शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नारी आम्ही लय भारी.. डंका ग्रामपंचायतीच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार कल्याणशेट्टी यांनी राजकारणातील पारंपरिक विरोधक भरमशेट्टी गटाबरोबर चर्चा करून समझौता केला. शेवटच्या क्षणी बाळशंकर ...

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार कल्याणशेट्टी यांनी राजकारणातील पारंपरिक विरोधक भरमशेट्टी गटाबरोबर चर्चा करून समझौता केला. शेवटच्या क्षणी बाळशंकर काही जागा लढवत रिंगणात उतरले. यामुळे ७ जागांसाठी निवडणूक लागली. त्यामध्ये कल्याणशेट्टी- भरमशेट्टी यांनी सर्व उमेदवार निवडून आणले. सागर कल्याणशेट्टी, सोनाली तळवार, मुक्ताबाई ढगे, शैलेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली, तर गौरबाई भरमशेट्टी, काशाप्पा पुजारी, शांताबाई फसगे, श्रीकांत बकरे, जयश्री भरमशेट्टी, गौतम बाळशंकर, नीता सोनकांबळे भरघोस मताने निवडून आले.

चप्पळगाव हे गाव नेहमी राजकीयदृष्ट्या वादग्रस्त गाव. या ठिकाणी बेहिशेबी पुढारी मात्र कोण कधी कोणाला दणका देतील याचा नेम नाही. या गावात यंदा बाजार समिती उपसभापती आप्पासाहेब पाटील, उमेश पाटील, बसवराज बानेगाव, सिद्धाराम भंडारकवटे, रियाज पटेल यांनी स्थानिक गट तयार करून निर्विवाद यश संपादन केले. त्यामधून सुवर्णा कोळी, सिद्धाराम भंडारकवटे, अपर्णा बानेगाव, वंदना कांबळे, रेश्मा तांबोळी, उमेश पाटील, स्वामीराव जाधव, चित्रकला कांबळे, श्रीकांत गजधाने, गंगाबाई वाले, तर धनश्री वाले, गौराबाई अचलेरे, मल्लिनाथ सोनार यांनी यश मिळविले.

मोटयाळ ग्रामपंचायतमध्ये यंदा चौथ्यांदा विजयी होण्यास युवक नेते कार्तिक पाटील, पठाण गटाला यश आले आहे. गोरगरिबांसाठी त्यांनी आजवर सत्तेच्या माध्यमातून केलेले काम त्यांना तारले आहे. आणि स्वतः पाटील, सोनाली सुरवसे, हालीमा फुलारी, विजय गेजगे अशा चार जणांना संधी मिळाली. तर विरोधक अप्पाराव साळुंखे गटानेही संघर्ष आजही सुरू ठेवले असून, त्यांनाही यंदा स्वतः साळुंखे, संगीता सपकाळ, निर्मला सुतार अशा तीन जागा मिळाल्या.

चप्पळगाव वाडीत दोड्याळे, पारशेट्टी, नदाफ,बंने गटाला अतिआत्मविश्वास नडला. आणि विरोधी गटाचे अंकलगी, गोविंदे, दोड्याळे,नदाफ, पारशेट्टी, बन्ने गटाने सर्व जागा जिंकून बाजी मारली. लक्ष्मीबाई अंकलगे, पंडित दोड्याळे, निर्मला पारशेट्टी, ललिता बंने, जावेद नदाफ, उज्वला गोविंदे, श्रीमती नदाफ हे उमेदवार निवडून आले.

चुंगीत सत्ताधारी आशाराणी गड्डे यांचे भ्रष्टाचार मुद्द्यावरून प्रकरण गाजले. यामुळे त्यांची प्रतिमा खराब होऊन दहा वर्षे गावावर असलेली सत्ता गमवावी लागली. पूर्वीच्या सत्ताधारी माने, पाटील गटाला चांगले यश मिळाले. शांताबाई चव्हाण, रत्नमाला चव्हाण, सारिका चव्हाण, महादेव माने, ज्योती लोहार, वृषाली माने, रुक्मिणी साळुंखे, जनाबाई थोरे, रुक्मिणी राठोड यांनी विजयाची सलामी दिली.

----एक मताच्या फरकाने विजयी---

चप्पळगाव येथे रवी शिरगुरे यांचा स्वामीराव जाधव यांनी पराभव केला, तर चप्पळगाव वाडी येथे सुरेखा पारशेट्टी यांच्यावर निर्मला पारशेट्टी यांनी मात केली. अशा दोन्ही ठिकाणी केवळ एक मताच्या फरकाने बाजी मारली आहे. पाचही गावांत मिळून ४७ सदस्यसंख्या आहे. तब्बल ३१ ठिकाणी महिलांना ग्रामपंचायतमध्ये संधी मिळाली आहे.

----

फोटोओळी

हन्नूर येथे आमदार कल्याणशेट्टी व भरमशेट्टी गटाने एकतर्फी बाजी मारल्यानंतर जल्लोष करताना सदस्य.