शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरण, तलाव कोरडेच

By admin | Updated: July 18, 2014 01:29 IST

पावसाळ्यात पाणीसाठा घटतोय : समस्या होणार कठीण

सोलापूर: भरवशाच्या चार नक्षत्रांचा म्हणावा तसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पाणीसाठे धोक्यात आले आहेत. उजनी धरणाचा पाणीसाठा दररोज घटत असून, मध्यम व लघू प्रकल्पांतील पाण्याचीही वाढ होत नाही. मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडेच आहेत.सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी जूनपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली होती. जरी मोठा पाऊस झाला नसला तरी किमान जमिनीतील पाणीपातळी वाढण्यायोग्य पाऊस पडत होता. पावसाळ्याच्या शेवटी-शेवटी सप्टेंबरमध्ये काही भागात मोठा पाऊस झाल्याने तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली होती. पुणे व सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस पडत राहिल्याने उजनी धरणात पाणी साठ्यात दररोज भर पडत होती. यंदा याउलट चित्र आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा दररोज अंशत: कमी होत आहे. असेच चित्र मध्यम व लघू प्रकल्पांचे आहे. जिल्ह्यातील ८ पैकी एकरुख, मांगी, बुद्धेहाळ हे मध्यम प्रकल्प कोरडे असून, आष्टी तलावात २६ टक्के, हिंगणी तलावात १३ टक्के, पिंपळगाव ढाळेत १६ टक्के तर जवळगाव तलावात ६ टक्के पाणीसाठा आहे. ------------------------४८ तलाव कोरडे ठणठणीतजिल्ह्यातील ५३ पैकी पाच लघू प्रकल्पांत सध्या पाणीसाठा आहे. उर्वरित सर्वच ४८ तलाव कोरडे आहेत. होटगी तलावात २४.३७ टक्के, बीबीदारफळ तलावात १९.४२ टक्के, पाथरी तलावात ६८.५१ टक्के, कोरगाव तलावात २.४७ टक्के तर चारे तलावात ६.३६ टक्के पाणीसाठा आहे. अक्कलकोट, करमाळा, माढा, सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील सर्वच तलाव कोरडे ठणठणीत आहेत. ---------------------------मागील वर्षी ८ जून रोजी वजा ५० टक्क्यांवर गेलेली उजनी धरणाची पाणीपातळी १५ जुलै रोजी वजा १५.४९ टक्क्यांवर आली होती. पुणे जिल्ह्यातून पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने कॅनॉल व नदीद्वारे सहा हजार ७०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते़यंदा पावसाळा सुरु झाल्यानंतर दररोज उजनीचा पाणीसाठा कमी होत आहे. मंगळवारी वजा २६.५३ टक्के पाणीपातळी होती़दौंडवरुन ७४१० क्युसेक्स तर बंडगार्डनवरुन ८४३६ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत सुरू होता. यंदा आजअखेर उजनी धरणाच्या पाणी साठ्यात किंचितही वाढ झालेली नाही़