शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

उर्दू ही देशाची, महाराष्ट्राचीच भाषा, सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रीय उर्दू ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 11:41 IST

गझल, शायरीसह विविध प्रकारचे साहित्य असे उर्दूमध्ये आज उपलब्ध होत आहे़ अर्थात या शहरात उर्दूप्रेमी आणि अभ्यासकांची संख्या किती मोठी आहे हे सहज लक्षात येते़ युवा पिढीला प्रोत्साहन देणारे साहित्य या संमेलनात पाहायला मिळाले़ त्यामुळे ही भाषा भारताचीच आहे

ठळक मुद्देउर्दूसाठी केंद्र फार काही करत नाही : कमल सिंगलग्नाची नोंद शासन दरबारी ठेवण्याचा आग्रह शाहूंनी धरला होता : वसुधा पवार९ दिवसीय ग्रंथ प्रदर्शनात शेवटच्या दिवसापर्यंत ६० लाख १७ हजार २४० रुपयांच्या ग्रंथसंपदेची विक्री

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १  : गझल, शायरीसह विविध प्रकारचे साहित्य असे उर्दूमध्ये आज उपलब्ध होत आहे़ अर्थात या शहरात उर्दूप्रेमी आणि अभ्यासकांची संख्या किती मोठी आहे हे सहज लक्षात येते़ युवा पिढीला प्रोत्साहन देणारे साहित्य या संमेलनात पाहायला मिळाले़ त्यामुळे ही भाषा भारताचीच आहे आणि ती महाराष्ट्राची आहे़ या महाराष्ट्रातूनच औरंगाबाद, हैदराबाद आणि इतर शहरात ती पसरत गेल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले़ सोलापूर शहरात पानगल हायस्कूलच्या मैदानावर गेल्या नऊ दिवसांपासून चाललेल्या राष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप रविवारी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत झाला़ याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संस्थापक तथा शाहू संस्थेचे संचालक जयसिंग पवार यांच्या पत्नी वसुधा पवार, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, अ़ भा़ उर्दू भाषा विकास परिषदेचे सहायक संचालक कमल सिंग, रिसर्च आॅफिसर शहानवाज खुर्रम, संमेलनाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड़ यु़ एऩ बेरिया, राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेचे असिस्टंट एज्युकेशन आॅफिसर डॉ़ मो़ फेरोज शेख, बज्मचे अध्यक्ष बशीर परवाज, सोशल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल, डॉ़ गौस शेख, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे, प्रसिद्ध गायक मो़ अयाज आणि नगरसेवक चेतन नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती़ सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, उर्दू साहित्याच्याप्रति सोलापूरकरांचे त्या भाषेवरील प्रेम हे नऊ दिवसातील ६० लाखांच्या साहित्य खरेदीवरून दिसून येत असल्याचे स्पष्टीकरण देत या भाषेचा विकास आणि विस्तार हा तालुकास्तरावरून खºया अर्थाने व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली़ शाहू महाराज हे खरोखरच इन्क्लाब का बादशहा असल्याचे म्हणाले़ प्रारंभी जयसिंग पवार लिखित शाहू महाराज पुस्तकाचे प्रकाशन झाले़ प्रास्ताविकेतून माजी महापौर अ‍ॅड़ यु़ एऩ बेरिया म्हणाले, संगणक युगात आजची पिढी ही साहित्यापासून दूर जात आहे़ ही पिढी सारे काही गुगलवर शोधते आहे, अशा स्थितीत उर्दू ग्रंथ प्रदर्शनाने नव्या पिढीला वाचन संस्कृतीकडे वळवल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले़ यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला़ सूत्रसंचालन डॉ़ अब्दुल रशीद शेख यांनी केले तर आभार आसिफ इक्बाल यांनी मानले़ ------------------उर्दूसाठी केंद्र फार काही करत नाही : कमल सिंग- सर्वश्रुत आणि सर्वप्रिय असणाºया उर्दूचे पुस्तक संमेलन सोलापुरात यशस्वीरित्या ठरल्याचे गौरवोद्गार काढत महाराष्ट्रात या उर्दूचे स्थान उंचावण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा अ़ भा़ उर्दू भाषा विकास परिषदेचे सहायक संचालक कमल सिंग यांनी व्यक्त केली़ अशा उर्दूच्या बाबतीत बोलायचे झाले तर १२९१ स्टडी सेंटर आहेत आणि केंद्र सरकार याशिवाय या भाषेच्याप्रति फार काही करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़----------------६० लाखांची साहित्य विक्री- या ९ दिवसीय ग्रंथ प्रदर्शनात शेवटच्या दिवसापर्यंत ६० लाख १७ हजार २४० रुपयांच्या ग्रंथसंपदेची विक्री झाल्याची माहिती सोशल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल यांनी याप्रसंगी जाहीर केली़ या ९ दिवसीय संमेलनात विविध प्रकारची हिंदी आणि उर्दूसह मराठी भाषेतील भाषांतरित पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली गेल्याचा उल्लेख करीत यावरून या शहराचे उर्दूवरील प्रेम स्पष्ट होते, असे म्हणाले़ ------------------लग्नाची नोंद शासन दरबारी ठेवण्याचा आग्रह शाहूंनी धरला होता : वसुधा पवारया प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बोलताना आज सरकारने ‘तलाक’संबंधी घेतलेल्या निर्णयाचा धागा पकडत छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी सर्व जाती-धर्मातील विवाह हे रजिस्टर पद्धतीने शासन दरबारी नोंदीत ठेवण्याचा आग्रह धरला होता, याची आठवण करून दिली़ आज मुस्लीम भगिनींनी त्याकाळी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा विचार करावा, असे सांगत समतेचा विचार शाहू महाराजांनी प्रभावीपणे मांडल्याचे म्हणाल्या़ त्या पुढे म्हणाल्या, शाहू महाराजांचे सर्वाधिक प्रेम हे मुस्लीम समाजावर होते़ तळागाळातील समाजातील दु:ख निवारण हे शिक्षणाशिवाय होणार नाही, हे शाहू महाराजांनी त्याकाळी ओळखून २१ वसतिगृहे बांधली़ मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह काढून दिले, त्यासाठी त्यांनी जमीन दिली़ हा समाज लवकरात लवकर पुढे यावा म्हणून जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला़

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे