शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू

By admin | Updated: July 5, 2014 00:04 IST

कुडल येथील घटना

अक्कलकोट : पूजेसाठी नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या गुब्याड (ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) येथील सहा शाळकरी मुली व एक मुलगा कुडल (ता़ अक्कलकोट) येथील भीमा नदीपात्रात बुडाले. यापैकी तीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला़ तीन मुलींसह एक मुलगा मात्र बचावला़ ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली़ या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अक्कलकोट तहसीलदारांची गाडी संतप्त नागरिकांनी जाळली़पाऊस पडावा म्हणून शुक्रवार असल्याने गुब्याड येथील या सर्व मुली पहाटे स्नान केल्यानंतर पालकांनी सांगितल्याने पाणी आणण्यासाठी नदी पात्रात गेल्या होत्या. गावच्या परिसरात दोन किमी अंतरात पाणी मिळाले नसल्याने या मुली कुडल येथील भीमा नदी पात्रात गेल्या़ या पात्रात वाळू ठेकेदाराने वाळूचा उपसा केल्याने डबक्यात पाणी साचले होते़ डबक्यात पाण्यासाठी गेले असता भाग्यश्री सुतार, भाग्यश्री अतनुरे, महानंदा अतनुरे या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ मल्लप्पा अतनुरे, द्राक्षणी मरगूर, कावेरी मरगूर, सुवर्णा गुब्याड हे सर्व बचावले़ जे बचावले आहेत त्यांच्यावर इंडी येथील तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ वरील सर्व सात जण गुब्याड (ता़ इंडी) येथे इयत्ता सातवीत शिकत होते़ घटनेची माहिती मिळताच गुब्याड येथील ४०० पेक्षा अधिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले़ परिस्थिती संवेदनशील बनली होती़ नातेवाईकांनी एकच आक्रोश केला़ दरम्यान अक्कलकोटचे तहसीलदार गुरु बिराजदार, निवासी तहसीलदार सुरेश गायकवाड, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोनि राजेंद्र शेळके व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी संतप्त झालेल्या जमावाने वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी व तहसीलदारांची शासकीय गाडी जाळली़ दुपारी १२ वाजता मृतांचे शवविच्छेदन केल्यानंतर गुब्याड येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले़ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा दुबुले यांच्यासह ५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.----------------------------------------------देवपूजेसाठी गेल्या मुलीआषाढ महिना सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मंगळवारी, शुक्रवारी देवाला दही, भात, कडूलिंबाची पाने व पाणी वाहण्याची प्रथा आहे़ असे केल्यास सर्वत्र पाऊस पडेल, असा नागरिकांना विश्वास वाटतो़ देवाला पाणी वाहण्याचे काम लहान मुलांकडून केले जाते़ त्यानुसार या मुली पाणी आणण्यासाठी नदीपात्रात गेल्या होत्या. -------------------------------शासकीय मदत मिळवून देण्याविषयी चर्चा सुरू होती, मात्र गुब्याड ग्रामस्थांनी निवासी तहसीलदार सुरेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय आमची गाडी पेटविली. यामुळे ग्रामस्थांवर दोन गुन्हे दाखल केले आहेत.-गुरु बिराजदार, तहसीलदार, अक्कलकोट.घटनेची माहिती घेण्याचे काम चालू असताना काही समाजकंटकांनी मृतांच्या नातेवाईकांना भडकावून गोंधळ घातला. शासकीय वाहन पेटवून दिले. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.- राजेंद्र शेळके, पोलीस निरीक्षक, अक्कलकोट.