शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

एअर सेल्फी : आता बलिदानाची गरज नाही

By अनिल भापकर | Updated: January 16, 2018 20:04 IST

सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही . सेल्फी स्टिक मुळे काही प्रमाणात ही समस्या दूर झाली असली तरी सुद्धा ग्रुप मधील सर्व जण फोटोत येत नाही. मग यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. मात्र आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .आज या एअर सेल्फी विषयी जाणून घेऊया .

ठळक मुद्देसेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही .यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .

मोबाईल मधील कॅमेरा जेव्हापासून पावरफुल झाला तेव्हापासून अनेकांमधील फोटोग्राफीचा सुप्त गुण जागा झाला. वाढदिवस असो कि बाहेर फिरायला जाणे असो ग्रुप फोटो काढून ते लगेच सोशल मीडिया वर अपलोड करण्याचा ट्रेंड हल्ली टेक्नोसॅव्ही पिढीमध्ये दिसून येतो. यामुळेच सेल्फीची लोकप्रियता वाढली आहे. सेल्फी काढणे चांगले कि वाईट यावर अनेक खलबते झाली आहे. कारण सेल्फीचे जेवढे फायदे तेवढेच सेल्फी मुळे अपघात होण्याचे प्रमाणही भरपूर उघडकीस आले आहे.मात्र सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही . सेल्फी स्टिक मुळे काही प्रमाणात ही समस्या दूर झाली असली तरी सुद्धा ग्रुप मधील सर्व जण फोटोत येत नाही. मग यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. मात्र आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .आज या एअर सेल्फी विषयी जाणून घेऊया .

काय आहे नेमकं एअर सेल्फी ?हा एक स्मार्टफोन साईज चा आणि वजनाने हलका असा ड्रोन कॅमेरा आहे. अॅल्युमिनियमपासून बनविलेल्या या ड्रोनचे वजन फक्त ५० ते ६५ ग्रॅम आहे . हा ड्रोन कॅमेरा  ऍप च्या माध्यमातून स्मार्टफोन वरून कन्ट्रोल केल्या जातो . या ड्रोनला ५ एमपीचा एच डी कॅमेरा दिला गेला आहे. हा ड्रोन कॅमेरा स्वतः च्या वायफाय ने स्मार्टफोन ला कनेक्ट करता येतो . यामध्ये उच्च प्रतीचे विविध सेन्सर वापरले असून त्यांच्या मदतीने उच्च प्रतीचे फोटो काढता येतात .या ड्रोन मध्ये चार मायक्रो मोटर्स असून हे ड्रोन २० मीटर उंचीवरूनही झूम करून चांगल्या सेल्फी काढू शकते. याच्या सहाय्याने मोठ्या रेंजमध्येही सेल्फी घेता येतात. हे ड्रोन वायफायशी कनेक्ट होते. उडण्यासाठी तसेच फोटो क्लिक करण्यासाठी त्याला पॉवरफुल बॅटरी दिली गेली आहे . या ड्रोन मध्ये वापरलेली बॅटरी ३० मिनिटात चार्ज करता येते. या ड्रोन मध्ये ४ जीबीचे स्टोरेजही आहे.

तर मग मस्त आहे ना सेल्फी ची लोकप्रियता आणखी वाढविणारे हे एअर सेल्फी तंत्रज्ञान .

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल