शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 18:40 IST

भारतात 5G सुविधा सुरू झाली आहे, त्यामुळे आता जुन्या फोनचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोय.

5G network in India: भारतात 5G सेवा सुरू झाली आहे. पण, आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतोय. तो म्हणजे, त्यांच्या जुन्या फोनमध्ये 5G चालेल का? विशेषत: अशा लोकांच्या फोनमध्ये, ज्यांच्याकडे 4G स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे, सध्या अनेक युजर्सच्या 5G स्मार्टफोनमध्येही 5G नेटवर्क येत नाहीये.

भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओ आणि एअरटेलने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीसह 8 शहरांमध्ये त्यांची सेवा सुरू केली आहे. पण, आता 4G स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या मनात प्रश्न येतोय की, त्यांना जुन्या फोनवर 5G चा लाभ मिळेल का? किंवा त्यांना आता नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करावा लागेल का?

जुना फोन निरुपयोगी होईल?लवकरच संपूर्ण भारतात 5G सर्व्हिस सुरू होणार आहे. पण, 4G फोन वापरणाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण, 5G नेटवर्कवर आल्यानंतरही तुम्ही 4G स्मार्टफोन आरामात वापरू शकणार आहात. तुम्हाला तुमच्या जुन्या फोनवर 5G स्पीड मिळणार नाही, परंतु चांगले नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी मिळू शकते.

भारतभर 5G सेवा कधी मिळणार?भारतात 5G सेवा आतापर्यंत फक्त 8 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे आणि तीही पूर्णपणे नाही. युजर्सना फक्त काही भागांमध्ये 5G नेटवर्क मिळत आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्या त्याचा झपाट्याने विस्तार करत आहेत. देशभरात 5G सेवा मिळण्यास मार्च 2024 पर्यंत वेळ लागेल. जिओने एका निवेदनात म्हटले की, पुढील वर्षाच्या अखेरीस त्यांची 5G सेवा संपूर्ण देशात पोहोचेल. तर, एअरटेलचे म्हणणे आहे की, त्यांची 5G सेवा मार्च 2024 पर्यंत उपलब्ध होईल.

टॅग्स :5G५जीSmartphoneस्मार्टफोनAirtelएअरटेलJioजिओ