शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के! पाच महिन्यात संपले 54 टीएमसी पाणी

By रवींद्र देशमुख | Updated: May 6, 2023 17:46 IST

ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तारांबळ होणार

रविंद्र देशमुख, सोलापूर : राज्यातील सर्वात मोठे धरण, अशी ओळख असलेल्या उजनी धरणातील ५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा अवघ्या पाच महिन्यात संपला आहे. शनिवारी दुपारी धरणातील उपयुक्त जलसाठा शून्यावर आला आहे. धरण मायनस होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तारांबळ होणार आहे.

चालू वर्षी धरणातून बेसुमार पाणी सोडले गेले. मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता. तो ८ डिसेंबरपर्यंत टिकून होता. त्यानंतरच्या काळात शेती व सोलापूरला पिण्यासाठी वेळोवेळी पाणी सोडले गेले. परिणामत: धरणातील ५४ टीएमसी उपयुक्त जलसाठा ५ महिन्यात संपला आहे.

सूर्य सध्या आग ओकत असल्याने धरणातील मृत साठ्यातील पाण्याचेही बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे दररोज धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. बॅकवॉटरवर अवलंबून असलेल्या शेतक-यांनाही दररोज विद्युत मोटारीचे पाईप व केबल वाढवून चारी खोदून पाणी उपसा करावा लागत आहे.

पळसदेवचे शिखर पाण्याबाहेर

उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी झाल्याने इंदापूर तालुक्यात पाण्यात बुडालेले पळसदेव मंदिराचे शिखर पाण्याबाहेर डोकावू लागले आहे. कालव्याद्वारे किंवा बोगद्यातून पूर्ण दाबाने पाणी सोडता येत नाही. त्यामुळे शेतक-यांना आता ऐन उन्हाळ्यात उभी पिके जगण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर