शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

नदीपात्रात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू

By admin | Updated: July 5, 2014 00:04 IST

कुडल येथील घटना

अक्कलकोट : पूजेसाठी नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या गुब्याड (ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) येथील सहा शाळकरी मुली व एक मुलगा कुडल (ता़ अक्कलकोट) येथील भीमा नदीपात्रात बुडाले. यापैकी तीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला़ तीन मुलींसह एक मुलगा मात्र बचावला़ ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली़ या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अक्कलकोट तहसीलदारांची गाडी संतप्त नागरिकांनी जाळली़पाऊस पडावा म्हणून शुक्रवार असल्याने गुब्याड येथील या सर्व मुली पहाटे स्नान केल्यानंतर पालकांनी सांगितल्याने पाणी आणण्यासाठी नदी पात्रात गेल्या होत्या. गावच्या परिसरात दोन किमी अंतरात पाणी मिळाले नसल्याने या मुली कुडल येथील भीमा नदी पात्रात गेल्या़ या पात्रात वाळू ठेकेदाराने वाळूचा उपसा केल्याने डबक्यात पाणी साचले होते़ डबक्यात पाण्यासाठी गेले असता भाग्यश्री सुतार, भाग्यश्री अतनुरे, महानंदा अतनुरे या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ मल्लप्पा अतनुरे, द्राक्षणी मरगूर, कावेरी मरगूर, सुवर्णा गुब्याड हे सर्व बचावले़ जे बचावले आहेत त्यांच्यावर इंडी येथील तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ वरील सर्व सात जण गुब्याड (ता़ इंडी) येथे इयत्ता सातवीत शिकत होते़ घटनेची माहिती मिळताच गुब्याड येथील ४०० पेक्षा अधिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले़ परिस्थिती संवेदनशील बनली होती़ नातेवाईकांनी एकच आक्रोश केला़ दरम्यान अक्कलकोटचे तहसीलदार गुरु बिराजदार, निवासी तहसीलदार सुरेश गायकवाड, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोनि राजेंद्र शेळके व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी संतप्त झालेल्या जमावाने वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी व तहसीलदारांची शासकीय गाडी जाळली़ दुपारी १२ वाजता मृतांचे शवविच्छेदन केल्यानंतर गुब्याड येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले़ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा दुबुले यांच्यासह ५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.----------------------------------------------देवपूजेसाठी गेल्या मुलीआषाढ महिना सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मंगळवारी, शुक्रवारी देवाला दही, भात, कडूलिंबाची पाने व पाणी वाहण्याची प्रथा आहे़ असे केल्यास सर्वत्र पाऊस पडेल, असा नागरिकांना विश्वास वाटतो़ देवाला पाणी वाहण्याचे काम लहान मुलांकडून केले जाते़ त्यानुसार या मुली पाणी आणण्यासाठी नदीपात्रात गेल्या होत्या. -------------------------------शासकीय मदत मिळवून देण्याविषयी चर्चा सुरू होती, मात्र गुब्याड ग्रामस्थांनी निवासी तहसीलदार सुरेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय आमची गाडी पेटविली. यामुळे ग्रामस्थांवर दोन गुन्हे दाखल केले आहेत.-गुरु बिराजदार, तहसीलदार, अक्कलकोट.घटनेची माहिती घेण्याचे काम चालू असताना काही समाजकंटकांनी मृतांच्या नातेवाईकांना भडकावून गोंधळ घातला. शासकीय वाहन पेटवून दिले. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.- राजेंद्र शेळके, पोलीस निरीक्षक, अक्कलकोट.