शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

तहान भागविणारी सीना नदी सांडपाण्यामुळे प्रदूषित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 05:32 IST

३० गावांतील पाणीपुरवठा योजना बंद : परिसरातील पाणीही दूषित; होटगी तलाव प्रदूषणाच्या विळख्यात, गावकऱ्यांचे आरोग्य बिघडले

शीतलकुमार कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : एकेकाळी शेतीसाठी वरदान असणारी, नागरिकांची तहान भागवणारी सीना नदी आज शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. नदीच्या पाण्याची दुर्गंधी येत असून, या परिसरातील विहिरी व कूपनलिकेतील पाणीदेखील दूषित झाले आहे. त्यामुळे नदीवर अवलंबून असलेल्या साधारण ३० गावांतील पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आल्या असून, पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.सोलापूर शहराला दररोज १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यातून सुमारे ८० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. शहरात एकूण तीन ठिकाणांहून सुमारे ४० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. शिवाय प्रक्रिया न केलेले ४० दशलक्ष लिटर पाण्यापैकी काही पाणी हे शेतीसाठी, तर काही शहरालगतच्या होटगी तलावात सोडले जाते. हे पाणी एमआयडीसी परिसरातून येत असल्याने यात मोठ्या प्रमाणात रसायन असते. या पाण्यामुळे गावकऱ्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. होटगी तलावाजवळ एक विहीर असून, या तलावातील पाणी झिरपून या विहिरीत येते. विहिरीतून उपसा करताना पाणी शुद्ध केले जाते. हे पाणी होटगी व यत्नाळ या गावांतील लोक वापरतात. या पाण्याच्या वापरामुळे उलटी, जुलाब यासारखे त्रास होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. प्रक्रिया न केलेले बहुतांश पाणी नाल्यामार्गे सीना नदीत जाते. यामुळे नदीसोबतच होटगी तलावही प्रदूषित झाला आहे.शहरातील तीन प्रक्रिया केंद्रांमध्ये क्षमतेइतके सांडपाणी येत नाही. भविष्याचा विचार करून जास्त क्षमतेचे केंद्र उभारले असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड यांनी सांगितले.तहान कोणाची भागते? सीना नदीवर अर्जुनसोंड, पाकणी, तिºहे, तेलगाव, नंदूर, वडकबाळ, बंदलगी, कोसेगाव व आष्टी, असे नऊ बंधारे होते. या बंधाºयांवरील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या गावांतील लोकांची तहान भागविली जात होती. यातील आठ पाणीपुरवठा योजना बंद झाल्या असून, यावर ३३ गावे अवलंबून होती. शहराच्या वरच्या बाजूला असल्यामुळे याठिकाणी नदी प्रदूषित नाही. त्यामुळे सध्या फक्त आष्टी बंधाºयावरील पाणीपुरवठा योजना सुरू आहे. मोहोळ नगर परिषदेकडून शहरासाठी हे पाणी पुरविण्यात येते.सोलापूर शहरातील सांडपाणी सीना नदीत सोडल्यामुळे या नदीवरील आष्टी येथील पाणीपुरवठा वगळता सर्व योजना बंद झाल्या आहेत. आष्टी येथील बंधारा हा शहराच्या वरच्या बाजूला असल्यामुळे येथील पाणी प्रदूषित नाही. नदीकाठी असणाºया विहिरी व कूपनलिकेतील पाणीदेखील दूषित झाले आहे. असेच होत राहिले, तर या परिसरातील जमीन नापीक होण्याचा धोका आहे.-विलास कोकरे, अध्यक्ष,सीना नदी संघर्ष समितीफळशेती करता येत नाहीसीना नदीतील पाणी प्रदूषित असल्यामुळे त्यावर फळशेती करता येत नाही. दूषित पाण्यामुळे फळांची झाडे जळून जातात किंवा फळांची वाढ व्यवस्थित होत नाही. यामुळे आम्ही ऊस, ज्वारी, गहू हीच पिके घेतो. फक्त २६५ या प्रकारचाच ऊस या पाण्यात तग धरू शकतो. या उसामधून साखरेचा उतारा व्यवस्थित होत नसल्याने कारखान्यांकडून खूप कमी भावात या उसाची खरेदी होते. -अशफाक शेख,शेतकरी, वडकबाळ, सोलापूर