शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महिलांनो शासकीय योजनांचा लाभ घ्या: माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:40 IST

महिलांनी स्वतः सर्व योजनांची माहिती करून घ्यावी व स्वतः पुढे येऊन शासकीय योजनांचा उपयोग करून घेतला पाहिजे. तरच महिलांची ...

महिलांनी स्वतः सर्व योजनांची माहिती करून घ्यावी व स्वतः पुढे येऊन शासकीय योजनांचा उपयोग करून घेतला पाहिजे. तरच महिलांची प्रगती होईल, असे प्रतिपादन तहसीलदार समीर माने यांनी जेऊर येथे आयोजित एकल महिला मेळाव्यात उद्‌घाटनप्रसंगी बोलताना केेले.

याप्रसंगी अविनाश थोरात, विस्तार अधिकारी पंचायत समिती करमाळा यांनी विविध घरकुल योजना व त्याची अंमलबजावणी याबाबत महिलांना माहिती दिली. उमेद स्वयंसहायता समूह प्रकल्प प्रमुख पंढरीनाथ ठाणगे यांनी बचत गट निर्मिती व महिलांच्या विकासासाठी बचत गटांचा उपयोग यावर मार्गदर्शन केले. उमाकांत पडवळ यांनी स्वयंरोजगाराच्या विविध योजना व प्रशिक्षण याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचा उद्देशाची माहिती ॲड. सविता शिंदे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली.

कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन वेगवेगळ्या शासकीय योजनांचे फॉर्म प्रत्यक्षरित्या महिलांकडून स्वीकारले. कार्यक्रमांमध्ये जेऊर व परिसरातील आठशे महिलांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया कर्णवर यांनी तर आभार माया कदम यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्पा कर्चे, वैशाली घोडके, अंजना साळुंखे, वंदना घोडके, मनिषा ठोंबरे, आशा चांदणे, मनीषा साळवे, गायत्री कुलकर्णी, शारदा सुतार तसेच ग्रामपंचायत जेऊरचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : १७जेऊर-मेळावा

जेऊर येथे आयोजित एकल महिला मेळव्यात बोलताना तहसिलदार समीर माने.