शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

असा करा तुळशीचा विवाह सोहळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:36 IST

सोलापूर : दिवाळीनंतर चातुर्मासाच्या समाप्तीदिवशी तुळशीचा विवाह सोहळा होणार आहे़ यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे़  पंढरपुरात होणाºया कार्तिकी एकादशीच्या ...

सोलापूर : दिवाळीनंतर चातुर्मासाच्या समाप्तीदिवशी तुळशीचा विवाह सोहळा होणार आहे़ यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे़  पंढरपुरात होणाºया कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानंतरच्या दुसºया दिवशी तुळशीचा विवाह होणार आहे़  तुळशीचा विवाह झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांनादेखील प्रारंभ होतो़ वरूणराजाला निरोप देताच शिशिराचे आगमन होते़ या आगमनामुळे विवाह सोहळ्याच्या तयारीला सारेच लागतात़  दरम्यान चार महिन्यांच्या काळात देव -देवता निद्रा स्थितीत असतात. देवउठनी एकादशी पार पडल्यानंतरच साºया शुभ मुहूर्ताना सुरूवात होते, असे म्हटले जाते. यंदा तुळशी विवाह सोहळा मंगळवार २० नोव्हेंबर रोजी पासून पोर्णिमेपर्यंत होणार आहे.

तुळशी विवाह कसा करतात ?तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह शाळीग्राम दगडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हा विष्णू असल्याचं समजलं जातं. काही ठिकाणी घरातील लहान मुलांचा तुळशीसोबात विवाह लावला जातो. याकरिता तुळशीला वधूप्रमाणे सोळा श्रृंगारांनी सजविण्यात येते़ तुळस ही पवित्र आहे़ तुळशीच्या पत्राशिवाय कोणत्याही देवाला दाखविलेला नेवैद्य हा परिपूर्ण होत नाही़ एक-एक तुळशीचा पत्र महत्वाचा आहे.

असा आहे तुळशी विवाह शुभ मुहूर्तद्वादशी तिथी आरंभ : १९ नोव्हेंबर २०१८ दुपारी २:२९ वाजल्यापासूनतुळशीचा विवाह सोहळा शुक्रवार २३ नोव्हेंबर २०१८ या पोर्णिमेपर्यंत सुरू असतो़ 

तुळशी विवाहाचं महत्त्व काय ?तुळशी विवाह हा हिंदूधर्मियांसाठी एक पवित्र सोहळा समजला जातो. कार्तिकी व्दादशीच्या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याची अख्यायिका आहे. द्वादशीपासून पुढील पाच दिवस हा सोहळा केला जातो. घरामध्ये किमान तुळशीचं रोप असणे आवश्यक आहे. तुळस वातावरणातील अशुद्ध घटक दूर ठेवण्यास मदत करते, ताजा प्राणवायूचा पुरवठा करते. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहण्यास मदत होते, असा उल्लेख आयुर्वेदात करण्यात आला आहे.

कसे कराल तुळशीचं लग्नतुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे ३ वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. यानंतर तुळशीच्या विवाहादिवशी तुळशीला स्नान घालून तिचे अभिषेक करण्यात येते़ त्यानंतर तिला नववधूप्रमाणे नटवले जाते. त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात. घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत आंतरपाट धरून मंगलाष्टाकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न होतो. यानंतर घरात बेसनाचा लाडू, अनारस, करंज्या, गोडाधोडाच्या पदार्थाचे वाटप केले जाते. त्यानंतर फटाके उडविले जातात- किरण मुरलीधर जोशी, जुने विठ्ठल मंदीर, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरinterviewमुलाखत