शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

इंजिनिअरांनी तयार केला कृत्रिम कल्पवृक्ष; तब्बल 2890 लोकांना देणार शुद्ध हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 14:23 IST

शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे लोकांना शुद्ध हवे ऐवजी अशुद्ध हवा मिळत आहे.

प्रदुषणामुळे जगातील मोठमोठी शहरे त्रस्त झाली आहेत. शांघाय, दिल्लीसह अनेक शहरे बहुंतांशवेळा धुरक्याच्या छायेत असतात. शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे लोकांना शुद्ध हवे ऐवजी अशुद्ध हवा मिळत आहे. विविध सरकारे प्रदूषण कमी करण्यासाठी कोटींवर वृक्ष लागवड करत आहेत. मात्र, यावरच थांबतील ते इंजिनिअर कसले. त्यांनी कृत्रिम कल्पवृक्षाचीच निर्मिती केली आहे. 

मेक्सिकोच्या इंजिनिअरांनी एक रोबोटिक वृक्ष बनविला आहे. या वृक्षाचे नाव बायोअर्बन आहे. हा वृक्ष दररोज 2890 लोकांना शुद्ध हवा देऊ शकतो. या रोबोटिक वृक्षाच्या इंजिनिअरांचा दावा आहे की, हा वृक्ष खऱ्या वृक्षांसारखे काम करतो. वातावरणातून प्रदूषित हवा शोषून घेऊन त्यावर प्रक्रिया करत स्वच्छ हवा बाहेर सोडतो. हा वृक्ष दिवसाला 2890 जणांना हवा देतो. या वृक्षामध्ये असे एक मशीन आहे जे प्रदूषित हवा साफ करते. 

या वृक्षाची उंची 14 फूट आहे. यामध्ये हवा साफ करून वायुमंडळात सोडण्यासाठी फोटोसिंथेसिस सिस्टिम वापरण्यात आली आहे. इंजिनिअरांच्या दाव्यानुसार हा वृक्ष खऱ्या 368 वृक्षांएवढे काम करतो. हा रोबोटित कल्पवृक्ष सध्या मेक्सिकोच्या प्युबेला शहरामध्ये लावण्यात आला आहे. यासाठी 35 लाख रुपयांचा खर्च आला आहे.