शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

फोन चार्जिंग करताना करु नका या 5 चुका, पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 15:44 IST

काहीवेळा 6 महिन्यातच फोनची बॅटरी खराब होते. चला जाणून घेऊया अशाच 5 चुका ज्या तुम्ही फोन चार्जिंग करताना कधीही करु नये. 

(Image Credit: www.fonepaw.com)

तुमच्यापैकी अनेकजण असे असतील ज्यांना त्यांची फोन चार्जिंग करण्याची सवय बदलण्याची गरज असेल. अनेकजण फोन चार्जिंग करताना काही चुका करतात आणि नंतर फोन खराब झाल्यावर त्यांना पश्चाताप होतो. या चुकांमुळे केवळ फोन नाहीतर फोनची बॅटरीही खराब होते. काहीवेळा 6 महिन्यातच फोनची बॅटरी खराब होते. चला जाणून घेऊया अशाच 5 चुका ज्या तुम्ही फोन चार्जिंग करताना कधीही करु नये. 

1) ओरिजीनल चार्जरनेच फोन चार्ज करा

अनेकजण आपला चार्जर न वापरता दुसऱ्या किंवा डुप्लिकेट चार्जरने फोन चार्ज करतात. पण हे चुकीचं आहे. कधीही तुमच्या फोनच्या ओरिजीनल चार्जरनेच फोन चार्ज करावा. याने फायदा हा होईल की, तुमच्या फोनची बॅटरी चांगली राहील. त्यासोबतच चार्जिंग पॉईंट खराब होणार नाही आणि फोन लगेच चार्ज होणार. 

2) फास्ट चार्जरला करा दूर

आजकाल बाजारात कितीतरी फास्ट चार्जर उपलब्ध आहेत. पण हे फास्ट चार्जर तुमच्या फोनसाठी कोणत्याही शत्रूपेक्षा कमी नाहीयेत. या चार्जरने तुमचा फोन कमी वेळात चार्ज तर होतो पण फोनची बॅटरी निकामी होते. 

3) फोन रात्रभर चार्जिंगला लावू नका

अनेकांना सवय असते की, ते रात्रभर फोन चार्जिंगला लावतात. पण मुळात कोणताही फोन चार्जिंग होण्यासाठी 2 ते 3 तास वेळ लागतो. जर तुम्हीही असे करत असाल तर यापुढे हे करु नका. असे केल्याने फोन गरम होतो आणि बॅटरीही खराब होते. 

4) पावर सेव्हर अॅपपासून दूर रहा

अनेकजण बॅटरी वाचवण्याचा दावा कऱणारे थर्ड पार्टी अॅप फोनमध्ये इन्स्टॉल करतात. पण या अॅपमुळे फोनचं नुकसान होतं. खरंतर असे अॅप फोनवर प्रेशर निर्माण करतात. त्यामुळे फोन हॅंग होऊ लागतो. 

5) 100 टक्के चार्जिंग करु नका

कधीही फोन 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्जिंग करु नका. कारण यामुळे बॅटरी गरम होऊ लागतो आणि बॅटरीचं लाईफ कमी होतं. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान