शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

मुंबईहून सोलापूरला येणारी वंदे भारत कलबुर्गीपर्यंत धावणार; रेल्वे मंत्र्यांकडून तत्वत: मान्यता

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 10, 2023 10:57 IST

कलबुर्गी ते बिदर दरम्यान डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनीट्स ट्रेनचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्याहस्ते कलबुर्गी रेल्वे स्थानकावर झाले.

सोलापूर : मुंबईहून सोलापूरला येणारी वंदे भारत एक्सप्रेस सोलापूरहून कलबुर्गी रेल्वे स्टेशन पर्यंत नेण्याचा प्राथमिक निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतल्याची माहिती कलबुर्गीचे खासदार डॉ. उमेश जाधव यांनी दिली आहे. यासाठी त्यांचा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

कलबुर्गी ते बिदर दरम्यान डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनीट्स ट्रेनचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्याहस्ते कलबुर्गी रेल्वे स्थानकावर झाले. यावेळी त्यांनी वंदे भारत कलबुर्गी पर्यंत येणार असल्याची माहिती दिली. अधिक माहिती देताना डॉ. जाधव यांनी या वेळी सांगितले, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन वंदे भारत कलबुर्गी पर्यंत आणण्याची विनंती केली. विनंती नंतर त्यांनी यास तत्वत: मान्यता मिळाली आहे.

सध्या वंदे भारत एकशे दहा किमीने धावत आहे. लवकरच वंदे भारतची गती एकशे तीस किमी होणार आहे. त्याकरीता रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रूळांची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. जवळपास सहा महिन्यांच्या आत वंदे भारतची गती वाढणार असून त्यानंतर वंदे भारत सोलापूरहून कलबुर्गी पर्यंत धावू शकते. मुंबईहून दुपारी सव्वा चार वाजता वंदे भारत सोलापूरकडे रवाना होते. सोलापूर रेल्वे स्थानकावर ही गाडी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते. त्यानंतर ही गाडी रात्री सोलापुरात मुक्कामाला थांबते. पुन्हा सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मुंबईकडे रवाना होते. दुपारी साडे बारा दरम्यान मुंबईत ही गाडी पोहोचत. रात्री सोलापुरात मुक्काम करण्यापेक्षा ही गाडी कलबुर्गी पर्यंत नेण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस