शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्ववान माणसांमुळे सुसंस्कृत समाज घडतो, सुशीलकुमार शिंदे यांचे मत, हन्नूरच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात नेतेमंडळींनी मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 11:48 IST

हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरमशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त के. बी. प्रतिष्ठानतर्फे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले.

ठळक मुद्देकुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद भरमशेट्टी यांच्याकडे होतीप्रा.मधुकर जाधव यांनी संपादित केलेल्या ‘काशिनाथ एक दीपस्तंभ’ या ग्रंथाचे प्रकाशन के. बी. प्रतिष्ठान बहुउद्देशीय समाजसेवा प्रतिष्ठानच्या नामफलकाचे उद्घाटनही आ. म्हेत्रे यांनी केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरचपळगाव दि १० : स्वर्गीय काशिनाथ भरमशेट्टी हे एक निगर्वी, सुस्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने या परिसराचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसांमुळेच सुसंस्कृत समाज घडतो. त्यांचे अधुरे कार्य पुढे नेणे हीच त्यांना पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरमशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त के. बी. प्रतिष्ठानतर्फे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी होते. यावेळी आ. सिद्धाराम म्हेत्रे, माजी आ. सिद्रामप्पा पाटील, माजी आ. शामल बागल, शिवशरण पाटील, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे,सभापती सुरेखा काटगाव,कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उपसभापती प्रकाश हिप्परगी, डॉ. सुवर्णा मलगोंडा, बाळासाहेब मोरे, सुदीप चाकोते, चेतन नरोटे, सिद्धार्थ गायकवाड, दिलीप बिराजदार, विश्वनाथ भरमशेट्टी, राजू भरमशेट्टी, डॉ. नेहा भरमशेट्टी, क्रांती भरमशेट्टी, सचिन भरमशेट्टी, व्यंकट मोरे, बब्रुवाहन माने उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. नेहा भरमशेट्टी यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा.मधुकर जाधव यांनी संपादित केलेल्या ‘काशिनाथ एक दीपस्तंभ’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. के. बी. प्रतिष्ठान बहुउद्देशीय समाजसेवा प्रतिष्ठानच्या नामफलकाचे उद्घाटनही आ. म्हेत्रे यांनी केले.सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद भरमशेट्टी यांच्याकडे होती.त्यांच्या हयातीच्या काळात त्यांनी कुरनूर धरण, आठ एकर स्लॅबबद्दल प्रभावीपणे काम करून या भागातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. यावेळी सिद्रामप्पा आलुरे, आ. सिद्धाराम म्हेत्रे, सिद्रामप्पा पाटील यांची भाषणे झाली. काशिनाथ भरमशेट्टी यांच्यामुळेच आ. म्हेत्रे व माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याचे पाटील यांनी सांगितले. अशपाक बळोरगी,भीमा कापसे, अण्णाप्पा अळ्ळीमोरे, राजशेखर पाटील, काशिनाथ गोळ्ळे, भारत जाधव, स्वामीनाथ हरवाळकर, निलप्पा घोडके, सोपान निकते, शैलेश पाटील, इसहाक पटेल, डॉ. आप्पासाहेब उमदी, चंद्रकांत जंगले, संजय बाणेगाव, सातलिंग शटगार, अरुण जाधव, बसवराज सुतार, सोपान निकते, मल्लिनाथ भरमशेट्टी, विठ्ठल भरमशेट्टी, आप्पाशा हताळे, अनिल बिडवे, निरंजन हेगडे, नरेंद्र जंगले उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश सुरवसे व हत्तुरे यांनी केले तर  कार्यक्रमाच्या शेवटी आभार नीलेश भरमशेट्टी यांनी मानले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे