शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

BSNL ला सुगीचे दिवस! तीन महिन्यांत ३६ लाख युजर्स वाढले; टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज वाढविल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:16 IST

तिन्ही खासगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा खूपच कमी दर भारत संचार निगम लिमिटेडचे आहेत. अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. यामुळे या लोकांना दोन्ही सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज करणे महाग पडत आहे.

रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर अव्वाच्या सव्वा वाढविल्याने सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला सुगीचे दिवस आले आहेत. बीएसएनएलने ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या तीन महिन्यांत ३६ लाख नवे युजर जोडले आहेत. 

तिन्ही खासगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा खूपच कमी दर भारत संचार निगम लिमिटेडचे आहेत. अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. यामुळे या लोकांना दोन्ही सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज करणे महाग पडत आहे. यामुळे हे लोक आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत. 

बीएसएनएलने ऑगस्टमध्ये सर्वाधिक नवे ग्राहक मिळविले होते. यामुळे या महिन्यात बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत २५.२ लाखांची वाढ झाली होती. परंतू, सप्टेंबरमध्ये ३.८ लाख आणि ऑक्टोबरमध्ये ७.७ लाख ग्राहक जोडले गेले. तरीही या तिमाहीतील संख्या खूप मोठी आहे. 

बीएसएनएल देशभरात ४जी चे जाळे विणत आहे. उशिराने का होईना बीएसएनएलच्या ग्राहकांना ४जीची सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कमी किंमत आणि जास्त वेग यासाठी नवे ग्राहक किंवा पोर्ट करणाऱ्यांची पाऊले सरकारी कंपनीकडे वळू लागली आहेत. बीएसएनएलच्या प्रीपेड कनेक्शनमध्ये जुलै २०२४ मध्ये ८.८४ कोटी एवढए ग्राहक होते, ते ऑक्टोबरमध्ये ९.२ कोटी ग्राहक झाले आहेत.

पोस्टपेड ग्राहकांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये बीएसएनएलचे ४४.२ लाख पोस्टपेड ग्राहक होते. ते ऑक्टोबरमध्ये ४४.८ लाख झाले आहेत. व्होडाफोन आयडियाचे बहुतांश ग्राहक रिचार्जचे दर वाढल्याने बीएसएनएलच्या नेटवर्कवर पोर्ट होत आहेत. 

टॅग्स :BSNLबीएसएनएल