शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

पावसाळी अधिवेशनात पाणीप्रश्न पेटणार !

By admin | Updated: June 2, 2014 00:35 IST

सांगोल्याच्या शेतीचा प्रश्न; उपोषणासाठी दोन आमदार मुंबईला रवाना

सांगोला : सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न घेऊन आ. गणपतराव देशमुख व आ. दीपक साळुंखे दोन्ही लोकप्रतिनिधी विधानभवनासमोर ३ जूनपासून बेमुदत उपोषणास बसण्याच्या तयारीने रविवारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामुळे आता पावसाळी अधिवेशनात सांगोल्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करून शासनाकडे पाठपुरावा केला आहे, परंतु आजपावतो तालुक्यास टेंभू व म्हैसाळचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, टेंभूचे पाणी बुद्धेहाळ तलावात व म्हैसाळचे पाणी पारे तालुक्यात आणण्यासाठी अंतिम टप्प्यातील जनचळवळीची भूमिका निश्चित करण्यासाठी शनिवार दि. १० मे रोजी आ.गणपतराव देशमुख व आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाणी प्रश्नावरची भूमिका मांडली होती. पत्रकार परिषदेत आ.देशमुख व आ.साळुंखे पाटील यांनी टेंभू व म्हैसाळच्या पाण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा व आंदोलन करुनही शासन तालुक्यास पाणी देण्यास अपयशी ठरले आहे. दरम्यान, गेल्या २१ दिवसानंतरही शासनाने टेंभू-म्हैसाळच्या पाण्यावर कसलाच निर्णय घेतला नाही. याच्या विरोधात आज रविवार आ.गणपतराव देशमुख, आ.दीपक साळुंखे पाटील मुंबईला रवाना झाले आहेत.

----------------------------

- निर्णय नसल्याने संताप

शासनाने ३१ मे २०१४ पूर्वी दोन्ही योजनेचे पाणी तालुक्यास न सोडल्यास मंगळवार दि. ३ जून २०१४ पासून पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधानभवनासमोर टेंभू-म्हैसाळ योजनेचा पाणी प्रश्न निकालात काढावा या मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.

-----------------------------

शासनाचे लक्ष वेधणार

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार २ जूनपासून सुरू होत आहे. शासनाचे लक्ष वेधून सांगोल्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.