शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 15:18 IST

भारतात 5G ची सुरुवात झाली आहे, पण लवकरच 6G सुरू होण्याची अपेक्षा आहे.

भारतात 5G तंत्रज्ञान आले आहे, अनेक शहरांमध्ये Jio आणि Airtel ची 5G सेवा सुरू झाली आहे. देशातील लोकही हळुहळू 5G कडे वळत आहेत. आता लवकरच देशात 6G सुरू होऊ शकते. भारत सरकारने हास स्पीड 6G सेवा आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. 5G तंत्रज्ञान लोकप्रिय होण्यापूर्वीच देशात 6G सुरू हो शकते.

रिलायन्स जिओ आणि एअरटेलने देशात 5G कनेक्शन देणे सुरू केले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये लोकांना 5G कनेक्टिव्हिटी मिळू लागली आहे. परंतू, आता भारताने 6G आणण्याची तयारी सुरू केली आहे. सुपर हाय स्पीड वायरलेस ब्रॉडबँड तंत्रज्ञान भारतात येईल. भारतात व्यावसायिक वापरासाठी हे जवळजवळ तयार आहे, परंतु संपूर्ण देशभरात पोहोचण्यास थोडा वेळ लागेल. 2030 पर्यंत लोकांसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

6G ची खासियत म्हणजे, हे वेगवान ब्रॉडबँड स्पीड देईल. याचे नेटवर्क आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे चालवले जाईल. यामुळे लोकांना त्यांच्या गरजेनुसार वेग आणि नेटवर्क मिळेल. 5G तंत्रज्ञानापेक्षा 100 पट अधिक गती देणारे हे नेटवर्क असेल. यावर तुम्ही अनेक चित्रपट काही सेकंदात डाउनलोड करू शकाल.

6G मध्ये काय मिळेल?तुम्हाला 5G मध्ये 1 Gbps चा स्पीड मिळत असेल, तर 6G मध्ये 100 Gbps स्पीड मिळेल. बफरिंग टाइम 5G मध्ये 1 मिलीसेकंद असेल, तर 6G मध्ये तो 1 मायक्रो सेकंद असेल. 5G सध्या स्मार्ट शहरे, स्मार्ट कारखाने, स्मार्ट फार्म आणि रोबोटिक्स क्षेत्रात कार्यक्षमता वाढविण्यात मदत करत आहे. 6G तंत्रज्ञान याच्याही एक पाऊल पुढे असेल. हे सर्व प्रकारच्या स्पेक्ट्रम बँडला सपोर्ट करेल. 

टॅग्स :5G५जीtechnologyतंत्रज्ञानJioजिओAirtelएअरटेलCentral Governmentकेंद्र सरकार