शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

अरे हे काय चाललयं, १५ किलोमीटरच्या अंतरातच टोल नाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST

केंद्र सरकारने धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांवर विशेष लक्ष दिले आहे. सोलापूरवरून अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूरला जाणाऱ्या रस्त्यांचा त्यात समावेश ...

केंद्र सरकारने धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांवर विशेष लक्ष दिले आहे. सोलापूरवरून अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूरला जाणाऱ्या रस्त्यांचा त्यात समावेश आहे. सहा वर्षांपूर्वी धार्मिक स्थळांना जोडणारे हे रस्ते चौपदरी करण्याचा निर्णय झाला. त्यांचे कामही तातडीने हाती घेण्यात आले. अवघ्या अडीच वर्षात सोलापूर ते अक्कलकोट हा चौपदरी सिमेंट रस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर आला आहे. मात्र अद्याप महत्त्वाचे पूल बांधकाम रखडले आहे. रस्त्यांच्या कामात प्रगती होत असली, तरी उड्डाणपूल, वळण रस्ते, जोडरस्ते, छोटे-मोठे पूल, भुयारी मार्ग ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही आणि टोल वसुलीची इतकी घाई का, असा प्रश्नल साहजिकच विचारला जात आहे.

सोलापूर आणि कुंभारी दरम्यान कुंभारीपासून एक किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जुना टोल सुरू आहे. याठिकाणी टोल प्लाझाची उभारणी केली नाही, तरीही टोल आकारला जातो. टोल सुरू झाल्यापासून स्थानिकांचा विरोध आहेच. सोलापूर शहराजवळ असल्याने अनेकवेळा नागरिकांना शहरात जावे लागते. शेतीच्या कामासाठी बरीच मंडळी वाहनातून गावाकडे येतात. त्यांना जाता-येता दोन्हीवेळेला टोल भरावा लागतो. याबाबतचा संताप कुंभारी टोल सुरू होताना व्यक्त करण्यात आला होता. आता वळसंगजवळ नवा टोल सुरू झाल्याने स्थानिकांच्या अडचणीत भर पडली आहे.

-------

समन्वय नाही म्हणून भुर्दंड

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कुंभारी येथे टोल सुरू आहे. नव्या रस्त्याच्या बांधणीनंतर हा टोल नाका बंद होण्याची अपेक्षा होती. दोन टोलमधील किमान अंतर ४० किलोमीटरपेक्षा अधिक नसेल, हा नियम आहे. मात्र, कुंभारीचा टोल सुरू असताना वळसंग टोल सुरू करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा नवीन टोल आहे. नवा टोल सुरू करताना जुना बंद झाला पाहिजे, यावर दोन्ही विभागांचे एकमत आहे. तरीही त्यांच्यात समन्वय नसल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

-------

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा कुंभारी येथील टोल बंद करण्याचा आदेश संबंधित विभागाला देण्यात आला आहे. वळसंगचा टोल सुरू होण्यापूर्वी तो बंद होण्याची गरज आहे. तसा आदेश आल्याशिवाय बंद करता येत नाही. वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.

- अनिल विपत, परिचलन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

................

प्रशासनाच्या भोंगळपणाचा फटका नागरिकांना बसतो. यात चूक नसताना अकारण गरीब जनतेला आर्थिक बोजा सहन करावा लागतो. कुंभारीचा टोल बंद व्हायला हवा. अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा केल्याचा हा परिणाम आहे.

- कृष्णात पवार, सामाजिक कार्यकर्ता, कर्देहळ्ळी