शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

सोलापुरात यंदा दहा हजारांपेक्षाही जास्त शाडू अन् मातीच्या मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:05 IST

तीन हजारांहून अधिक मूर्तींची नोंदणी; शाडूच्या गणेशमूर्तीवर सोलापूरकरांचे प्रेम

ठळक मुद्देयंदा प्लॅस्टर आॅफ पॅरिस अर्थात पीओपीच्या गणपतींना मागणीसरकारने पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणली आहेपुढच्या वर्षापासून पीओपीवर पूर्णपणे बंदी आणली जाणार

सोलापूर : सोलापुरातील गणेश मूर्तिकारांनी यंदा दहा हजारांहून अधिक शाडू तसेच इतर मातीच्या मूर्ती बनविल्या आहेत. सुंदर तसेच आकर्षक अशा या शाडूच्या गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोलापुरात तीन हजारांहून अधिक इको फ्रेंडली अर्थात शाडू गणेशमूर्तींचे बुकिंग झाले आहे. येथील मूर्तिकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सोलापुरातील मूर्तिकारांमध्येही पर्यावरणप्रेम जागृत होतेय. गणेश मूर्तीबद्दल लोकमतने लोकमत इनिशिएटिव्ह उपक्रमातून पर्यावरण जनजागृती मोहीम उघडली आहे. या मोहिमेची दखल शेकडो सोलापूरकरांनी घेतली आहे. लोकमतमध्ये प्रसिद्ध होणाºया बातम्यांमुळे आम्ही शाडू गणेश मूर्तींच्या प्रेमात पडलो आहोत, अशी प्रांजळ कबुली देखील सोलापूरकर देत आहेत.

यापूर्वी इको फ्रेंडली गणेशमूर्तींना एवढे पॉझिटिव्ह वातावरण नव्हते. यंदा अनेक मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती बनविल्या आहेत. गणेशभक्त गणेशमूर्ती पाहण्यासाठी विविध मूर्तिकारांकडे जात आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पाहताना अनेक जण शाडूच्या मूर्ती आहेत का, अशी विचारणा करताहेत; तर काही जण अनामत रक्कम देऊन शाडूच्या गणेशमूर्ती बनवून घेत आहेत. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक शाडूच्या मूर्तींचे बुकिंग झाले आहे. 

सोलापुरातील गणेश मूर्तिकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा प्लॅस्टर आॅफ पॅरिस अर्थात पीओपीच्या गणपतींना मागणी कमी आहे. सरकारने पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणली आहे. फक्त याच वर्षी बंदीमध्ये शिथिलता आली असून, पुढच्या वर्षापासून पीओपीवर पूर्णपणे बंदी आणली जाणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांना पूर्वीप्रमाणे मातीच्या कलेला जवळ करावे लागेल. पीओपीला विसरावे लागेल. त्याशिवाय पर्यावरण जनजागृती  होणार नाही, पर्यावरणाचे संवर्धन होणार नाही, अशा भावना मूर्तिकारांकडून व्यक्त होत आहेत.

शासनाच्या सहकार्याने शक्यमूर्तिकार गोपाळ भोसले सांगतात, मूर्तिकार सरकारच्या नियमांचे पालन करणार आहेत. मूर्तिकारांची बाजू देखील शासनाने समजून घेतली पाहिजे. मातीकला ही भारतीय संस्कृती जपणारी आहे. या संस्कृतीला आम्ही मानतो. संस्कृती कला जोपासताना शासनाने मूर्तिकारांना काही सवलती दिल्या पाहिजेत. मूर्तिकारांना अर्थसाह्य दिले पाहिजे. शासनाकडून सकारात्मक प्रोत्साहन मिळाल्यास आम्ही शंभर टक्के मातीपासूनच मूर्ती बनवू.

टॅग्स :SolapurसोलापूरGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती