शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कर्तृत्ववान माणसांमुळे सुसंस्कृत समाज घडतो, सुशीलकुमार शिंदे यांचे मत, हन्नूरच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात नेतेमंडळींनी मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 11:48 IST

हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरमशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त के. बी. प्रतिष्ठानतर्फे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले.

ठळक मुद्देकुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद भरमशेट्टी यांच्याकडे होतीप्रा.मधुकर जाधव यांनी संपादित केलेल्या ‘काशिनाथ एक दीपस्तंभ’ या ग्रंथाचे प्रकाशन के. बी. प्रतिष्ठान बहुउद्देशीय समाजसेवा प्रतिष्ठानच्या नामफलकाचे उद्घाटनही आ. म्हेत्रे यांनी केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरचपळगाव दि १० : स्वर्गीय काशिनाथ भरमशेट्टी हे एक निगर्वी, सुस्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने या परिसराचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसांमुळेच सुसंस्कृत समाज घडतो. त्यांचे अधुरे कार्य पुढे नेणे हीच त्यांना पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरमशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त के. बी. प्रतिष्ठानतर्फे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी होते. यावेळी आ. सिद्धाराम म्हेत्रे, माजी आ. सिद्रामप्पा पाटील, माजी आ. शामल बागल, शिवशरण पाटील, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे,सभापती सुरेखा काटगाव,कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उपसभापती प्रकाश हिप्परगी, डॉ. सुवर्णा मलगोंडा, बाळासाहेब मोरे, सुदीप चाकोते, चेतन नरोटे, सिद्धार्थ गायकवाड, दिलीप बिराजदार, विश्वनाथ भरमशेट्टी, राजू भरमशेट्टी, डॉ. नेहा भरमशेट्टी, क्रांती भरमशेट्टी, सचिन भरमशेट्टी, व्यंकट मोरे, बब्रुवाहन माने उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. नेहा भरमशेट्टी यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा.मधुकर जाधव यांनी संपादित केलेल्या ‘काशिनाथ एक दीपस्तंभ’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. के. बी. प्रतिष्ठान बहुउद्देशीय समाजसेवा प्रतिष्ठानच्या नामफलकाचे उद्घाटनही आ. म्हेत्रे यांनी केले.सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद भरमशेट्टी यांच्याकडे होती.त्यांच्या हयातीच्या काळात त्यांनी कुरनूर धरण, आठ एकर स्लॅबबद्दल प्रभावीपणे काम करून या भागातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. यावेळी सिद्रामप्पा आलुरे, आ. सिद्धाराम म्हेत्रे, सिद्रामप्पा पाटील यांची भाषणे झाली. काशिनाथ भरमशेट्टी यांच्यामुळेच आ. म्हेत्रे व माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याचे पाटील यांनी सांगितले. अशपाक बळोरगी,भीमा कापसे, अण्णाप्पा अळ्ळीमोरे, राजशेखर पाटील, काशिनाथ गोळ्ळे, भारत जाधव, स्वामीनाथ हरवाळकर, निलप्पा घोडके, सोपान निकते, शैलेश पाटील, इसहाक पटेल, डॉ. आप्पासाहेब उमदी, चंद्रकांत जंगले, संजय बाणेगाव, सातलिंग शटगार, अरुण जाधव, बसवराज सुतार, सोपान निकते, मल्लिनाथ भरमशेट्टी, विठ्ठल भरमशेट्टी, आप्पाशा हताळे, अनिल बिडवे, निरंजन हेगडे, नरेंद्र जंगले उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश सुरवसे व हत्तुरे यांनी केले तर  कार्यक्रमाच्या शेवटी आभार नीलेश भरमशेट्टी यांनी मानले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे