शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

खुशखबर...लवकरच कॉल दर होणार स्वस्त !

By शेखर पाटील | Updated: August 14, 2017 14:00 IST

भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण अर्थात ट्रायच्या एका निर्णयामुळे लवकरच मोबाईलच्या कॉल दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण अर्थात ट्रायच्या एका निर्णयामुळे लवकरच मोबाईलच्या कॉल दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.भारतीय सेल्युलर सेवा पुरवणार्‍या कंपन्यांवर नियंत्रणाचे काम ट्राय करत असते. येत्या काही दिवसातच ट्रायतर्फे एका महत्वाच्या मुद्याबाबत घोषणा होण्याची शक्यता असून यामुळे कॉल दरांमध्ये घट होणार असून साहजीकच मोबाईलय युजर्सला लाभ होणार आहे. देशातील कोणत्याही मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीकडे परिपूर्ण पायाभूत सुविधा नाहीत. यामुळे काही सेवांसाठी इतर कंपन्यांवर अवलंबून रहावे लागत असते. यातील सर्वात मोठी सेवा म्हणजे इंटरकनेक्ट युजेस चार्जेस म्हणजे आययूसी होय. ही इंटरकनेक्टीव्हिटी साठीची प्रणाली होय. समजा माझ्याकडे एयरटेल कंपनीचा मोबाईल असून मी आयडिया वा अन्य दुसर्‍या कंपनीच्या युजरशी बोलतोय. यावेळी त्या युजरला इनकमींगचे पैसे लागत नाहीत. मात्र हा कॉल पूर्ण होण्यासाठी एयरटेल कंपनी आयडियाला पैसे देत असते. याच पध्दतीने मोबाईल कंपन्या एकमेकांना कॉल दराची रक्कम अदा करत असतात. २००३ साली ट्रायने मोबाईल कंपन्यांसाठी कॉलींग पार्टी-पे म्हणजेच सीपीपी या नावाने प्रणाली लागू केल्यानंतर या पध्दतीची आकारणी उदयास आली. आधी एका मिनिटाला तब्बल १.१० रूपये इतके आकारले जात होते. ही रक्कम कमी होत आता १४ पैशांवर आली आहे. अर्थात कंपन्या एकमेकांना आपल्या युजर्सच्या कॉल साठी या दराने रक्कम अदा करत असतात. मात्र अलीकडच्या काळात फोर-जी व्हाईस ओव्हर नेटवर्क अर्थात व्हिओ-एलटीई सेवेचा उदय झाल्यानंतर १४ पैशांची रक्कम जास्त असल्याचा युक्तीवाद काही कंपन्यांनी केला. विशेष करून रिलायन्स जिओने या संदर्भात ट्रायकडे हे दर कमी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे या प्रणालीच्या माध्यमातून रग्गड कमाई करणार्‍या एयरटेलने दर वाढविण्याची मागणी केली. मात्र ट्रायने ग्राहकांना दिलासा देत जिओच्या मागणीवर सकारत्मक भूमिका घेतली आहे. यामुळे १४ पैशांचा कॉल दर आता कमी होण्याची शक्यता आहे. यात किती घट करण्यात येईल? याची माहिती देण्यात आली नसली तरी याचा थेट लाभ ग्राहकांना होणार आहे. याबाबत ट्राय लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थातच मोबाईलच्या कॉल दरांमध्ये घट होणार आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने सविस्तर आणि सर्वात पहिल्यांदा वृत्त दिले असून ट्रायच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.