शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इतिहासाचे पुनर्लेखन करणारी विचारसरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:28 IST

समाजाबरोबर देशासाठीदेखील धोकादायक लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : अलीकडच्या काळात इतिहासाचे पुनर्लेखन आणि पुनर्वाचन करण्याचा विचार मांडला जात आहे. ...

समाजाबरोबर देशासाठीदेखील धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : अलीकडच्या काळात इतिहासाचे पुनर्लेखन आणि पुनर्वाचन करण्याचा विचार मांडला जात आहे. ही विचारसरणी म्हणजे घडलेला इतिहास लपवण्याचा डाव आहे. स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा धोका यातून संभवतो, अशी भीती गांधीवादी विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केली.

मा. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात खोरे बोलत होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष सदगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते डॉ. सतीश वळसंगकर (वैद्यकीय), डॉ. केशव सरगर (कृषी), प्रा. प्रबुद्धचंद्र झपके (शिक्षण) आणि एजाजहुसेन मुजावर (पत्रकारिता) यांना वि. गु. शिवदारे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षपदावरून बोलताना अरुण खोरे यांनी गांधीवादाचा पुरस्कार करीत प्रतिगामी विचारसरणी पुढे येताना इतिहासातील अनेक पान बाजूला टाकण्याची प्रवृत्ती बळावत असल्याचे सांगितले.

राजशेखर शिवदारे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सदगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्व. शिवदारे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा गौरव केला. धर्मराज काडादी, डॉ. बाहुबली दोशी यांनी विचार मांडले. कार्यक्रमास कुमार करजगी, नरेंद्र गंभिरे, प्रकाश वाले, सुभाष मुनाळे, श्रीशैल वाले, डॉ. चनगोंडा हाविनाळे, शिवानंद पाटील उपस्थिती होती.

शुभदा उपासे-शिवपुजे यांनी सूत्रसंचालन केले.

-------

माळ घालणं सोपं असतं....

माणसं अगदी सहजपणे गळ्यात माळ घालतात. माळ घालणं सोपं असतं. त्याच आचरण अवघड असत, याचं भान अनेकांना नसतं. आचरण शुद्ध ठेवा, असा सल्ला देताना गहिनीनाथ महाराजांनी राजकारण चांगलं असतं, पण माणसं त्याला घाणेरडं बनवतात. या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी त्याच भान ठेवलं तर अशा राजकारणातून चांगला समाज घडेल ही अपेक्षा व्यक्त केली.

------

फोटो : १७ शिवदारे

वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्कार वितरणप्रसंगी डॉ. बाहुबली दोशी, धर्मराज काडादी, राजशेखर शिवदारे, अरुण खोरे, गहिनीनाथ औसेकर महाराज, डॉ. सतीश वळसंगकर, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, डॉ. केशव सरगर आणि एजाजहुसेन मुजावर.