शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 18:40 IST

भारतात 5G सुविधा सुरू झाली आहे, त्यामुळे आता जुन्या फोनचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोय.

5G network in India: भारतात 5G सेवा सुरू झाली आहे. पण, आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतोय. तो म्हणजे, त्यांच्या जुन्या फोनमध्ये 5G चालेल का? विशेषत: अशा लोकांच्या फोनमध्ये, ज्यांच्याकडे 4G स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे, सध्या अनेक युजर्सच्या 5G स्मार्टफोनमध्येही 5G नेटवर्क येत नाहीये.

भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओ आणि एअरटेलने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीसह 8 शहरांमध्ये त्यांची सेवा सुरू केली आहे. पण, आता 4G स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या मनात प्रश्न येतोय की, त्यांना जुन्या फोनवर 5G चा लाभ मिळेल का? किंवा त्यांना आता नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करावा लागेल का?

जुना फोन निरुपयोगी होईल?लवकरच संपूर्ण भारतात 5G सर्व्हिस सुरू होणार आहे. पण, 4G फोन वापरणाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण, 5G नेटवर्कवर आल्यानंतरही तुम्ही 4G स्मार्टफोन आरामात वापरू शकणार आहात. तुम्हाला तुमच्या जुन्या फोनवर 5G स्पीड मिळणार नाही, परंतु चांगले नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी मिळू शकते.

भारतभर 5G सेवा कधी मिळणार?भारतात 5G सेवा आतापर्यंत फक्त 8 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे आणि तीही पूर्णपणे नाही. युजर्सना फक्त काही भागांमध्ये 5G नेटवर्क मिळत आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्या त्याचा झपाट्याने विस्तार करत आहेत. देशभरात 5G सेवा मिळण्यास मार्च 2024 पर्यंत वेळ लागेल. जिओने एका निवेदनात म्हटले की, पुढील वर्षाच्या अखेरीस त्यांची 5G सेवा संपूर्ण देशात पोहोचेल. तर, एअरटेलचे म्हणणे आहे की, त्यांची 5G सेवा मार्च 2024 पर्यंत उपलब्ध होईल.

टॅग्स :5G५जीSmartphoneस्मार्टफोनAirtelएअरटेलJioजिओ