शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीची पोरं हुश्श्यार भारी, परीक्षा रद्दचा अंदाज बांधून केली ‘नीट’ची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 19:03 IST

विद्यार्थी म्हणतात : बारावीच्या परीक्षा रद्दची घोषणा पूर्वीच करायला हवी होती

सोलापूर : कोरोनामुळे यंदा ‘सीबीएससी’ने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ‘सीबीएसई’च्या पावलावर पाऊल ठेवत राज्य शासनानेही दहावी परीक्षा रद्द केली सोबतच आता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत; पण मुलांनी परीक्षा रद्द होणार, याचा आधीपासूनच अंदाज बांधून ‘नीट’ची तयारी सुरू केली.

कोरोनामुळे राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा तीनवेळा पुढे ढकलल्या. यामुळे बारावीचे विद्यार्थी मागील जवळपास दीड वर्षांपासून बारावीचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला झाल्याने यंदा विद्यार्थ्याची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच परीक्षा रद्द करण्यात आले आहे तरी बहुतांश विद्यार्थी ही परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने असून परीक्षा रद्द करायचे असतील तर अगोदर जाहीर करणे गरजेचे होते, असे मत त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहे.

बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबत आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावीसोबत इतर परीक्षा जसे की ‘नीट’ आणि जेईईचा अभ्यास पूर्वीपासूनच सुरू केला होता. त्यामुळे बारावीचे टक्केवारी जरी कमी असले तरी पुढील शिक्षणावर जास्त परिणाम होणार नाही, असे काही विद्यार्थ्यांचे मत आहे.

माझी बारावीची परीक्षा ही शिक्षणाची महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता परीक्षा रद्द होणे गरजेचे होते. विद्यार्थीचे आरोग्याचे काळजी आणि सुरक्षिततेला प्राथमिकता असली पाहिजे. यामुळे घेतलेले निर्णय चांगलाच आहे. परीक्षेच्या संभ्रमावस्थेमुळे माझ्या मनात तणाव होता, पण परीक्षा रद्दमुळे थोडी नाराजी आहे.

सृष्टी स्वामी, विद्यार्थिनी

कोरोनाचा नवीन प्रतिरूप हा लहान मुलांना धोकादायक असल्यामुळे परीक्षा रद्द होणे आरोग्यसाठी चांगले होते. सोबतच १८ वर्षांच्या आतील मुलांना लसीकरणाची संधी नसल्यामुळे त्यांना परीक्षा देणे हे जास्त धोकादायक होते; पण परीक्षा रद्द करून शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. बारावीचा टक्केवारीवर जरी परिणाम पडत असला तरी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करायचा असल्यामुळे त्याचा अभ्यास पूर्वीपासून सुरू केलेला आहे.

मृणाल काळे, विद्यार्थिनी

तर ताण कमी झाला असता!

आरोग्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा रद्द होणे हे गरजेचे होते. शासनाचा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय चांगला आहे. पण परीक्षा रद्द करायचे असतील तर पूर्वीच त्यांनी याबाबतची घोषणा करायला हवी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण थोडा कमी झाला असता, असे मत प्राचार्य गणेश देशपांडे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरHSC / 12th Exam12वी परीक्षाNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल