शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

दर्शनरांगेतील वारकऱ्यांसाठी दोन कोटी रुपयांचे पाणी, प्रशासनाकडून २५ लाख बाटल्या खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 12:03 IST

Pandharpur Wari: आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या वारकऱ्यांना तासन् तास रांगेत थांबावे लागते. त्यांना पाणी पिण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ विविध कंपन्यांच्या २५ लाख पाण्याच्या बाटल्या खरेदी करून, वाटपास सुरुवात केली आहे.

सोलापूर : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या वारकऱ्यांना तासन् तास रांगेत थांबावे लागते. त्यांना पाणी पिण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ विविध कंपन्यांच्या २५ लाख पाण्याच्या बाटल्या खरेदी करून, वाटपास सुरुवात केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २५ जून रोजी अचानक सायंकाळी पंढरपुरात दाखल झाले. त्यावेळी, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी अशी सूचना आली. तत्काळ दखल घेऊन त्यांनी जिल्हा प्रशासनाला वारकऱ्यांना जागेवर शुद्ध पाण्याच्या बाटल्या देण्याची व्यवस्था करा, असे आदेश दिले. वाखरी, पत्राशेड, ६५ एकर व वाळवंट या ठिकाणी रांगेत असलेल्या वारकऱ्यांना एक लिटर पाण्याच्या बाटल्या देण्यात येत आहेत.

प्रतिबाटली ८ रुपये खर्च   मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध कंपन्यांच्या २५ लाख बाटल्या खरेदी केल्या आहेत.   ८ रुपयेप्रमाणे २५ लाख बाटल्यांसाठी दोन कोटींचा खर्च असून, तत्काळ निधीचा तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022