त प्रेम करतात असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

जवळपास 33 टक्के लोक ज्यांच्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे त्यांचा जन्म डिजीटल युगात झाला आहे. हे लोक आपल्या स्मार्टफोनला जवळपास असणा-या लोकांपेक्षा जास्त महत्व देतात. भारतात हे प्रमाण सर्वात जास्त असून पहिल्या क्रमांकावर आहे. 

मोटोरोलाने नुकताच एक सर्व्हे केला असून यामध्ये हा खुलासा केला आहे. मोटोरोलाने हॉवर्ड विद्यापीठासोबत मिळून हा सर्व्हे केला आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्यांपैकी 50 टक्के लोकांनी स्मार्टफोन आपला बेस्ट फ्रेंण्ड असल्याचं सांगितलं आहे. स्मार्टफोन आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा समतोल राखण्याची इच्छा असणा-यांमध्येही भारत टॉपवर आहे. जवळपास 64 टक्के भारतीयांनी आपल्या दैनंदिन आयुष्य आणि स्मार्टफोन वापरात समतोल राखला जावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे आपल्या नात्यांमध्ये दुरावा आल्याचंही अनेकांनी कबूल केलं आहे. जवळपास 50 टक्के लोकांनी सकाळी उठल्या उठल्या आपण मोबाइल फोन चेक करतो असं मान्य केलं आहे. याबाबतीतही भारत इतर देशांच्या तुलनेत पुढे आहे. 35 टक्के लोकांनी आपण स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त वेळ खर्च करतो अशी कबुली दिली आहे. यामधील जवळपास 44 टक्के लोक असे आहेत ज्यांचा जन्म 1990 ते 2000 दरम्यान झाला आहे. स्मार्टफोनसाठी कमीत कमी वेळ देणे आपल्या हिताचं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.