शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

टोलनाके कधी बंद होणार ?

By admin | Updated: June 11, 2014 00:32 IST

आमदारांनो लक्ष द्या : शहरातील रस्ते खराब; तरीही वाहनधारक देताहेत टोल

सोलापूर:महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शहरात केलेले रस्ते पूर्णपणे खराब झाले असताना चार ठिकाणी टोल द्यायचा कशाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला; मग सोलापूरबद्दल आवाज कोण उठविणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़याबाबत सोलापुरातील आमदारांकडेच लक्ष लागले आहे़ एमएसआरडीसीने टोलच्या माध्यमातून सुमारे ३० कोटींचा गल्ला जमा केला आहे़ कोल्हापुरात सोलापूर शहराच्या कितीतर पटीने रस्ते विकास महामंडळाने मजबूत आणि चांगले रस्ते केले, नियमानुसार कोल्हापूरकरांनी टोल दिलाच पाहिजे, असे असतानाही तेथील नागरिक टोलविरोधात रस्त्यावर उतरतात़ सोलापुरातील स्थिती मात्र विचित्र आहे़ एमएसआरडीसीने केलेले सर्व रस्ते खराब झाले आहेत़ एकाही रस्त्याचा टोल द्यावा अशी स्थिती नसताना सोलापूर-बार्शी, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-होटगी आणि सोलापूर-देगाव या मार्गावर टोलवसुली गेल्या ८ वर्षांपासून सुरू आहे़ टोलवसुली एमएसआरडीसीकडे आणि देखभाल दुरुस्ती महापालिकेकडे असा अजब करार मनपा आणि एमएसआरडीसीमध्ये झाला आहे़ दुसऱ्या टप्प्याचा पत्ता नाही, पहिल्या टप्प्यातील रस्ते अर्धवट आणि तेही उखडलेले असे असताना टोलवसुली सुरू आहे़ सध्या टोलनाक्यावर एईपी ही कंपनी टोल वसूल करीत आहे़शहरात ९१़५० कोटींचा रस्ते प्रकल्प असताना अवघ्या ७८ कोटींचे रस्ते झाले़ १ जून २००६ पासून या रस्त्यावर टोलवसुली सुरू आहे़ शिवाजी चौक ते सम्राट चौक ते दयानंद महाविद्यालय, जुना बोरामणी नाका ते शांती चौक, अशोक चौक, गुरुनानक चौक ते विजापूर रोड हा रिंगरुट रस्ता, रिपन हॉल ते पार्क चौक ते भैय्या चौकमार्गे कोयनानगर रस्ता, सरस्वती चौक ते होटगी रोड रस्ता, जुना पुणे नाका ते अवंतीनगर, मोदी पोलीस चौकी ते विजापूर रोड क्रॉस आणि बाळे गावातील मुख्य रस्ता हे रस्ते विकास महामंडळाने केलेले आहेत़ यातील एखादा रस्ता सोडला तर एकही रस्ता चांगला नाही. तरीही बाळे, अक्कलकोट रोड, सिद्धेश्वर कारखाना आणि देगाव येथे एमएसआरडीसीच्या वतीने टोलवसुली करण्यात येते़ हा टोल आणखी २१ वर्षे वसूल केला जाणार आहे़ याबाबत आता लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे़ -------------------------टोल बंदची घोषणा; मात्र टोल सुरूचशासनाने विधानसभेत राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला़ यामध्ये सोलापुरातील आठ टोलनाक्यांचा समावेश आहे़ मात्र मंगळवारी या ठिकाणी टोलवसुली सुरूच होती़ कुर्डूवाडी बाह्यवळण, मरवडे चेकपोस्ट, पंढरपूर-मोहोळ, सोलापूर-बार्शी, दुधनी नाका, करमाळा बाह्यवळण, कासेगाव टोलनाका आणि मांगी टोलनाका बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू केली नाही़सोलापुरात देगाव, बार्शी नाका, अक्कलकोट नाका आणि होटगी रोडवरील साखर कारखाना या चार ठिकाणी एमएसआरडीसीचे टोल नाके आहेत.----------------------------शहरातील एमएसआरडीसीकडून केलेले रस्ते अत्यंत खराब झाले असून त्याची देखभाल दुरुस्ती देखील केली जात नाही. त्यामुळे टोल कशासाठी द्यायचा? हा प्रश्न आहे़ मुख्यमंत्र्यांना बुधवारी भेटून हे टोल बंद करावेत, अशी मागणी करणार आहे़- दिलीप मानेआमदार, दक्षिण सोलापूर