शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

असा करा तुळशीचा विवाह सोहळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:36 IST

सोलापूर : दिवाळीनंतर चातुर्मासाच्या समाप्तीदिवशी तुळशीचा विवाह सोहळा होणार आहे़ यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे़  पंढरपुरात होणाºया कार्तिकी एकादशीच्या ...

सोलापूर : दिवाळीनंतर चातुर्मासाच्या समाप्तीदिवशी तुळशीचा विवाह सोहळा होणार आहे़ यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे़  पंढरपुरात होणाºया कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानंतरच्या दुसºया दिवशी तुळशीचा विवाह होणार आहे़  तुळशीचा विवाह झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांनादेखील प्रारंभ होतो़ वरूणराजाला निरोप देताच शिशिराचे आगमन होते़ या आगमनामुळे विवाह सोहळ्याच्या तयारीला सारेच लागतात़  दरम्यान चार महिन्यांच्या काळात देव -देवता निद्रा स्थितीत असतात. देवउठनी एकादशी पार पडल्यानंतरच साºया शुभ मुहूर्ताना सुरूवात होते, असे म्हटले जाते. यंदा तुळशी विवाह सोहळा मंगळवार २० नोव्हेंबर रोजी पासून पोर्णिमेपर्यंत होणार आहे.

तुळशी विवाह कसा करतात ?तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह शाळीग्राम दगडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हा विष्णू असल्याचं समजलं जातं. काही ठिकाणी घरातील लहान मुलांचा तुळशीसोबात विवाह लावला जातो. याकरिता तुळशीला वधूप्रमाणे सोळा श्रृंगारांनी सजविण्यात येते़ तुळस ही पवित्र आहे़ तुळशीच्या पत्राशिवाय कोणत्याही देवाला दाखविलेला नेवैद्य हा परिपूर्ण होत नाही़ एक-एक तुळशीचा पत्र महत्वाचा आहे.

असा आहे तुळशी विवाह शुभ मुहूर्तद्वादशी तिथी आरंभ : १९ नोव्हेंबर २०१८ दुपारी २:२९ वाजल्यापासूनतुळशीचा विवाह सोहळा शुक्रवार २३ नोव्हेंबर २०१८ या पोर्णिमेपर्यंत सुरू असतो़ 

तुळशी विवाहाचं महत्त्व काय ?तुळशी विवाह हा हिंदूधर्मियांसाठी एक पवित्र सोहळा समजला जातो. कार्तिकी व्दादशीच्या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याची अख्यायिका आहे. द्वादशीपासून पुढील पाच दिवस हा सोहळा केला जातो. घरामध्ये किमान तुळशीचं रोप असणे आवश्यक आहे. तुळस वातावरणातील अशुद्ध घटक दूर ठेवण्यास मदत करते, ताजा प्राणवायूचा पुरवठा करते. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहण्यास मदत होते, असा उल्लेख आयुर्वेदात करण्यात आला आहे.

कसे कराल तुळशीचं लग्नतुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे ३ वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. यानंतर तुळशीच्या विवाहादिवशी तुळशीला स्नान घालून तिचे अभिषेक करण्यात येते़ त्यानंतर तिला नववधूप्रमाणे नटवले जाते. त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात. घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत आंतरपाट धरून मंगलाष्टाकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न होतो. यानंतर घरात बेसनाचा लाडू, अनारस, करंज्या, गोडाधोडाच्या पदार्थाचे वाटप केले जाते. त्यानंतर फटाके उडविले जातात- किरण मुरलीधर जोशी, जुने विठ्ठल मंदीर, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरinterviewमुलाखत