शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही आमच्या धोरणांवर चालणार, अमेरिकेच्या नाही; पेटीएम फाऊंडरचे खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 10:41 IST

Googleने त्यांच्या पेमेंट व्यवसाय विस्तारित करण्यासाठी अधिकारांचा दुरुपयोग केला आहे

शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अॅप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी अमेरिकन दिग्गज टेक कंपनी गुगलच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहेत. Googleने त्यांच्या पेमेंट व्यवसाय विस्तारित करण्यासाठी अधिकारांचा दुरुपयोग केला आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा अयशस्वी प्रयत्न असल्याचंही विजय शेखर शर्मा यांनी सांगितलं आहे. शर्मा म्हणाले की, त्यांच्या कंपनीने काहीही चुकीचं केलेलं नाही. पेटीएमच्या 30 कोटींहून अधिक ग्राहकांना त्यांनी भरवसा दिला की, त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. नोटीस देण्यापूर्वी गूगलने पेटीएमवर एकतर्फी कारवाई केली, असा दावा त्यांनी केला. या संपूर्ण कारवाईमध्ये Google स्वतः न्यायाधीश आणि फाशी देणारा, लाभार्थी होता.गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम शर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, 'त्यांच्याकडे ताकद आणि अधिकार आहेत. ते नक्कीच आम्हाला त्रास देऊ शकतात. गुगलने पेटीएमला नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखण्यासाठी हे केले असावे, जेणेकरून इतर पेमेंट अॅपला त्याचा फायदा होईल. यात Googleच्या स्वतःच्या अॅपचा समावेश आहे. त्यांनी गुगलवर स्वत: च्या फायद्यासाठी काम केल्याचा आरोप केला. गुगलने असा युक्तिवाद केला होता की, कसिनो/जुगारसारखे खेळ पेटीएमच्या माध्यमातून खेळले जात असल्यानेच प्ले स्टोअरमधून पेटीएम हटवलं. परंतु शर्मा यांनी तो दावा खोडून काढला आहे. पेटीएम अॅपने काहीही चुकीचे केलेले नाही. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमद्वारे देशातील 97 टक्के स्मार्टफोन इकोसिस्टमवर गुगलचं प्रभुत्व आहे. गुगल आपल्या शक्तीचा आणि अधिकाराचा गैरवापर करीत आहे का, असे विचारले असता शर्मा म्हणाले हो तो गैरवापर करीत आहे. भारताचे कायदे गुगलवर लागू होत नाहीत, ते स्वतःच्या धोरणावर चालतात.पेटीएममध्ये चीनचा अलिबाबा ग्रुप हा सर्वात मोठा भागधारक आहे. शर्मा म्हणाले की, सरकार स्वावलंबी भारतावर भर देत आहे आणि कोणत्याही परदेशी कंपनीवर घरगुती व्यवसायावर परिणाम होत नाही हे पाहिले पाहिजे.  'जेव्हा आपण स्वावलंबी भारताबद्दल बोलत आहोत, तेव्हा आपण असा विचार केला पाहिजे की, भारतीय कंपन्या भारतीय कायद्यानुसार चालतील. जेणेकरून दुसर्‍या देशाची धोरणे आपल्याला चालवणार नाहीत. अमेरिकन सामर्थ्यवान कंपन्या आम्हाला त्यांच्या मार्गाने चालवू शकत नसल्याचंही विजय शेखर शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Paytmपे-टीएम