शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

तुमचं लोन मंजूर झालंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 18:03 IST

अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवशी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान फोन आला. ‘हॅलो.. मी एस. बी. आय. च्या ... या शाखेतून बोलतेय.’ ...

अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवशी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान फोन आला. ‘हॅलो.. मी एस. बी. आय. च्या ... या शाखेतून बोलतेय.’  मी म्हटलं ‘हां..बोला. तुम्ही आनंदा घोडकेच ना!’ तिकडून विचारणा झाली. मला वाटलं महिलेचा आवाज आहे म्हणजे बँकेतूनच असेल फोन म्हणून ‘होय..मीच आहे!’ म्हटलं. ‘तुमच्या नावे ७५ हजार रुपये कर्ज मंजूर झाले आहे... तुमची माहिती हवी आहे.’ एटीएम व आॅनलाईन बँकिंगमुळे मागील तीन-चार महिने तरी मी बँकेत गेल्याचे आठवत नाही म्हणजे कर्जासाठी अर्ज करण्याचा प्रश्न येतोच कुठे? मग माझ्या लक्षात आले की हा फोन बँकेचा नसेलच! मग मी त्या फोन करणाºया महिलेला प्रतिप्रश्न केला, ‘तुम्ही बँकेतूनच बोलता म्हटल्यावर तिथे स्क्रीनवर माझी माहिती असेलच, माझे नाव, नंबर पत्ता...ठेवा फोन आणि परत करू नका... माझ्या  कर्जाचं मी बघून घेईन..’ आणि तेवढ्याच वेगात तिकडचा फोन बंद झाला.

तिकडून फोन बंद झाला आणि माझ्या विचारचक्रांना गती मिळाली. ‘बँकेची वेळ तर पाच वाजता संपली, उद्या आणि परवा बँकेला सुट्टी आहे मग असा फोन येण्याचा काय अर्थ. शिवाय दोन-दोन महिने बँकेत चकरा मारून सतराशे साठ पुरावे जोडूनही कर्ज मंजूर होत नाहीत आणि इथे अर्ज न करता कर्ज मंजूर झाल्याचा फोन येतो. ऐकावे ते नवलच! 

बँकेची वेळ संपल्यानंतर बँकेच्या कामासाठी बँक कर्मचाºयांना ग्राहकांशी बोलता येते का? बँका असे सहजासहजी अर्ज न करता कर्ज देतीलच कसे? मागील वर्षी एका प्रापंचिक कारणासाठी एका निमसरकारी बँकेत एक लाखाच्या कर्जासाठी अर्ज केला होता. सरकारी नोकरी असूनही अनेक कागदपत्रांची जमवाजमव करावी लागली. दोन महिन्यानंतर एका कागदाच्या अपूर्ततेमुळे कर्ज नामंजूर झाले आणि इथे कोणत्याही पुराव्याशिवाय कर्ज मंजूर करण्यात आले आहे ही किती आश्चर्याची घटना आहे ना!’

एवढ्यात दुसºया मित्राचा फोन आला. मी विचारांच्या तंद्रीतच होतो आणि सहजपणे बोलून गेलो,‘हं बोला! आपण कोणत्या बँकेतून बोलता?’ ‘अरे ! मी राजू बोलतोय? काय लावलास बँक बिंक!’ त्याच्या या वाक्याने मी भानावर आलो. त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यालाही पंधरा दिवसांपूर्वी असाच फोन आला होता. तो बँकेतही जाऊन आला. बँकेत चौकशी केली असता बँकेतून कोणीही फोन केला नाही आणि कार्यालयीन वेळेनंतर ग्राहकाला आम्ही फोन का करू? असा प्रतिप्रश्न ऐकूनच तो परतला. 

असे फोन शक्यतो कार्यालयीन वेळेनंतर अथवा सुट्टीच्या दिवशी येतात. असे फोन घेणे टाळावे अथवा कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना पुरवू नये की जेणेकरून आपली लूट होणार नाही. आणि पुढच्या कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागणारच नाही.(लेखक जि. प. शिक्षक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र