शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

जगण्याचा पासवर्ड चुकतोय म्हणून आपण सारे दु:खी : चंद्रशेखर फडणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:39 IST

उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ, सोलापूर तसेच रोटरी क्लब आॅफ सोलापूर एमआयडीसीच्या वतीने आयोजित बौद्धिक व्याख्यानमाला

ठळक मुद्देआज अनेकांच्या घरी रोज ज्ञानेश्वरीचे पारायण चालते. ज्या घरात ज्ञानेश्वरीचे पारायण चालते त्या घरात सुखसमृद्धी असायला हवी - फडणीसआज घराघरात सासू-सुनांची भांडणे कशापायी होतात?. आपण सारे अशांत, अस्वस्थ का आहोत?, याचे सखोल चिंतन  होणे अपेक्षित आहे - फडणीस

सोलापूर :  सुखी जीवनाचे अनेक चांगले पर्याय आपल्या संतांनी सांगितलेत. आपण संतांचे विचार नुसते बोलतोय पण त्यांचे विचार आचरणात आणत नाही. त्यामुळे आपल्याला वारंवार डॉक्टरांकडे जावे लागते. सध्या बहुतांश आजार हे आपल्या विचारांमुळे निर्माण होतात. मुळात आपण सारे जगण्याचा योग्य पासवर्ड चुकलोय, त्यामुळे आपण सारे दु:खी आहोत. सर्वप्रथम आपले विचार बदलणे आवश्यक आहे. पॉझिटिव्ह विचार करायला लागल्यावर आपली लाईफ स्टाईल देखील बदलेल, आनंदी जीवनाचा हा मूलमंत्र कोल्हापूर येथील वक्ते चंद्रशेखर फडणीस यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिला. 

उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ, सोलापूर तसेच रोटरी क्लब आॅफ सोलापूर एमआयडीसीच्या वतीने आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत फडणीस यांनी सुखी जीवनाची व्याख्या समजावून सांगितली. सुखी जीवनाचा पासवर्ड या विषयावर फडणीस यांनी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले. येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात व्याख्यान झाले. गुरुवारी मूळचे सोलापूरचे डीआरडीओचे ज्येष्ठ वैज्ञानिक विनायक नागेली हे बलस्यं मुलं विज्ञानम या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत.

चंद्रशेखर फडणीस पुढे म्हणाले, आज अनेकांच्या घरी रोज ज्ञानेश्वरीचे पारायण चालते. ज्या घरात ज्ञानेश्वरीचे पारायण चालते त्या घरात सुखसमृद्धी असायला हवी. प्रत्यक्षात मात्र असे चित्र नाही. आज घराघरात सासू-सुनांची भांडणे कशापायी होतात?. आपण सारे अशांत, अस्वस्थ का आहोत?, याचे सखोल चिंतन  होणे अपेक्षित आहे. संतांचे विचार आपण आचरणात आणत नाही. संतांनी आपल्याला व्यापक विचार करायला सांगितले. आपण संकुचित विचार करून स्वत:ची प्रगती देखील संकुचित करून घेतो, हे चुकीचे आहे. आनंदी राहण्यासाठी निगेटिव्ह विचारांपासून लांब राहा.

टॅग्स :Solapurसोलापूर