शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

मित्र आणि नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनवर जास्त प्रेम करतात भारतीय - सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 14:44 IST

एकेकाळी गरज म्हणून वापरण्यात येणारा मोबाइल आता व्यसन झालं आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे व्यसन काही सुटत नाही

मुंबई - सध्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आला आहे. स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. एकवेळ आपलं पाकिट घरी विसरल्यावर जितकं टेंशन येणार नाही त्याहून जास्त टेंशन मोबाइल किंवा स्मार्टफोन विसरलो तर येतं. मोबाइल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक ठरला आहे. एकेकाळी गरज म्हणून वापरण्यात येणारा मोबाइल आता व्यसन झालं आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे व्यसन काही सुटत नाही. एका सर्व्हेनुसार, तंत्रज्ञानाचा फास इतका आवळला आहे की लोक नात्यांपेक्षा मोबाइलला जास्त महत्व देऊ लागले आहेत. लोक आजकाल आपल्या मित्र आणि नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनवर जास्त प्रेम करतात असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

जवळपास 33 टक्के लोक ज्यांच्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे त्यांचा जन्म डिजीटल युगात झाला आहे. हे लोक आपल्या स्मार्टफोनला जवळपास असणा-या लोकांपेक्षा जास्त महत्व देतात. भारतात हे प्रमाण सर्वात जास्त असून पहिल्या क्रमांकावर आहे. 

मोटोरोलाने नुकताच एक सर्व्हे केला असून यामध्ये हा खुलासा केला आहे. मोटोरोलाने हॉवर्ड विद्यापीठासोबत मिळून हा सर्व्हे केला आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्यांपैकी 50 टक्के लोकांनी स्मार्टफोन आपला बेस्ट फ्रेंण्ड असल्याचं सांगितलं आहे. स्मार्टफोन आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा समतोल राखण्याची इच्छा असणा-यांमध्येही भारत टॉपवर आहे. जवळपास 64 टक्के भारतीयांनी आपल्या दैनंदिन आयुष्य आणि स्मार्टफोन वापरात समतोल राखला जावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे आपल्या नात्यांमध्ये दुरावा आल्याचंही अनेकांनी कबूल केलं आहे. जवळपास 50 टक्के लोकांनी सकाळी उठल्या उठल्या आपण मोबाइल फोन चेक करतो असं मान्य केलं आहे. याबाबतीतही भारत इतर देशांच्या तुलनेत पुढे आहे. 35 टक्के लोकांनी आपण स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त वेळ खर्च करतो अशी कबुली दिली आहे. यामधील जवळपास 44 टक्के लोक असे आहेत ज्यांचा जन्म 1990 ते 2000 दरम्यान झाला आहे. स्मार्टफोनसाठी कमीत कमी वेळ देणे आपल्या हिताचं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.