शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जिल्हा बँक कोणी अडचणीत आणली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:22 IST

महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारसभा कासेगाव, नंदेश्वर आदी भागात झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय ...

महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारसभा कासेगाव, नंदेश्वर आदी भागात झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, सुरेश घुले, उमेश पाटील, कल्याणराव काळे, दीपक साळुंखे, उत्तम जानकर, भगीरथ भालके आदी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही आमच्या भागातील सहकारी संस्था चांगल्या चालविल्या आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. इथं मात्र वेगळे आहे. मोठ्यांची मुलं काहीतरी करतील म्हणून आम्ही त्यांना आमदार, खासदार केलं. त्यांच्या ताब्यात जिल्हा बँकेसह इतर संस्था दिल्या. मात्र त्या चुकीच्या पद्धतीने चालवून अडचणीत आणल्या. त्यांचा स्वतःचा शंकर कारखाना चालवता येत नाही, त्याचे वाटोळे केलं आणि इथं मत मागायला येतात, आशी टीका आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर केली.

जे बारामतीत निवडणुकीला आले त्यांचं डिपॉझिट त्यांना राखता आले नाही. ते इथं येऊन मोठमोठ्या गप्पा मारतात, अशी टीका गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. दुसरा एक मोठा नेता इथं प्रचाराला आला ते अनेक वर्षे मंत्री, आमदार असूनही त्यांचा दत्तात्रय भरणेंनी सलग दोनवेळा पराभव केला. त्यांना समजलंही नाही. त्यांनी तिथं कामं केली असती तर त्यांना तेथील जनतेने नाकारले असते का? असे म्हणत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. तरीही ते इथं येऊन कोणत्या तोंडाने मत मागतात, असा प्रश्न अजित पवार यांनी केला.