शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पारदर्शक तलाठी भरती न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार! स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा इशारा 

By संताजी शिंदे | Updated: August 29, 2023 16:41 IST

राज्य शासनाच्या विविध सरळ सेवा परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.

सोलापूर: पारदर्शक तलाठी भरती न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशारा, एमपीएससी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत शिरूर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन आजारी दिला आहे. राज्य शासनाच्या विविध सरळ सेवा परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पेपर फुटी संदर्भात विधिमंडळात कायदा करावा आणि २०१९ ची तलाठी भरती  प्रक्रिया संदर्भात एसआयटी नेमून चौकशी करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यानंतर २०२३ ची तलाठी परीक्षेमध्ये सुद्धा गैरप्रकार आढळून येत आहे.  राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर घोटाळाबाजांचा सुळसुळाट वाढत आहे. दलाल,भ्रष्ट अधिकारी आणि घोटाळाबाज्यांच्या माध्यमातून पेपर फोडण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळे ही या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला आहे. ही परीक्षा ताबडतोब थांबून पुन्हा एकदा नामांकित व चांगल्या कंपनीला परीक्षा घेण्यास परवानगी देऊन लाखो विद्यार्थ्यांना जे की होतकरू प्रामाणिक, योग्यताधारक आहेत अशा विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा परिक्षा संदर्भात आम्हांस रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. 

शासन विद्यार्थ्यांचे आर्थिक खच्चीकरण करत आहे -- महाराष्ट्र शासनाच्या सर्वच परीक्षांमध्ये असे घोटाळे होत असेल तर ही परीक्षा घेऊन प्रशासन गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांचा महसूल गोळा करून विद्यार्थ्यांचे आर्थिक, मानसिक खच्चीकरण करत आहे. - सोलापूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर सुद्धा शासनाने कडक असे बंदोबस्त ठेवला पाहिजे जर परीक्षा पारदर्शकपणे नियोजनबद्ध व वेळेत घेऊन न्याय देता येत नसेल तर आम्हाला उच्च न्यायालयात जावा लागेल व विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर  लवकरात लवकर आम्ही उतरणार आहोत, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी