शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

टोलनाके कधी बंद होणार ?

By admin | Updated: June 11, 2014 00:32 IST

आमदारांनो लक्ष द्या : शहरातील रस्ते खराब; तरीही वाहनधारक देताहेत टोल

सोलापूर:महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शहरात केलेले रस्ते पूर्णपणे खराब झाले असताना चार ठिकाणी टोल द्यायचा कशाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला; मग सोलापूरबद्दल आवाज कोण उठविणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़याबाबत सोलापुरातील आमदारांकडेच लक्ष लागले आहे़ एमएसआरडीसीने टोलच्या माध्यमातून सुमारे ३० कोटींचा गल्ला जमा केला आहे़ कोल्हापुरात सोलापूर शहराच्या कितीतर पटीने रस्ते विकास महामंडळाने मजबूत आणि चांगले रस्ते केले, नियमानुसार कोल्हापूरकरांनी टोल दिलाच पाहिजे, असे असतानाही तेथील नागरिक टोलविरोधात रस्त्यावर उतरतात़ सोलापुरातील स्थिती मात्र विचित्र आहे़ एमएसआरडीसीने केलेले सर्व रस्ते खराब झाले आहेत़ एकाही रस्त्याचा टोल द्यावा अशी स्थिती नसताना सोलापूर-बार्शी, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-होटगी आणि सोलापूर-देगाव या मार्गावर टोलवसुली गेल्या ८ वर्षांपासून सुरू आहे़ टोलवसुली एमएसआरडीसीकडे आणि देखभाल दुरुस्ती महापालिकेकडे असा अजब करार मनपा आणि एमएसआरडीसीमध्ये झाला आहे़ दुसऱ्या टप्प्याचा पत्ता नाही, पहिल्या टप्प्यातील रस्ते अर्धवट आणि तेही उखडलेले असे असताना टोलवसुली सुरू आहे़ सध्या टोलनाक्यावर एईपी ही कंपनी टोल वसूल करीत आहे़शहरात ९१़५० कोटींचा रस्ते प्रकल्प असताना अवघ्या ७८ कोटींचे रस्ते झाले़ १ जून २००६ पासून या रस्त्यावर टोलवसुली सुरू आहे़ शिवाजी चौक ते सम्राट चौक ते दयानंद महाविद्यालय, जुना बोरामणी नाका ते शांती चौक, अशोक चौक, गुरुनानक चौक ते विजापूर रोड हा रिंगरुट रस्ता, रिपन हॉल ते पार्क चौक ते भैय्या चौकमार्गे कोयनानगर रस्ता, सरस्वती चौक ते होटगी रोड रस्ता, जुना पुणे नाका ते अवंतीनगर, मोदी पोलीस चौकी ते विजापूर रोड क्रॉस आणि बाळे गावातील मुख्य रस्ता हे रस्ते विकास महामंडळाने केलेले आहेत़ यातील एखादा रस्ता सोडला तर एकही रस्ता चांगला नाही. तरीही बाळे, अक्कलकोट रोड, सिद्धेश्वर कारखाना आणि देगाव येथे एमएसआरडीसीच्या वतीने टोलवसुली करण्यात येते़ हा टोल आणखी २१ वर्षे वसूल केला जाणार आहे़ याबाबत आता लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे़ -------------------------टोल बंदची घोषणा; मात्र टोल सुरूचशासनाने विधानसभेत राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला़ यामध्ये सोलापुरातील आठ टोलनाक्यांचा समावेश आहे़ मात्र मंगळवारी या ठिकाणी टोलवसुली सुरूच होती़ कुर्डूवाडी बाह्यवळण, मरवडे चेकपोस्ट, पंढरपूर-मोहोळ, सोलापूर-बार्शी, दुधनी नाका, करमाळा बाह्यवळण, कासेगाव टोलनाका आणि मांगी टोलनाका बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू केली नाही़सोलापुरात देगाव, बार्शी नाका, अक्कलकोट नाका आणि होटगी रोडवरील साखर कारखाना या चार ठिकाणी एमएसआरडीसीचे टोल नाके आहेत.----------------------------शहरातील एमएसआरडीसीकडून केलेले रस्ते अत्यंत खराब झाले असून त्याची देखभाल दुरुस्ती देखील केली जात नाही. त्यामुळे टोल कशासाठी द्यायचा? हा प्रश्न आहे़ मुख्यमंत्र्यांना बुधवारी भेटून हे टोल बंद करावेत, अशी मागणी करणार आहे़- दिलीप मानेआमदार, दक्षिण सोलापूर