शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेहनत केली अन् विक्रम केला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 15:19 IST

३० नोव्हेंबर २०१८ सकाळचे अकरा वाजलेले... अथक परिश्रमाने ११ तास चालून किलीमांजारो या आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकविला... ...

३० नोव्हेंबर २०१८ सकाळचे अकरा वाजलेले... अथक परिश्रमाने ११ तास चालून किलीमांजारो या आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकविला... ‘भारत माता की जय’ म्हटलं. आणि सगळा शीण, सगळा तणाव निघून गेला. विसरून गेले मी दोन दिवस झाले आजारी आहे. आजारी इतकी की मला पाणी पचत नाही, उलटी होत आहे. पण हे सगळं असूनही छान वाटत होतं. मी आज जिंकले. स्वत:साठी मेहनत केली होती मी? किती पळापळ केली होती? 

माझा गाईड पिटर व त्याचा मित्र या दोघांनी मिळून माझं अभिनंदन केलं. त्यांना झालेला आनंद त्यांच्या हास्यातून प्रतिबिंबित होत होता. व्हायलाच पाहिजे ना? माझा त्रास, माझी वेदना त्या क्षणी पाहणारे माझे आपले असे दोघे-चौघेच तेथे होते. मला प्रोत्साहन देऊन माझे धैर्य वाढविणारे हे माझे खरोखरच सच्चे मित्र होते. छान वाटलं जेव्हा माणुसकी, आपलेपणा, जिव्हाळा, प्रेम मला या आफ्रिकेतील मित्रांमध्ये आढळला. त्याक्षणी हे दोघे माझ्यासाठी साक्षात माझा पांडुरंग अन् स्वामी समर्थ होते. वजा ५० तापमान अचानक घसरणीवर आल्यावर त्यांनी माझी घेतलेली काळजी माझ्यातला उत्साह वाढविणारी होती. 

‘आदल्या दिवशी माझी अवस्था पाहून माझा गाईड पिटर बोलला ‘जर तू ठीक असशील तर आपण पुढे जाऊ, अन्यथा...’ या वाक्याने मी क्षणभर निराश झाले. वाईट वाटून घेण्याची, दु:खी होण्याची माझी संवेदना संपून गेली होती, इतकी मी थकले होते. अंगात त्राण नव्हता, हीच लढाई होती माझ्या संयमाची, कणखरपणाची. मनात कोणताही नकारात्मक विचार आणला नाही. मला फक्त जिंकायचे होते. माझे लक्ष्य पूर्ण करायचे होते. आई-वडिलांना स्मरण करून नमस्कार केला.

स्वामी समर्थांना प्रार्थना केली, पडून राहिले. रात्री बारा वाजता माझा गाईड रूममध्ये आला. म्हणाला, तुम्ही ठीक आहे ना? मी खोटे बोलले हो म्हणून. कारण इतक्या दिवसांची मेहनत, कष्ट वाया घालवायचं नव्हतं. आयुष्यातून उठायला आणि आयुष्याच्या उत्तुंग शिखरावर जायला एक क्षण पुरेसा असतो. क्षणात काही घडू शकते. हे वाक्य आठवले. पांडुरंगाची कृपा झाली, गाईडने सकारात्मक निर्णय घेतला. मला शेवटच्या टप्प्यात साथ देण्याचा मोलाचा निर्णय त्यांनी घेतला.

तुम्ही काही खाल्ले तरच मी नेणार? गाईडनं हट्ट धरला. कुक लगेच काळी कॉफी आणि बिस्किटे घेऊन आला. माझी खायची इच्छा नव्हती. पोटात मळमळ, उलटी जरा देखील कमी व्हायला तयार नव्हती. मनाची ताकद, मनाची शक्ती अजमावून पाहायचा हा दिवस होता. मनाने खंबीर होऊन मला शिखर सर करायचे होते. मन आणि शरीर या दोन्हींच्या युद्धात मला दोघांना घेऊन जिंकायचे होते. कॉफी आणि दोन बिस्किटे घेतली. यानंतर गाईडनी बॅगमधून कपडे काढले. पाच ते सहा टी शर्ट घालायला लावले. जर्किन घातली. समिटसाठी आणलेली पॅण्ट घातली. आहे त्या ट्रेकसूट थर्मलवर स्वेटर घातला आणि गिर्यारोहणाला सज्ज झाले. 

माणूस मैत्री निभावत नाही, पण निसर्ग आपल्याला एकटं सोडत नाही. अर्धा तास झाला असेल आम्हाला निघून, क्षणात चित्र पालटले. प्रचंड थंडी आणि गार वारे सुटले. याला सोबत म्हणून की काय, हिमवर्षाव सुरू झाला. कसोटीचा क्षण होता. थकलेल्या शरीराला आणखीन कणखर होऊन चालायची ही वेळ होती. तोंडावर हिमवर्षाव सपासप मारत होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. सोबतीला सतत होणारी उलटी होतीच. सोबत असलेल्या बाटलीमधील पाणीदेखील बर्फ झाले होते. पण सतत मी थोडे थोडे पाणी पित होतेच. चालताना अखेरच्या टप्प्यात उंच चढण होती.

सभोवतालच्या डोंगरावर पडलेलं बर्फ आणि त्यावर एक प्रकाशाचा कवडसा खूप सुरेख वाटत होता. अवघड, अतिशय अवघड चढण पार करून वर पोहोचले. मी टांझानिया देशामध्ये आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो सर केले होते. १९,३४१ फूट उंचीवर असलेल्या या सर्वोच्च शिखरावरील एका दगडावर दहा मिनिटे बसले. मला, मी स्वप्नात आहे का असे वाटत होते. हा भास नाही खरं आहे हे जाणवलं तेव्हा बॅगेतून भारताचाच राष्ट्रध्वज काढला आणि ‘भारत माता की जय’ म्हणत डौलाने फडकविला. अथक परिश्रमाने मिळविलेला हा विजय फक्त माझा नाही, संपूर्ण शिक्षक वर्गाचा आहे. आज मी किलीमांजारो या आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर पोहोचणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शिक्षिका ठरले. जिने हिवाळ्यात प्रचंड थंडी, बदलत जाणाºयो वातावरणाचे आव्हान पेलून शिखर सर केले. माझ्या समस्त विद्यार्थी दैवतांपुढे हा एक आदर्श कायम राहील, यात शंका नाही.-अनुराधा साखरे-काजळे(लेखिका या गिर्यारोहक आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूर