शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

वांगीकरांच्या श्रमदानानं बंद हातपंप सुरू झाले अन् विहिरींची वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 20:35 IST

पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले.

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यात आजतरी पाण्याचा दुष्काळ हटलेला नाहीमागील वर्षीही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होतीगतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात गावचा वांगीरा ओढा वाहण्याइतका पाऊस पडला नाही

अरुण बारसकर

बीबीदारफळ : खळखळण्यासारखा पाऊस पडला नाही म्हणून वांगीरा ओढाही वाहिला नाही. पाण्याचा दुष्काळ पडल्याची जाणीव झाली अन् वांगीकर टिकाव, फावडे, घमेले घेऊन कामाला लागले. केलेल्या कामाचे बक्षीस तर मिळालेच शिवाय जेमतेम पावसामुळे बंद हातपंप सुरू झाले व विहिरींची पाणीपातळीही वाढली.

उत्तर सोलापूर तालुक्यात आजतरी पाण्याचा दुष्काळ हटलेला नाही. कारण पुरेसा पाऊस पडलेला नाही. मागील वर्षीही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अन्य गावांप्रमाणे वांगी गावातही पाण्याची स्थिती. गतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात गावचा वांगीरा ओढा वाहण्याइतका पाऊस पडला नाही. यामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली. काही तरी केले पाहिजे हा विचार सुरू असताना सत्यमेव जयते पानी फाउंडेशनच्या कामाची चर्चा सुरू झाली. कारण शेजारच्या भागाईवाडी, वडाळा व इतर गावांच्या एकजुटीने होणारा गावाचा विकास वांगीकरांना दिसत होता.

वांगीतील काही युवक-महिला प्रशिक्षण घेऊन आले. प्रशिक्षणात गावकºयांच्या श्रमदानातून सरकारच्या कामातून गाव बदलतंय ही धारणा झालेली. आपणही वांगीरा ओढ्याचा फायदा घ्यायचा या ईर्षेने प्रशिक्षणाला गेलेले तरुण पेटले होते. त्यांनी २०-२५ गावकºयांना सोबत घेत ८ एप्रिलला कामाचा श्रीगणेशा केला. पानी फाउंडेशनचे प्रशिक्षित पाणी अडविण्याची शास्त्रोक्त पद्धत सांगत असत. कसा तरी एप्रिल महिना सरला व मे महिना सुरू झाला. 

गावाच्या परिसरातील पाण्याचे स्रोत कोरडे पडले. ५०० फूट खोलीचे बोअरही बंद झाले तर ७०० फूट खोलीचा एखादा बोअर उचक्या देत कधी-कधी पाणी फेकू लागला. हे चित्र आपणच बदलू शकतो, ही पक्की धारणा झालेले गावकरी जोमाने कामाला लागले. शासनाची कामे, गावकºयांचे श्रमदान, सामाजिक संस्था व कंपन्यांनीही हातभार लावल्याने पाणी अडविण्याची कामे झाली.

शोषखड्ड्यांचा झाला फायदा- पावसाळा सुरू झाला अन् वांगी परिसरात रिमझिम पाऊस पडू लागला. शेतात पाणी अडविण्याची तर गावात शोषखड्ड्याची कामे झाली. तीन-चार पाऊस बºयापैकी पडला व पाणी थळथळले. जमिनीत पाणी मुरले व जिरलेही. - शोषखड्ड्यामुळे गावातील बंद पडलेले पाच हातपंप सुरू झाले तर पाणीपुरवठा बोअरचे पाणी वरती आले आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींनाही आता पाणी आले आहे. वांगीरा ओढ्यालगतच्या विहिरीत तर पाण्यात चांगली वाढ झाली आहे.

या वर्षी २२९ मि.मी. पाऊस पडला आहे. पडलेल्या पावसाचा फायदा पाणीपातळी वाढण्यासाठी झाला आहे. आणखीन चांगला पाऊस पडला तर दुष्काळ हटेल. पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले.- किसन गायकवाड वॉटर कप प्रशिक्षणार्थी

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायतSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय