शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

वीज बिल भरताच ४६६ पैकी ३६ योजनांचा पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST

आता ही थकीत वीजबिले भरण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी खर्च करता येतो का? याविषयीची चाचपणी पंचायत समिती स्तरावरून ...

आता ही थकीत वीजबिले भरण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी खर्च करता येतो का? याविषयीची चाचपणी पंचायत समिती स्तरावरून सुरू आहे, तर कोरोना कालावधीतील वीजबिले माफ करण्याची मागणी सरपंच संघटनेने जिल्हाधिकारी, राज्य सरकारकडे केली आहे.

कोरोना कालावधीत जवळपास सर्वच विभागाची वीजवसुली बंद होती. मात्र लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या वीज वितरणने धडक मोहीम राबवली आहे. जे ग्राहक वीजबिले भरणार नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरू आहे. पंढरपूर विभागातील ४६६ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा वीज वितरणने तातडीने खंडित केला. त्यामुळे या सर्व गावांचा सार्वजनिक पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे.

वीज वितरणाच्या कडक भूमिकेनंतर पंढरपूर विभागातील मंगळवेढा १०, सांगोला ६, पंढरपूर तालुक्यातील २० सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची काही प्रमाणात थकीत वीजबिले भरून त्यांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू केला आहे. तरी अद्याप ४३० योजनांचा वीजपुरवठा खंडित आहे. हा पाणीपुरवठा बंदच असल्याने ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

----

नागरिकांची पाण्यासाठी धडपड

पंढरपूर विभागातील ४३० गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने ग्राहकांना पिण्याच्या व घरगुती वापराच्या पाण्यासाठी आजूबाजूच्या विहिरी, आड, बोअर, हातपंपावर धाव घ्यावी लागत आहे. शेतीची घरगुती कामे सोडून नागरिकांना घागरभर पाण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आहे.

----

देशभरात कोरोना कालावधीत अनेक सवलती मिळत असताना वीज वितरणनेही सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना वीजबिले भरण्यासाठी मुदतवाढ देणे अपेक्षित होते. तालुक्यतील सरपंच संघटनांनी ही बिले पूर्णपणे माफच केली जावीत, अशी मागणी झेडपीचे सीईओ, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यानंतर १५व्या वित्त आयोगातून विकासकामांसाठी आलेल्या निधीतून या योजनांची थकीत वीजबिले भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र यामधून वीजबिले भरल्यास गावातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांवर त्याचा परिणाम होणार आहे.

- रविकिरण घोडके, गटविकास अधिकारी, पंढरपूर

----

यापूर्वी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची बिले राज्य सरकारतर्फे भरली जायची. पंढरपूर तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतींना दोन कोटींपेक्षा जास्त वीजबिले आली आहेत. त्या गावांचा वर्षाचा सर्व प्रकारचा कर वसूल केला तरीही ही रक्कम जमा होणे शक्य नाही. यामुळे गावांच्या अडचणी वाढत आहेत. सर्व थकीत वीजबिले राज्य सरकारतर्फे भरावीत, अशी मागणी आपण स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.

- संभाजी शिंदे, सदस्य, पंचायत समिती

----

आर्थिक अडचणीत असलेल्या वीजवितरणला थकीत वीजबिले वसूल केल्याशिवाय भविष्यात इस्प्रास्ट्रक्चर दुरुस्तीची कामे, कर्मचाऱ्यांचे पगार यासाठी निधी उपलब्ध होणे अवघड आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार आमची वसुली सुरू आहे. थकीत वीजबिले भरून आम्हाला सहकार्य करावे.

- एस. आर. गवळी, कार्यकारी अभियंता, पंढरपूर