शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

बारावीची पोरं हुश्श्यार भारी, परीक्षा रद्दचा अंदाज बांधून केली ‘नीट’ची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 19:03 IST

विद्यार्थी म्हणतात : बारावीच्या परीक्षा रद्दची घोषणा पूर्वीच करायला हवी होती

सोलापूर : कोरोनामुळे यंदा ‘सीबीएससी’ने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ‘सीबीएसई’च्या पावलावर पाऊल ठेवत राज्य शासनानेही दहावी परीक्षा रद्द केली सोबतच आता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत; पण मुलांनी परीक्षा रद्द होणार, याचा आधीपासूनच अंदाज बांधून ‘नीट’ची तयारी सुरू केली.

कोरोनामुळे राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा तीनवेळा पुढे ढकलल्या. यामुळे बारावीचे विद्यार्थी मागील जवळपास दीड वर्षांपासून बारावीचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला झाल्याने यंदा विद्यार्थ्याची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच परीक्षा रद्द करण्यात आले आहे तरी बहुतांश विद्यार्थी ही परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने असून परीक्षा रद्द करायचे असतील तर अगोदर जाहीर करणे गरजेचे होते, असे मत त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहे.

बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबत आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावीसोबत इतर परीक्षा जसे की ‘नीट’ आणि जेईईचा अभ्यास पूर्वीपासूनच सुरू केला होता. त्यामुळे बारावीचे टक्केवारी जरी कमी असले तरी पुढील शिक्षणावर जास्त परिणाम होणार नाही, असे काही विद्यार्थ्यांचे मत आहे.

माझी बारावीची परीक्षा ही शिक्षणाची महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता परीक्षा रद्द होणे गरजेचे होते. विद्यार्थीचे आरोग्याचे काळजी आणि सुरक्षिततेला प्राथमिकता असली पाहिजे. यामुळे घेतलेले निर्णय चांगलाच आहे. परीक्षेच्या संभ्रमावस्थेमुळे माझ्या मनात तणाव होता, पण परीक्षा रद्दमुळे थोडी नाराजी आहे.

सृष्टी स्वामी, विद्यार्थिनी

कोरोनाचा नवीन प्रतिरूप हा लहान मुलांना धोकादायक असल्यामुळे परीक्षा रद्द होणे आरोग्यसाठी चांगले होते. सोबतच १८ वर्षांच्या आतील मुलांना लसीकरणाची संधी नसल्यामुळे त्यांना परीक्षा देणे हे जास्त धोकादायक होते; पण परीक्षा रद्द करून शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. बारावीचा टक्केवारीवर जरी परिणाम पडत असला तरी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करायचा असल्यामुळे त्याचा अभ्यास पूर्वीपासून सुरू केलेला आहे.

मृणाल काळे, विद्यार्थिनी

तर ताण कमी झाला असता!

आरोग्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा रद्द होणे हे गरजेचे होते. शासनाचा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय चांगला आहे. पण परीक्षा रद्द करायचे असतील तर पूर्वीच त्यांनी याबाबतची घोषणा करायला हवी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण थोडा कमी झाला असता, असे मत प्राचार्य गणेश देशपांडे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरHSC / 12th Exam12वी परीक्षाNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल