शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सोलापुरात यंदा दहा हजारांपेक्षाही जास्त शाडू अन् मातीच्या मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:05 IST

तीन हजारांहून अधिक मूर्तींची नोंदणी; शाडूच्या गणेशमूर्तीवर सोलापूरकरांचे प्रेम

ठळक मुद्देयंदा प्लॅस्टर आॅफ पॅरिस अर्थात पीओपीच्या गणपतींना मागणीसरकारने पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणली आहेपुढच्या वर्षापासून पीओपीवर पूर्णपणे बंदी आणली जाणार

सोलापूर : सोलापुरातील गणेश मूर्तिकारांनी यंदा दहा हजारांहून अधिक शाडू तसेच इतर मातीच्या मूर्ती बनविल्या आहेत. सुंदर तसेच आकर्षक अशा या शाडूच्या गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोलापुरात तीन हजारांहून अधिक इको फ्रेंडली अर्थात शाडू गणेशमूर्तींचे बुकिंग झाले आहे. येथील मूर्तिकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सोलापुरातील मूर्तिकारांमध्येही पर्यावरणप्रेम जागृत होतेय. गणेश मूर्तीबद्दल लोकमतने लोकमत इनिशिएटिव्ह उपक्रमातून पर्यावरण जनजागृती मोहीम उघडली आहे. या मोहिमेची दखल शेकडो सोलापूरकरांनी घेतली आहे. लोकमतमध्ये प्रसिद्ध होणाºया बातम्यांमुळे आम्ही शाडू गणेश मूर्तींच्या प्रेमात पडलो आहोत, अशी प्रांजळ कबुली देखील सोलापूरकर देत आहेत.

यापूर्वी इको फ्रेंडली गणेशमूर्तींना एवढे पॉझिटिव्ह वातावरण नव्हते. यंदा अनेक मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती बनविल्या आहेत. गणेशभक्त गणेशमूर्ती पाहण्यासाठी विविध मूर्तिकारांकडे जात आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पाहताना अनेक जण शाडूच्या मूर्ती आहेत का, अशी विचारणा करताहेत; तर काही जण अनामत रक्कम देऊन शाडूच्या गणेशमूर्ती बनवून घेत आहेत. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक शाडूच्या मूर्तींचे बुकिंग झाले आहे. 

सोलापुरातील गणेश मूर्तिकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा प्लॅस्टर आॅफ पॅरिस अर्थात पीओपीच्या गणपतींना मागणी कमी आहे. सरकारने पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणली आहे. फक्त याच वर्षी बंदीमध्ये शिथिलता आली असून, पुढच्या वर्षापासून पीओपीवर पूर्णपणे बंदी आणली जाणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांना पूर्वीप्रमाणे मातीच्या कलेला जवळ करावे लागेल. पीओपीला विसरावे लागेल. त्याशिवाय पर्यावरण जनजागृती  होणार नाही, पर्यावरणाचे संवर्धन होणार नाही, अशा भावना मूर्तिकारांकडून व्यक्त होत आहेत.

शासनाच्या सहकार्याने शक्यमूर्तिकार गोपाळ भोसले सांगतात, मूर्तिकार सरकारच्या नियमांचे पालन करणार आहेत. मूर्तिकारांची बाजू देखील शासनाने समजून घेतली पाहिजे. मातीकला ही भारतीय संस्कृती जपणारी आहे. या संस्कृतीला आम्ही मानतो. संस्कृती कला जोपासताना शासनाने मूर्तिकारांना काही सवलती दिल्या पाहिजेत. मूर्तिकारांना अर्थसाह्य दिले पाहिजे. शासनाकडून सकारात्मक प्रोत्साहन मिळाल्यास आम्ही शंभर टक्के मातीपासूनच मूर्ती बनवू.

टॅग्स :SolapurसोलापूरGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती