शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

दहा डायरेक्टरच्या पॅनेलला मतदारांनी नाकारलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:23 IST

टेंभुर्णी : नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून संचालक असलेल्या १० संचालकांच्या ...

टेंभुर्णी : नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून संचालक असलेल्या १० संचालकांच्या नेतृत्वखालील पॅनेलला जनतेने नाकारले असून, दोन संचालकांना स्वतः पराभवास सामोरे जावे लागले आहे, तर दोन संचालकांच्या नेतृत्वाखालील गटास एकही जागा जिंकता आली नाही. दोन गावातील संचालकांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

सापटणे (टे) येथे संचालक बाळासाहेब ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. येथे माजी उपसभापती बंडूनाना ढवळे यांच्या गटाने सर्व जागा जिंकून सत्ता हस्तगत केली, तर कुंभोज येथेही संचालिका सिंधुताई नागटिळक यांचे पती सुभाष नागटिळक यांच्या गटास एकही जागा जिंकता आली नाही. येथे मदन आलदर गटाने सर्व जागा जिंकल्या. उपळाई बुद्रुक येथे संचालक सीताराम गायकवाड यांच्या गटास दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. येथे माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत देशमुख यांच्या गटाने सर्व १५ जागा जिंकून सत्ता काबीज केली.

टाकळी येथील संचालक हिम्मत सोलंकर यांच्या गटास एका जागेवर विजय मिळाला. येथे तानाजी सलगर यांच्या गटाने आठ जागा जिंकून सत्ता खेचून आणली. बेंबळे येथे संचालक विष्णू हुंबे ज्या सिद्धेश्वर ग्राम विकास आघाडीमधून उभा राहिले त्या पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले; परंतु विष्णू हुंबे यांचा पराभव झाला. मोडनिंबमध्ये संचालिका नंदाताई सुर्वे यांचाही पराभव झाला. रांजणीत संचालक वेताळ जाधव यांच्या गटाचा पराभव झाला. येथे माजी कृषी सभापती संजय पाटील भीमानगरकर यांच्या गटाने ११ पैकी ८ जागा जिंकून सत्ता आपल्याकडे ठेवली.

मानेगावात संचालक नीळकंठ पाटील व उंदरगाव येथे संचालक अमोल चव्हाण गटाचा निसटता पराभव झाला. घोटी येथे संचालक पोपट चव्हाण गटाचा, तर रिधोरे येथे पोपट गायकवाड गटाचा पराभव झाला. येथे रयत क्रांती संघटनेने सत्ता हस्तगत केली.

बारलोणीत बागलांनी सत्ता कायम राखली

बारलोणी येथे मात्र संचालक सुरेश बागल यांनी सर्वच्या सर्व ११ जागा जिंकून सत्ता आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले. पंचायत समितीचे सदस्य व्यंकटेशनाना पाटील गटाचा दारुण पराभव केला. अकोले (खुर्द) येथे स्वर्गीय संचालक बबनबापू पाटील यांच्या गटाने ११ पैकी ८ जागा जिंकून सत्ता कायम राखली. मात्र, बबनबापू पाटील यांचा मुलगा गोटू पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला.

----------स