शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

आमचाही माल दिल्लीच्या बाजारपेठेत जावा म्हणून आम्ही उत्सुक आहोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:25 IST

मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या किसान रेल्वेच्या वाहतूक सेवेला शेतकऱ्यांमधून मोठा प्रतिसाद मिळू लागला होता. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दोन ...

मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या किसान रेल्वेच्या वाहतूक सेवेला शेतकऱ्यांमधून मोठा प्रतिसाद मिळू लागला होता. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दोन पैसे मिळू लागले असतानाच कुर्डूवाडी व जेऊर स्थानकावरील लोडिंग बंद केले आहे. प्रतिसाद वाढल्यानंतर डब्यांची संख्या वाढणे अपेक्षित असताना ते कमी होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सांगोला येथून लोडिंग सुरू असले तरी सर्व शेतकऱ्यांना जागा उपलब्ध होत नाही. करमाळा, माढा, परांडा, माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगोला येथे माल घेऊन जाणे गैरसोयीचे व जादा खर्चिक आहे. सध्या भाजीपाल्याचे दर फारच खाली आले आहेत. दिल्ली बाजारपेठेत माल गेल्यावर शेतकऱ्यांना दर चांगला मिळतो व उर्वरित शेतमालाला स्थानिक बाजारपेठेतही दर मिळेल. मात्र, किसान रेल्वे सुविधा बंद असल्याने शेतकऱ्यांना सध्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

----

कुर्डुवाडी व जेऊर स्थानकावर शेतमालाची दीडशे टनांपर्यंत आवक येते. अशावेळी जादा डब्यांची सोय करणे, आठवड्यातून दोनऐवजी तीन वेळा ही गाडी सोडणे अपेक्षित आहे. या दोन स्थानकांवरील लोडिंग बंद झाल्याने शेतकऱ्यांची लिंक तुटून मोठे नुकसान होणार आहे.

- किरण डोके, प्रगतशील शेतकरी, कंदर

---