शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

असा करा तुळशीचा विवाह सोहळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:36 IST

सोलापूर : दिवाळीनंतर चातुर्मासाच्या समाप्तीदिवशी तुळशीचा विवाह सोहळा होणार आहे़ यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे़  पंढरपुरात होणाºया कार्तिकी एकादशीच्या ...

सोलापूर : दिवाळीनंतर चातुर्मासाच्या समाप्तीदिवशी तुळशीचा विवाह सोहळा होणार आहे़ यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे़  पंढरपुरात होणाºया कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानंतरच्या दुसºया दिवशी तुळशीचा विवाह होणार आहे़  तुळशीचा विवाह झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांनादेखील प्रारंभ होतो़ वरूणराजाला निरोप देताच शिशिराचे आगमन होते़ या आगमनामुळे विवाह सोहळ्याच्या तयारीला सारेच लागतात़  दरम्यान चार महिन्यांच्या काळात देव -देवता निद्रा स्थितीत असतात. देवउठनी एकादशी पार पडल्यानंतरच साºया शुभ मुहूर्ताना सुरूवात होते, असे म्हटले जाते. यंदा तुळशी विवाह सोहळा मंगळवार २० नोव्हेंबर रोजी पासून पोर्णिमेपर्यंत होणार आहे.

तुळशी विवाह कसा करतात ?तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह शाळीग्राम दगडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हा विष्णू असल्याचं समजलं जातं. काही ठिकाणी घरातील लहान मुलांचा तुळशीसोबात विवाह लावला जातो. याकरिता तुळशीला वधूप्रमाणे सोळा श्रृंगारांनी सजविण्यात येते़ तुळस ही पवित्र आहे़ तुळशीच्या पत्राशिवाय कोणत्याही देवाला दाखविलेला नेवैद्य हा परिपूर्ण होत नाही़ एक-एक तुळशीचा पत्र महत्वाचा आहे.

असा आहे तुळशी विवाह शुभ मुहूर्तद्वादशी तिथी आरंभ : १९ नोव्हेंबर २०१८ दुपारी २:२९ वाजल्यापासूनतुळशीचा विवाह सोहळा शुक्रवार २३ नोव्हेंबर २०१८ या पोर्णिमेपर्यंत सुरू असतो़ 

तुळशी विवाहाचं महत्त्व काय ?तुळशी विवाह हा हिंदूधर्मियांसाठी एक पवित्र सोहळा समजला जातो. कार्तिकी व्दादशीच्या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याची अख्यायिका आहे. द्वादशीपासून पुढील पाच दिवस हा सोहळा केला जातो. घरामध्ये किमान तुळशीचं रोप असणे आवश्यक आहे. तुळस वातावरणातील अशुद्ध घटक दूर ठेवण्यास मदत करते, ताजा प्राणवायूचा पुरवठा करते. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहण्यास मदत होते, असा उल्लेख आयुर्वेदात करण्यात आला आहे.

कसे कराल तुळशीचं लग्नतुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे ३ वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. यानंतर तुळशीच्या विवाहादिवशी तुळशीला स्नान घालून तिचे अभिषेक करण्यात येते़ त्यानंतर तिला नववधूप्रमाणे नटवले जाते. त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात. घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत आंतरपाट धरून मंगलाष्टाकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न होतो. यानंतर घरात बेसनाचा लाडू, अनारस, करंज्या, गोडाधोडाच्या पदार्थाचे वाटप केले जाते. त्यानंतर फटाके उडविले जातात- किरण मुरलीधर जोशी, जुने विठ्ठल मंदीर, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरinterviewमुलाखत