शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
2
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
3
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
4
Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
अनेक वर्ष एकत्र, नंतर प्रियकराचं ठरलं लग्न; व्हिडीओ बनवून तृतीयपंथीयानं संपवलं जीवन, म्हणाली...
6
७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच...
7
थरारक लव्हस्टोरी! गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने केस केली; पोलिसांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी प्रियकर थेट भारतात
8
अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाला ED चा जबर दणका; FD, बँक बॅलन्ससह १,१२० कोटींची संपत्ती जप्त
9
Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता
10
विराट कोहलीला तब्बल ७ वर्षानी पुन्हा 'ती' कामगिरी करायची संधी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
11
"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
12
मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट ०.२५% ने घटवला; तुमच्या ५० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती कमी होणार?
13
तुमचा पतीही इतर महिलांचे फोटो लाईक्स करतोय?; तुर्की कोर्टानं सुनावलेला 'हा' निकाल एकदा वाचाच
14
"मग दृष्ट कोणी लावली?", आजारपणातून बरी झाल्यानंतर जान्हवीचा सवाल, नेटकरी म्हणाले - छोटा पुढारी
15
Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
16
नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
17
२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती
18
Vladimir Putin In India : जग पुतिन यांचं विमान शोधत राहिलं, आकाशात सुरू होता रहस्यमय खेळ, दिल्लीतील लँडिंगनंतर उलगडलं गूढ!
19
RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
20
गुजरातच्या वोटर लिस्टमध्ये १७ लाख 'मृत' मतदारांची नावं! SIRने केले मोठे खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

अरे हे काय चाललयं, १५ किलोमीटरच्या अंतरातच टोल नाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST

केंद्र सरकारने धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांवर विशेष लक्ष दिले आहे. सोलापूरवरून अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूरला जाणाऱ्या रस्त्यांचा त्यात समावेश ...

केंद्र सरकारने धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांवर विशेष लक्ष दिले आहे. सोलापूरवरून अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूरला जाणाऱ्या रस्त्यांचा त्यात समावेश आहे. सहा वर्षांपूर्वी धार्मिक स्थळांना जोडणारे हे रस्ते चौपदरी करण्याचा निर्णय झाला. त्यांचे कामही तातडीने हाती घेण्यात आले. अवघ्या अडीच वर्षात सोलापूर ते अक्कलकोट हा चौपदरी सिमेंट रस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर आला आहे. मात्र अद्याप महत्त्वाचे पूल बांधकाम रखडले आहे. रस्त्यांच्या कामात प्रगती होत असली, तरी उड्डाणपूल, वळण रस्ते, जोडरस्ते, छोटे-मोठे पूल, भुयारी मार्ग ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही आणि टोल वसुलीची इतकी घाई का, असा प्रश्नल साहजिकच विचारला जात आहे.

सोलापूर आणि कुंभारी दरम्यान कुंभारीपासून एक किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जुना टोल सुरू आहे. याठिकाणी टोल प्लाझाची उभारणी केली नाही, तरीही टोल आकारला जातो. टोल सुरू झाल्यापासून स्थानिकांचा विरोध आहेच. सोलापूर शहराजवळ असल्याने अनेकवेळा नागरिकांना शहरात जावे लागते. शेतीच्या कामासाठी बरीच मंडळी वाहनातून गावाकडे येतात. त्यांना जाता-येता दोन्हीवेळेला टोल भरावा लागतो. याबाबतचा संताप कुंभारी टोल सुरू होताना व्यक्त करण्यात आला होता. आता वळसंगजवळ नवा टोल सुरू झाल्याने स्थानिकांच्या अडचणीत भर पडली आहे.

-------

समन्वय नाही म्हणून भुर्दंड

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कुंभारी येथे टोल सुरू आहे. नव्या रस्त्याच्या बांधणीनंतर हा टोल नाका बंद होण्याची अपेक्षा होती. दोन टोलमधील किमान अंतर ४० किलोमीटरपेक्षा अधिक नसेल, हा नियम आहे. मात्र, कुंभारीचा टोल सुरू असताना वळसंग टोल सुरू करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा नवीन टोल आहे. नवा टोल सुरू करताना जुना बंद झाला पाहिजे, यावर दोन्ही विभागांचे एकमत आहे. तरीही त्यांच्यात समन्वय नसल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

-------

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा कुंभारी येथील टोल बंद करण्याचा आदेश संबंधित विभागाला देण्यात आला आहे. वळसंगचा टोल सुरू होण्यापूर्वी तो बंद होण्याची गरज आहे. तसा आदेश आल्याशिवाय बंद करता येत नाही. वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.

- अनिल विपत, परिचलन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

................

प्रशासनाच्या भोंगळपणाचा फटका नागरिकांना बसतो. यात चूक नसताना अकारण गरीब जनतेला आर्थिक बोजा सहन करावा लागतो. कुंभारीचा टोल बंद व्हायला हवा. अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा केल्याचा हा परिणाम आहे.

- कृष्णात पवार, सामाजिक कार्यकर्ता, कर्देहळ्ळी