शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

 ‘५जी’साठी दीड लाख कोटींच्या बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 05:26 IST

विक्रीस ठेवण्यात आलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी ७१ टक्के स्पेक्ट्रम विकले गेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव शनिवारी सलग पाचव्या दिवशी सुरू राहिला. आतापर्यंत ५जी स्पेक्ट्रमसाठी कंपन्यांनी १,४९,८५५ कोटी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ५जी स्पेक्ट्रमसाठी दूरसंचार कंपन्यांत तीव्र स्पर्धा असल्यामुळे लिलाव प्रक्रिया पाचव्या दिवसांपर्यंत पोहोचली आहे. शनिवारी कंपन्यांनी २४ व्या फेरीसाठी बोली लावल्या आहेत. शुक्रवारपर्यंत लिलावाच्या २३ फेऱ्या झाल्या होत्या.

दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी म्हटले होते की, विक्रीस ठेवण्यात आलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी ७१ टक्के स्पेक्ट्रम विकले गेले आहे. लिलावास कंपन्यांकडून मिळालेला प्रतिसाद समाधानकारक आहे. या लिलावात दूरसंचार विभागाने ४.३ लाख कोटी रुपयांचे ७२ गीगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विक्रीसाठी ठेवले आहे. या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एयरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी एंटरप्राइजेस या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. लिलावात विकल्या जाणाऱ्या ५जी स्पेक्ट्रमची वैधता २० वर्षांची असेल. लो फ्रिक्वेन्सी बँड, मीडियम आणि हाय फ्रिक्वेन्सी बँड रेडिओ वेव्हजचा हा लिलाव आहे. यात यशस्वी झालेल्या कंपन्या ५जी दूरसंचार सेवा देतील. 

बयाणा रक्कम जमादूरसंचार विभागाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, ५जी स्पेक्ट्रम खरेदीसाठी व्होडाफोन आयडियाने २,२०० कोटी रुपये, भारती एअरटेलने ५,५०० कोटी रुपये, अदानी डेटा नेटवर्क्सने १०० कोटी रुपये आणि रिलायन्स जिओने १,४०० कोटी रुपये बयाणा रक्कम म्हणून जमा केले आहेत.