शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तहान भागविणारी सीना नदी सांडपाण्यामुळे प्रदूषित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 05:32 IST

३० गावांतील पाणीपुरवठा योजना बंद : परिसरातील पाणीही दूषित; होटगी तलाव प्रदूषणाच्या विळख्यात, गावकऱ्यांचे आरोग्य बिघडले

शीतलकुमार कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : एकेकाळी शेतीसाठी वरदान असणारी, नागरिकांची तहान भागवणारी सीना नदी आज शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. नदीच्या पाण्याची दुर्गंधी येत असून, या परिसरातील विहिरी व कूपनलिकेतील पाणीदेखील दूषित झाले आहे. त्यामुळे नदीवर अवलंबून असलेल्या साधारण ३० गावांतील पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आल्या असून, पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.सोलापूर शहराला दररोज १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यातून सुमारे ८० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. शहरात एकूण तीन ठिकाणांहून सुमारे ४० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. शिवाय प्रक्रिया न केलेले ४० दशलक्ष लिटर पाण्यापैकी काही पाणी हे शेतीसाठी, तर काही शहरालगतच्या होटगी तलावात सोडले जाते. हे पाणी एमआयडीसी परिसरातून येत असल्याने यात मोठ्या प्रमाणात रसायन असते. या पाण्यामुळे गावकऱ्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. होटगी तलावाजवळ एक विहीर असून, या तलावातील पाणी झिरपून या विहिरीत येते. विहिरीतून उपसा करताना पाणी शुद्ध केले जाते. हे पाणी होटगी व यत्नाळ या गावांतील लोक वापरतात. या पाण्याच्या वापरामुळे उलटी, जुलाब यासारखे त्रास होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. प्रक्रिया न केलेले बहुतांश पाणी नाल्यामार्गे सीना नदीत जाते. यामुळे नदीसोबतच होटगी तलावही प्रदूषित झाला आहे.शहरातील तीन प्रक्रिया केंद्रांमध्ये क्षमतेइतके सांडपाणी येत नाही. भविष्याचा विचार करून जास्त क्षमतेचे केंद्र उभारले असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड यांनी सांगितले.तहान कोणाची भागते? सीना नदीवर अर्जुनसोंड, पाकणी, तिºहे, तेलगाव, नंदूर, वडकबाळ, बंदलगी, कोसेगाव व आष्टी, असे नऊ बंधारे होते. या बंधाºयांवरील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या गावांतील लोकांची तहान भागविली जात होती. यातील आठ पाणीपुरवठा योजना बंद झाल्या असून, यावर ३३ गावे अवलंबून होती. शहराच्या वरच्या बाजूला असल्यामुळे याठिकाणी नदी प्रदूषित नाही. त्यामुळे सध्या फक्त आष्टी बंधाºयावरील पाणीपुरवठा योजना सुरू आहे. मोहोळ नगर परिषदेकडून शहरासाठी हे पाणी पुरविण्यात येते.सोलापूर शहरातील सांडपाणी सीना नदीत सोडल्यामुळे या नदीवरील आष्टी येथील पाणीपुरवठा वगळता सर्व योजना बंद झाल्या आहेत. आष्टी येथील बंधारा हा शहराच्या वरच्या बाजूला असल्यामुळे येथील पाणी प्रदूषित नाही. नदीकाठी असणाºया विहिरी व कूपनलिकेतील पाणीदेखील दूषित झाले आहे. असेच होत राहिले, तर या परिसरातील जमीन नापीक होण्याचा धोका आहे.-विलास कोकरे, अध्यक्ष,सीना नदी संघर्ष समितीफळशेती करता येत नाहीसीना नदीतील पाणी प्रदूषित असल्यामुळे त्यावर फळशेती करता येत नाही. दूषित पाण्यामुळे फळांची झाडे जळून जातात किंवा फळांची वाढ व्यवस्थित होत नाही. यामुळे आम्ही ऊस, ज्वारी, गहू हीच पिके घेतो. फक्त २६५ या प्रकारचाच ऊस या पाण्यात तग धरू शकतो. या उसामधून साखरेचा उतारा व्यवस्थित होत नसल्याने कारखान्यांकडून खूप कमी भावात या उसाची खरेदी होते. -अशफाक शेख,शेतकरी, वडकबाळ, सोलापूर