शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

शेतकºयाची वाट अडविणारे शिवाचार्य सामान्यांना काय देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 14:29 IST

लिंगायत समन्वय समितीचा भाजपच्या भावी उमेदवारांना खोचक सवाल

ठळक मुद्देलिंगायत समन्वय समिती ही सर्वसामान्य लिंगायत बांधवांचे प्रतिनिधीत्व करते - विजयकुमार हत्तुरेधर्मगुरू हे सकल समाजाच्या कल्याणाचा विचार करतात - विजयकुमार हत्तुरेश्रीमंत माणसे गरिबांचा विचार करायला तयार नाहीत - विजयकुमार हत्तुरे

सोलापूर : भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि त्यांच्या सहकाºयांनी अक्कलकोट तालुक्यातील शेतकºयांची वाट अडविल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी आमच्याकडे आली होती. या प्रकरणाची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. धर्मगुरु हा उदार विचारांचा असतो. शेतकºयांची वाट अडविणारे धर्मगुरू खरोखरच सर्वसामान्य शेतकºयांना न्याय देतील का, असा सवाल लिंगायत समन्वय समितीचे प्रमुख विजयकुमार हत्तुरे यांनी  केला. 

हत्तुरे म्हणाले, लिंगायत समन्वय समिती ही सर्वसामान्य लिंगायत बांधवांचे प्रतिनिधीत्व करते. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य निवडणूक लढविणार असल्याचे कळल्यानंतर अनेक भक्तांनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली. महाराजांनी निवडणूक लढवावी की लढवू नये याबद्दल आम्ही फारसे बोलणार नाही, पण आम्ही महाराजांपुढे काही प्रश्न उपस्थित करणार आहोत. त्याची उत्तरे त्यांनी जाहीरपणे द्यायला हवीत. परवाच आमच्याकडे गौडगाव बु. येथील काही शेतकरी आले होते.

होटगी येथील कै.शरणबसप्पा पाटील यांच्याकडून महास्वामी यांनी जमीन घेतली. ही जमीन घेतल्यानंतर काही दिवसांनी धोंडव्वा पाटील, परमेश्वर पाटील, जगदेवी टाकळे, शिवरुद्रप्पा पाटील यांच्यासह सहा शेतकºयांची वाट अडविण्यात आली. त्यामुळे या सर्वांनी महास्वामींना साकडे घेतले. तिथे न्याय मिळाला नाही म्हणून तहसीलदारांकडे धाव घेतली. वहिवाटीचे प्रश्न सर्वत्र आहेत. गेल्या १७ वर्षांपासून हा वाद सुरु आहे . धर्मगुरू हे सकल समाजाच्या कल्याणाचा विचार करतात. जे श्रीमंत आहेत त्यांनी गरिबांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे, असे धर्मगुरुच सांगतात. पण इथे उलटेच घडलेले आहे. श्रीमंत माणसे गरिबांचा विचार करायला तयार नाहीत. 

शेतमाल घरी आणणे कठीण- हत्तुरे म्हणाले, लिंगायत धर्मामध्ये ‘मानव धर्म के जय वागली’ असे घोषवाक्य आहे. पण गौडगाव येथील शेतकºयांची वाट अडविल्यामुळे त्यांना शेतमाल घरी आणणे कठीण झाले आहे. आम्ही महाराजांना विनंती करतो की तुम्ही या शेतकºयांना न्याय द्या. परमेश्वर पाटील, हणमंत पाटील, गणपती पाटील यांच्यासारखे अनेक शेतकरी तुम्हाला निश्चित दुआ देतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक