शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

तुमचं लोन मंजूर झालंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 18:03 IST

अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवशी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान फोन आला. ‘हॅलो.. मी एस. बी. आय. च्या ... या शाखेतून बोलतेय.’ ...

अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवशी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान फोन आला. ‘हॅलो.. मी एस. बी. आय. च्या ... या शाखेतून बोलतेय.’  मी म्हटलं ‘हां..बोला. तुम्ही आनंदा घोडकेच ना!’ तिकडून विचारणा झाली. मला वाटलं महिलेचा आवाज आहे म्हणजे बँकेतूनच असेल फोन म्हणून ‘होय..मीच आहे!’ म्हटलं. ‘तुमच्या नावे ७५ हजार रुपये कर्ज मंजूर झाले आहे... तुमची माहिती हवी आहे.’ एटीएम व आॅनलाईन बँकिंगमुळे मागील तीन-चार महिने तरी मी बँकेत गेल्याचे आठवत नाही म्हणजे कर्जासाठी अर्ज करण्याचा प्रश्न येतोच कुठे? मग माझ्या लक्षात आले की हा फोन बँकेचा नसेलच! मग मी त्या फोन करणाºया महिलेला प्रतिप्रश्न केला, ‘तुम्ही बँकेतूनच बोलता म्हटल्यावर तिथे स्क्रीनवर माझी माहिती असेलच, माझे नाव, नंबर पत्ता...ठेवा फोन आणि परत करू नका... माझ्या  कर्जाचं मी बघून घेईन..’ आणि तेवढ्याच वेगात तिकडचा फोन बंद झाला.

तिकडून फोन बंद झाला आणि माझ्या विचारचक्रांना गती मिळाली. ‘बँकेची वेळ तर पाच वाजता संपली, उद्या आणि परवा बँकेला सुट्टी आहे मग असा फोन येण्याचा काय अर्थ. शिवाय दोन-दोन महिने बँकेत चकरा मारून सतराशे साठ पुरावे जोडूनही कर्ज मंजूर होत नाहीत आणि इथे अर्ज न करता कर्ज मंजूर झाल्याचा फोन येतो. ऐकावे ते नवलच! 

बँकेची वेळ संपल्यानंतर बँकेच्या कामासाठी बँक कर्मचाºयांना ग्राहकांशी बोलता येते का? बँका असे सहजासहजी अर्ज न करता कर्ज देतीलच कसे? मागील वर्षी एका प्रापंचिक कारणासाठी एका निमसरकारी बँकेत एक लाखाच्या कर्जासाठी अर्ज केला होता. सरकारी नोकरी असूनही अनेक कागदपत्रांची जमवाजमव करावी लागली. दोन महिन्यानंतर एका कागदाच्या अपूर्ततेमुळे कर्ज नामंजूर झाले आणि इथे कोणत्याही पुराव्याशिवाय कर्ज मंजूर करण्यात आले आहे ही किती आश्चर्याची घटना आहे ना!’

एवढ्यात दुसºया मित्राचा फोन आला. मी विचारांच्या तंद्रीतच होतो आणि सहजपणे बोलून गेलो,‘हं बोला! आपण कोणत्या बँकेतून बोलता?’ ‘अरे ! मी राजू बोलतोय? काय लावलास बँक बिंक!’ त्याच्या या वाक्याने मी भानावर आलो. त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यालाही पंधरा दिवसांपूर्वी असाच फोन आला होता. तो बँकेतही जाऊन आला. बँकेत चौकशी केली असता बँकेतून कोणीही फोन केला नाही आणि कार्यालयीन वेळेनंतर ग्राहकाला आम्ही फोन का करू? असा प्रतिप्रश्न ऐकूनच तो परतला. 

असे फोन शक्यतो कार्यालयीन वेळेनंतर अथवा सुट्टीच्या दिवशी येतात. असे फोन घेणे टाळावे अथवा कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना पुरवू नये की जेणेकरून आपली लूट होणार नाही. आणि पुढच्या कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागणारच नाही.(लेखक जि. प. शिक्षक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र