शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

शेतकºयांच्या जमिनी जप्त करून काय विकास करणार ? आमदार भारत भालके यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 18:33 IST

पंढरपूर तालुक्यातील शेतकºयांना जर आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर असल्या विकासाला आपला तीव्र विरोध निश्चित असेल, असा इशारा आ. भारत भालके यांनी दिला.

ठळक मुद्देपंढरपूर विकास प्राधिकरणाच्या संदर्भात नागरिकांच्या हरकतींच्या तारखा जिल्हा प्रशासनाकडून नुकत्याच जाहीर झाल्यापंढरपूर शहरातील काही रस्त्यांचे रुंदीकरणदेखील केले जाणार

पंढरपूर : विकासाला आपला कदापि विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली शहरातील सर्वसामान्य नागरिक, तालुक्यातील शेतकºयांना जर आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर असल्या विकासाला आपला तीव्र विरोध निश्चित असेल, असा इशारा आ. भारत भालके यांनी दिला. शहराचा विकास सोडून ग्रामीण भागातील शेतकºयांच्या जमिनी जप्त करून काय विकास साधणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पंढरपुरातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पुढे आ. भारत भालके म्हणाले, प्रथम शहरालगतच्या भागाचा विकास करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कामाबाबात जमीन मालकांना नोटिसा न देताच, जागा ताब्यात घेण्यात येत आहे. झाडे तोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामात जमीन जाणाºया मालकांना चौपट भरपाई मिळावी; अन्यथा आंदोलन करणार आहे. शहरात प्राधिकरण, तुकाराम जन्मचतु:शताब्दी आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकासकामे केली जात आहेत. 

जो विकास शहरातील नागरिकांची कवडीमोल दर देऊन घरेदारे उद्ध्वस्त करणार असेल तसेच तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनीचा कोणताही मोबदला न देता वाट लावणारा असेल तर अशा विकासाचा काय उपयोग? पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या संदर्भात नागरिकांच्या हरकतींच्या तारखा जिल्हा प्रशासनाकडून नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.

मुळात प्राधिकरणामध्ये पंढरपूर शहराचा, पालखी तळाचा, पालखी मार्गांचा विकास अपेक्षित आहे. मात्र तालुक्यातील ज्या विविध गावांचा शहरात भरणाºया यात्रांशी काहीही संबंध नाही त्या गावातील जमिनी विकासकामांच्या नावाखाली शेतकºयांकडून काढून घेतल्या जात असतील तर असला विकास काय कामाचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शहरातील काही रस्त्यांचे रुंदीकरणदेखील केले जाणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्त्याचा मध्य पकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी समान अंतरावर मार्किंग करून त्याप्रमाणे रुंदीकरण अपेक्षित असते. मात्र रुंदीकरण करताना हा अपला, तो परका असा भेदाभेद करीत हेतुपुरस्सर काही विरोधी मंडळींना बाधित करून नोटिसा बजावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याबरोबरच बाधित मालमत्ताधारकांना बाजारभाव अधिक चौपट दर अशा पद्धतीने मोबदला दिला पाहिजे, अशी मागणी आ. भालके यांनी केली.

कचराकुंडीखाली हजारो अळ्या- स्वच्छतेच्या नावाखाली प्रत्येक नागरिकाच्या खिशातून पैसे काढले जातात. मात्र शहरातील कचराकुंडीखाली हजारो अळ्या आहेत. विरोधी नगरसेवकांनी व्हिडीओ दाखविला तरी, प्रशासन याबाबत गंभीर नाही. चंद्रभागा नदीपात्रात मैलामिमिश्रित पाणी मिसळत आहे. चंद्रभागेतून वाळूचोरी होत आहे. मात्र प्रशासन नदीपात्रात म्हशींना बंदी घालणे, होड्यांना बंदी करण्यामध्ये गुंतले आहेत.

अधिकाºयांना सुनावले खडे बोलशहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे उपजिल्हा रुग्णालय आणि पालिका प्रशासनातील अधिकाºयांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी विविध शासकीय विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्यासाठी संबंधित अधिकाºयांना आपण खडे बोल सुनावल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरBharat Bhakkeभारत भालकेPandharpurपंढरपूर