शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के! पाच महिन्यात संपले 54 टीएमसी पाणी

By रवींद्र देशमुख | Updated: May 6, 2023 17:46 IST

ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तारांबळ होणार

रविंद्र देशमुख, सोलापूर : राज्यातील सर्वात मोठे धरण, अशी ओळख असलेल्या उजनी धरणातील ५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा अवघ्या पाच महिन्यात संपला आहे. शनिवारी दुपारी धरणातील उपयुक्त जलसाठा शून्यावर आला आहे. धरण मायनस होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तारांबळ होणार आहे.

चालू वर्षी धरणातून बेसुमार पाणी सोडले गेले. मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता. तो ८ डिसेंबरपर्यंत टिकून होता. त्यानंतरच्या काळात शेती व सोलापूरला पिण्यासाठी वेळोवेळी पाणी सोडले गेले. परिणामत: धरणातील ५४ टीएमसी उपयुक्त जलसाठा ५ महिन्यात संपला आहे.

सूर्य सध्या आग ओकत असल्याने धरणातील मृत साठ्यातील पाण्याचेही बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे दररोज धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. बॅकवॉटरवर अवलंबून असलेल्या शेतक-यांनाही दररोज विद्युत मोटारीचे पाईप व केबल वाढवून चारी खोदून पाणी उपसा करावा लागत आहे.

पळसदेवचे शिखर पाण्याबाहेर

उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी झाल्याने इंदापूर तालुक्यात पाण्यात बुडालेले पळसदेव मंदिराचे शिखर पाण्याबाहेर डोकावू लागले आहे. कालव्याद्वारे किंवा बोगद्यातून पूर्ण दाबाने पाणी सोडता येत नाही. त्यामुळे शेतक-यांना आता ऐन उन्हाळ्यात उभी पिके जगण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर