शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सेवा देणाºया बस फेºया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:31 IST

प्रवाशांचे हाल कायम; शहरातील गाड्या रिकाम्याच धावतात

ठळक मुद्देतोट्याचे कारण पुढे क़रून महापालिकेच्या परिवहन विभागाने ग्रामीण भागातील सिटी बसच्या फेºया बंद केल्याशहरात धावणाºया बसही रिकाम्या धावत असून, परिवहनला दररोज दीड लाख रुपयांचा फटका परिवहन उपक्रमातील काही अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ४० बस सुरू

सोलापूर : तोट्याचे कारण पुढे क़रून महापालिकेच्या परिवहन विभागाने ग्रामीण भागातील सिटी बसच्या फेºया बंद केल्या आहेत. सध्या केवळ शहरात बससेवा सुरू आहे. शहरात धावणाºया बसही रिकाम्या धावत असून, परिवहनला दररोज दीड लाख रुपयांचा फटका बसत असल्याचे परिवहन अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे. 

मनपा परिवहन विभागाची बस शहरासह परिसरातील ३० किमी अंतरावरील प्रमुख गावांमध्ये जात असते. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य प्रवाशांना, विद्यार्थ्यांना या सेवेचा फायदा होतो. थकीत वेतनासाठी परिवहनच्या कर्मचाºयांनी बेमुदत संप पुकारला होता. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर पाच दिवसांपूर्वी संप मागे घेण्यात आला. पुन्हा सेवा सुरू केल्यानंतर केवळ शहरात बस सोडण्यात येत आहेत. शहरात धावणाºया अनेक बस रिकाम्याच धावत आहेत. परिवहन उपक्रमातील काही अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ४० बस सुरू आहेत. 

या बसच्या माध्यमातून मागील महिन्यात परिवहनला दररोज दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. यात सर्वाधिक वाटा ग्रामीण भागाचा होता. आता शहरातील फेºया वाढल्या आहेत, पण दररोज ५० ते ६० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. मुळातच परिवहनला दररोज दोन लाख रुपयांचा तोटा होतो. त्यात नव्याने तोटा वाढल्यानंतर पुन्हा कर्मचाºयांच्या वेतनाचा आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च उभा राहणार आहे. 

या गावातील सेवा बंद- मंद्रुप, चपळगाव, जेऊर, कर्देहळ्ळी, मुस्ती, बोरामणी, कासेगाव, विंचूर, खडकी-धोत्री, पितापूर, वडगाव, मार्डी, नान्नज, वडाळा, बीबीदारफळ, मोहोळ. 

ग्रामीण भागातील अनेक मार्ग तोट्यात चालवावे लागतात. परिवहनच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. पालकमंत्र्यांनीच ग्रामीण भागातील बससेवा बंद करा, असे आदेश दिले होते. या निर्णयाबाबत सर्व गटनेत्यांना कळविले. त्यांनी संमती दिल्यानंतरच सेवा बंद केली. शहरातील फेºया आणि ग्रामीण भागातील फेºयांमधून मिळणाºया उत्पन्नाची पडताळणी सुरू आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो. - गणेश जाधव, सभापती, परिवहन समिती.

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे नेते त्यांच्या आलिशान गाड्यांमधून सोलापूरला येतात. या नेत्यांना सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थ्यांच्या अडचणीची जाणीव नाही. गेल्या २० दिवसांपासून आम्ही बस सुरू करा म्हणून पाठपुरावा करतोय, पण महापालिका दाद द्यायला तयार नाही. यातून अवैध प्रवासी वाहतुकीला प्राधान्य मिळते. रिक्षा, जीपचालक मनमानी करून पैसे घेतात. परिवहनने यावर फेरविचार करायला हवा- जमीर शेख, शहर संघटक, प्रहार संघटना. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका