शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

सरपंच निवडीचे बिगुल वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:39 IST

पहिल्या टप्प्यात ९ फेबुवारी रोजी तालुक्यातील तिसंगी, सोनके, उंबरगाव, तनाळी, शिरगाव, खर्डी, तावशी, अनवली, कासेगाव, पोहरगाव, शंकरगाव-नळी, फुुलचिंचोली, जैनवाडी, ...

पहिल्या टप्प्यात ९ फेबुवारी रोजी तालुक्यातील तिसंगी, सोनके, उंबरगाव, तनाळी, शिरगाव, खर्डी, तावशी, अनवली, कासेगाव, पोहरगाव, शंकरगाव-नळी, फुुलचिंचोली, जैनवाडी, मगरवाडी, शेगाव दुमाला, नारायण चिंचोली, बाभुळगाव, आव्हे-तरटगाव, करकंब, उंबरेे, पेहे, भाळवणी, केेसकरवाडी, शेंडगेवाडी, उपरी, सुपली, पिराची कुरोली, पळशी, वाडीकुरोली, देवडे, शेवते, चिलाईवाडी, भोसे, सुगाव-भोसे, ओझेवाडी, नेपतगाव, गोपाळपूर, चळे, कोंढारकी, मुंडेवाडी, गादेगाव, शेळवे, वाखरी, शिरढोण, चिंचोली-भोसे, कौठाळी, खेडभाळवणी या ४७ या गावातील सरपंच पदाची निवड होणार आहे.

११ फेब्रुवारी रोजी बोहाळी, तपकिरी शेटफळ, सिद्धेवाडी-चिचुंबे-तरडगाव, एकलासपूर, खरसोळी, विटे, आंबे चिंचोली, तारापूर, भटुंबरे, देगाव, आढीव, नांदोरे, करोळे, सांगवी-बादलकोट, धोंडेवाडी, उजनी वसाहत, पटवर्धन कुरोली, रांझणी, सरकोली, भंडीशेगाव या २० गावांची सरपंच निवड होणार आहे.

१३ फेब्रुवारी रोजी सुस्ते, रोपळे, कान्हापुरी, आंबे, अजन्सोंड या ५ गावांमध्ये सरपंच, उपसरपंच निवड होणार आहे.

याकरिता ४७ अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावांसाठी स्वतंत्र अध्यासी अधिकारी नेमून विशेष सभेचे आयोजन करत सरपंच, उपसरपंच निवड घ्यावी याबाबतचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार दिनांक ९, ११ व १३ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

वातावरण पुन्हा तापणार

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर गेल्या महिन्याभरापासून पंढरपूर तालुक्यातील ७२ गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत पक्ष, गटा-तटांना बाजूला ठेवत नवीन समीकरणे जुळवत स्थानिक आघाड्या करून निवडणुका लढविल्या होत्या. त्यामुळे अनेक गावात एकाच नेत्याचे दोन गट आमने-सामने उभे ठाकले होते. निवडून आलेले पॅनलही काही गावे वगळता एक-दोन उमेदवारांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यामुळे सरपंचपद निवडणुकीत घोडेबाजार रंगणार हे निश्चित आहे. त्यामुळे मतमोजणीनंतर गेल्या १५ दिवसांपासून शांत असलेले गावागावातील राजकारण सरपंच निवडीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे पुन्हा तापणार आहे. सहलीवर गेलेले उमेदवार गावात कसे आणायचे, याच्या हालचाली सुरू आहेत. तर गावात असलेल्या उमेदवारांना कसे सांभाळायचे व सरपंच निवडी दिवशी कोणती रणनिती आखायची, याबाबत गावागावातील कार्यकर्ते, नेतेमंडळी कामाला लागले आहेत.