शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

तुम्ही गल्लीबोळातले गुंड असाल, इथं जिल्ह्याला गिळून टाकणारे राहतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST

वळसंग येथे सोमवारी टोलनाक्यावर व्यावसायिक वाहनांना टोल वसुली सुरू करण्यात आली. या विरोधात प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेने आज सकाळी ...

वळसंग येथे सोमवारी टोलनाक्यावर व्यावसायिक वाहनांना टोल वसुली सुरू करण्यात आली. या विरोधात प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेने आज सकाळी टोलनाक्यावर आंदोलन केले. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेही आंदोलनात सहभागी झाले. स्थानिक रहिवाशांना शेतीकामासह विविध कारणाने गावाच्या जवळ ये-जा करावी लागते. त्यामुळे त्यांना टोलमधून सवलत देण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली होती. सकाळी बारा वाजता सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन अडीच वाजता संपले. यादरम्यान सर्व वाहनांना मोकळीक देण्यात आली होती.

यावेळी तहसीलदार अमोल कुंभार, वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अतुल भोसले, प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के, संपर्कप्रमुख जमीरभाई शेख, शहर प्रमुख अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालिद मनियार, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मोहसिन तांबोळी, वळसंगचे सरपंच श्रीशैल दुधगी, माजी सरपंच महादेव होटकर, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

-------

१ ऑक्टोबरला बैठक

स्थानिकांना टोलमधून सूट देता येते का अथवा स्थानिकांना नोकऱ्या देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे परिचलन अधिकारी अनिल विपत यांनी आंदोलकांना दिली.

-------

तूर्त आठ दिवस टोलमाफी

स्थानिकांना टोलमाफीतून सवलत मिळावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेने वळसंग येथील नव्या टोल प्लाझावर केलेल्या आंदोलनाला तात्पुरते यश मिळाले. आठ दिवस स्थानिकांची टोल वसुली थांबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अंतिम निर्णयासाठी मात्र वरिष्ठ पातळीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

.......

फोटो आहेत