शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

टोलनाके कधी बंद होणार ?

By admin | Updated: June 11, 2014 00:32 IST

आमदारांनो लक्ष द्या : शहरातील रस्ते खराब; तरीही वाहनधारक देताहेत टोल

सोलापूर:महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शहरात केलेले रस्ते पूर्णपणे खराब झाले असताना चार ठिकाणी टोल द्यायचा कशाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला; मग सोलापूरबद्दल आवाज कोण उठविणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़याबाबत सोलापुरातील आमदारांकडेच लक्ष लागले आहे़ एमएसआरडीसीने टोलच्या माध्यमातून सुमारे ३० कोटींचा गल्ला जमा केला आहे़ कोल्हापुरात सोलापूर शहराच्या कितीतर पटीने रस्ते विकास महामंडळाने मजबूत आणि चांगले रस्ते केले, नियमानुसार कोल्हापूरकरांनी टोल दिलाच पाहिजे, असे असतानाही तेथील नागरिक टोलविरोधात रस्त्यावर उतरतात़ सोलापुरातील स्थिती मात्र विचित्र आहे़ एमएसआरडीसीने केलेले सर्व रस्ते खराब झाले आहेत़ एकाही रस्त्याचा टोल द्यावा अशी स्थिती नसताना सोलापूर-बार्शी, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-होटगी आणि सोलापूर-देगाव या मार्गावर टोलवसुली गेल्या ८ वर्षांपासून सुरू आहे़ टोलवसुली एमएसआरडीसीकडे आणि देखभाल दुरुस्ती महापालिकेकडे असा अजब करार मनपा आणि एमएसआरडीसीमध्ये झाला आहे़ दुसऱ्या टप्प्याचा पत्ता नाही, पहिल्या टप्प्यातील रस्ते अर्धवट आणि तेही उखडलेले असे असताना टोलवसुली सुरू आहे़ सध्या टोलनाक्यावर एईपी ही कंपनी टोल वसूल करीत आहे़शहरात ९१़५० कोटींचा रस्ते प्रकल्प असताना अवघ्या ७८ कोटींचे रस्ते झाले़ १ जून २००६ पासून या रस्त्यावर टोलवसुली सुरू आहे़ शिवाजी चौक ते सम्राट चौक ते दयानंद महाविद्यालय, जुना बोरामणी नाका ते शांती चौक, अशोक चौक, गुरुनानक चौक ते विजापूर रोड हा रिंगरुट रस्ता, रिपन हॉल ते पार्क चौक ते भैय्या चौकमार्गे कोयनानगर रस्ता, सरस्वती चौक ते होटगी रोड रस्ता, जुना पुणे नाका ते अवंतीनगर, मोदी पोलीस चौकी ते विजापूर रोड क्रॉस आणि बाळे गावातील मुख्य रस्ता हे रस्ते विकास महामंडळाने केलेले आहेत़ यातील एखादा रस्ता सोडला तर एकही रस्ता चांगला नाही. तरीही बाळे, अक्कलकोट रोड, सिद्धेश्वर कारखाना आणि देगाव येथे एमएसआरडीसीच्या वतीने टोलवसुली करण्यात येते़ हा टोल आणखी २१ वर्षे वसूल केला जाणार आहे़ याबाबत आता लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे़ -------------------------टोल बंदची घोषणा; मात्र टोल सुरूचशासनाने विधानसभेत राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला़ यामध्ये सोलापुरातील आठ टोलनाक्यांचा समावेश आहे़ मात्र मंगळवारी या ठिकाणी टोलवसुली सुरूच होती़ कुर्डूवाडी बाह्यवळण, मरवडे चेकपोस्ट, पंढरपूर-मोहोळ, सोलापूर-बार्शी, दुधनी नाका, करमाळा बाह्यवळण, कासेगाव टोलनाका आणि मांगी टोलनाका बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू केली नाही़सोलापुरात देगाव, बार्शी नाका, अक्कलकोट नाका आणि होटगी रोडवरील साखर कारखाना या चार ठिकाणी एमएसआरडीसीचे टोल नाके आहेत.----------------------------शहरातील एमएसआरडीसीकडून केलेले रस्ते अत्यंत खराब झाले असून त्याची देखभाल दुरुस्ती देखील केली जात नाही. त्यामुळे टोल कशासाठी द्यायचा? हा प्रश्न आहे़ मुख्यमंत्र्यांना बुधवारी भेटून हे टोल बंद करावेत, अशी मागणी करणार आहे़- दिलीप मानेआमदार, दक्षिण सोलापूर