शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

वांगीकरांच्या श्रमदानानं बंद हातपंप सुरू झाले अन् विहिरींची वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 20:35 IST

पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले.

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यात आजतरी पाण्याचा दुष्काळ हटलेला नाहीमागील वर्षीही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होतीगतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात गावचा वांगीरा ओढा वाहण्याइतका पाऊस पडला नाही

अरुण बारसकर

बीबीदारफळ : खळखळण्यासारखा पाऊस पडला नाही म्हणून वांगीरा ओढाही वाहिला नाही. पाण्याचा दुष्काळ पडल्याची जाणीव झाली अन् वांगीकर टिकाव, फावडे, घमेले घेऊन कामाला लागले. केलेल्या कामाचे बक्षीस तर मिळालेच शिवाय जेमतेम पावसामुळे बंद हातपंप सुरू झाले व विहिरींची पाणीपातळीही वाढली.

उत्तर सोलापूर तालुक्यात आजतरी पाण्याचा दुष्काळ हटलेला नाही. कारण पुरेसा पाऊस पडलेला नाही. मागील वर्षीही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अन्य गावांप्रमाणे वांगी गावातही पाण्याची स्थिती. गतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात गावचा वांगीरा ओढा वाहण्याइतका पाऊस पडला नाही. यामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली. काही तरी केले पाहिजे हा विचार सुरू असताना सत्यमेव जयते पानी फाउंडेशनच्या कामाची चर्चा सुरू झाली. कारण शेजारच्या भागाईवाडी, वडाळा व इतर गावांच्या एकजुटीने होणारा गावाचा विकास वांगीकरांना दिसत होता.

वांगीतील काही युवक-महिला प्रशिक्षण घेऊन आले. प्रशिक्षणात गावकºयांच्या श्रमदानातून सरकारच्या कामातून गाव बदलतंय ही धारणा झालेली. आपणही वांगीरा ओढ्याचा फायदा घ्यायचा या ईर्षेने प्रशिक्षणाला गेलेले तरुण पेटले होते. त्यांनी २०-२५ गावकºयांना सोबत घेत ८ एप्रिलला कामाचा श्रीगणेशा केला. पानी फाउंडेशनचे प्रशिक्षित पाणी अडविण्याची शास्त्रोक्त पद्धत सांगत असत. कसा तरी एप्रिल महिना सरला व मे महिना सुरू झाला. 

गावाच्या परिसरातील पाण्याचे स्रोत कोरडे पडले. ५०० फूट खोलीचे बोअरही बंद झाले तर ७०० फूट खोलीचा एखादा बोअर उचक्या देत कधी-कधी पाणी फेकू लागला. हे चित्र आपणच बदलू शकतो, ही पक्की धारणा झालेले गावकरी जोमाने कामाला लागले. शासनाची कामे, गावकºयांचे श्रमदान, सामाजिक संस्था व कंपन्यांनीही हातभार लावल्याने पाणी अडविण्याची कामे झाली.

शोषखड्ड्यांचा झाला फायदा- पावसाळा सुरू झाला अन् वांगी परिसरात रिमझिम पाऊस पडू लागला. शेतात पाणी अडविण्याची तर गावात शोषखड्ड्याची कामे झाली. तीन-चार पाऊस बºयापैकी पडला व पाणी थळथळले. जमिनीत पाणी मुरले व जिरलेही. - शोषखड्ड्यामुळे गावातील बंद पडलेले पाच हातपंप सुरू झाले तर पाणीपुरवठा बोअरचे पाणी वरती आले आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींनाही आता पाणी आले आहे. वांगीरा ओढ्यालगतच्या विहिरीत तर पाण्यात चांगली वाढ झाली आहे.

या वर्षी २२९ मि.मी. पाऊस पडला आहे. पडलेल्या पावसाचा फायदा पाणीपातळी वाढण्यासाठी झाला आहे. आणखीन चांगला पाऊस पडला तर दुष्काळ हटेल. पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले.- किसन गायकवाड वॉटर कप प्रशिक्षणार्थी

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायतSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय