शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

चिंताजनक!..उजनी यंदा महिनाआधीच मायनस होणार! उपयुक्त पाणीसाठा केवळ 12.91 टक्के

By रवींद्र देशमुख | Published: April 20, 2023 6:43 PM

मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता.

सोलापूर : पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत राज्यात सर्वात मोठे धरण, अशी ओळख असलेल्या उजनी धरणातून चालूवर्षी बेसुमार पाणी सोडल्याने मागील वर्षाच्या तुलनेत धरण एक महिन्या अगोदर मायनसमध्ये जाणार असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतीचा पाणी प्रश्न उग्ररूप धारण करणार आहे.

मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता. तो ७ ऑक्टोबरपर्यंत टिकून होता. त्यानंतरच्या काळात शेती व सोलापूरसाठी वेळोवेळी पाणी सोडल्याने धरणातील पाणीसाठा सात महिन्यांत ५३ टीएमसीने कमी झाला आहे. मागील वर्षी उजनी धरण ८ जूनपासून मायनसमध्ये जाण्यास सुरुवात झाली होती. ते आठ जुलै रोजी १२.७७ टक्के मायनस झाले होते. मात्र, चालू वर्षी दि.२० एप्रिल रोजी धरणात १२.५३ टक्के उपयुक्त साठा आहे. धरणातून सध्या सीनामाढा उपसा योजना, दहिगाव योजना, बोगदा व मुख्य कालवा यातून ४,१३३ क्युसेक पाणी शेतीसाठी सोडले जात आहे. तसेच बॅक वॉटरमधूनही शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यातच सध्या सूर्य आग ओकत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे दररोज धरणातील पाणीसाठा पाऊण टक्क्याने कमीकमी होत आहे. त्यामुळे उजनी धरण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मायनसच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

उपयुक्त जलसाठा केवळ १२.९१ टक्केचमागील वर्षी दि. २० एप्रिल रोजी उजनी धरणात ४५.३५ टक्के उपयुक्त जलसाठा होता तो चालू वर्षी मात्र, १२.९१ टक्के एवढाच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी उपयुक्तसाठा ३३ टक्के कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीररूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.