शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

सरपंच निवडीचे बिगुल वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:39 IST

पहिल्या टप्प्यात ९ फेबुवारी रोजी तालुक्यातील तिसंगी, सोनके, उंबरगाव, तनाळी, शिरगाव, खर्डी, तावशी, अनवली, कासेगाव, पोहरगाव, शंकरगाव-नळी, फुुलचिंचोली, जैनवाडी, ...

पहिल्या टप्प्यात ९ फेबुवारी रोजी तालुक्यातील तिसंगी, सोनके, उंबरगाव, तनाळी, शिरगाव, खर्डी, तावशी, अनवली, कासेगाव, पोहरगाव, शंकरगाव-नळी, फुुलचिंचोली, जैनवाडी, मगरवाडी, शेगाव दुमाला, नारायण चिंचोली, बाभुळगाव, आव्हे-तरटगाव, करकंब, उंबरेे, पेहे, भाळवणी, केेसकरवाडी, शेंडगेवाडी, उपरी, सुपली, पिराची कुरोली, पळशी, वाडीकुरोली, देवडे, शेवते, चिलाईवाडी, भोसे, सुगाव-भोसे, ओझेवाडी, नेपतगाव, गोपाळपूर, चळे, कोंढारकी, मुंडेवाडी, गादेगाव, शेळवे, वाखरी, शिरढोण, चिंचोली-भोसे, कौठाळी, खेडभाळवणी या ४७ या गावातील सरपंच पदाची निवड होणार आहे.

११ फेब्रुवारी रोजी बोहाळी, तपकिरी शेटफळ, सिद्धेवाडी-चिचुंबे-तरडगाव, एकलासपूर, खरसोळी, विटे, आंबे चिंचोली, तारापूर, भटुंबरे, देगाव, आढीव, नांदोरे, करोळे, सांगवी-बादलकोट, धोंडेवाडी, उजनी वसाहत, पटवर्धन कुरोली, रांझणी, सरकोली, भंडीशेगाव या २० गावांची सरपंच निवड होणार आहे.

१३ फेब्रुवारी रोजी सुस्ते, रोपळे, कान्हापुरी, आंबे, अजन्सोंड या ५ गावांमध्ये सरपंच, उपसरपंच निवड होणार आहे.

याकरिता ४७ अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावांसाठी स्वतंत्र अध्यासी अधिकारी नेमून विशेष सभेचे आयोजन करत सरपंच, उपसरपंच निवड घ्यावी याबाबतचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार दिनांक ९, ११ व १३ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

वातावरण पुन्हा तापणार

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर गेल्या महिन्याभरापासून पंढरपूर तालुक्यातील ७२ गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत पक्ष, गटा-तटांना बाजूला ठेवत नवीन समीकरणे जुळवत स्थानिक आघाड्या करून निवडणुका लढविल्या होत्या. त्यामुळे अनेक गावात एकाच नेत्याचे दोन गट आमने-सामने उभे ठाकले होते. निवडून आलेले पॅनलही काही गावे वगळता एक-दोन उमेदवारांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यामुळे सरपंचपद निवडणुकीत घोडेबाजार रंगणार हे निश्चित आहे. त्यामुळे मतमोजणीनंतर गेल्या १५ दिवसांपासून शांत असलेले गावागावातील राजकारण सरपंच निवडीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे पुन्हा तापणार आहे. सहलीवर गेलेले उमेदवार गावात कसे आणायचे, याच्या हालचाली सुरू आहेत. तर गावात असलेल्या उमेदवारांना कसे सांभाळायचे व सरपंच निवडी दिवशी कोणती रणनिती आखायची, याबाबत गावागावातील कार्यकर्ते, नेतेमंडळी कामाला लागले आहेत.