शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आक्रोश दाखवत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:16 IST

बार्शी : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारची आजची भूमिका ही मराठ्यांच्या बाजूने नसल्याचा आरोप करत जोपर्यंत आपण लढत ...

बार्शी : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारची आजची भूमिका ही मराठ्यांच्या बाजूने नसल्याचा आरोप करत जोपर्यंत आपण लढत नाही, आक्रोश दाखवत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. त्यासाठी परत एकदा ४ जुलैला मराठा आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माथाडी कामगार नेते, माजी आ. नरेंद्र पाटील यांनी केले.

४ जुलै रोजी निघणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी युवा उद्योजक दादासाहेब गायकवाड यांच्या निवासस्थानी पाटील यांनी भेट दिली.

पाटील म्हणाले, आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्व. अण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ ला आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात राज्याच्या विविध भागांतून नागरिक उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी राजकर्त्यांची त्यावेळीही भूमिका नव्हती, म्हणून अण्णासाहेबांनी फार कठोर निर्णय घेऊन २३ मार्च रोजी स्वत:चे बलिदान दिले. त्यानंतर मराठ्यांना न्याय मिळावा यासाठी आमच्या कित्येक संघटना, तालुक्यात आणि जिल्ह्यात कार्यरत राहिल्या.

त्यानंतर कोपर्डी घटनेनंतर मराठा समाज एकवटला आणि ५८ मूक मोर्चे काढले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वारंवार मराठा क्रांती मोर्चाच्या वेगवेगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालावे, अशी मागणी केली. समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना याच्याबद्दलचा अनुभव नव्हता म्हणून एकनाथ शिंदेंना जबाबदारी द्यावी हे सांगितल्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. ९ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये याला स्थगिती मिळाली. ५ मेला आरक्षण रद्द करण्यात आले.

---

२,१०० मुलांचे भवितव्य अंधारात

यावेळी नरेंद्र पाटील यांनी एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुद्दा छेडला. आरक्षणामुळे चांगला फायदा असा झाला होता की, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुले याठिकाणी एमपीएससी परीक्षेत भाग घेऊन पास झाले आणि कामाला लागले; परंतु महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये ज्या एमपीएससीच्या परीक्षा झाल्या. त्याचे निकाल आल्यानंतर कामावर जाण्यासाठी त्यांना पत्र दिले गेले नाही. पर्यायी सप्टेंबर महिन्यानंतर त्या मुलांना नोकरी मिळाली नाही आणि आता आरक्षणही रद्द झाले आहे. एमपीएससीच्या माध्यमातून २,१०० मुलांचे भवितव्य अजूनही अंधारात असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

--

३० जून रोजी बार्शीत बैठक

आक्रोश मोर्चाच्या तयारीसाठी बार्शीत ३० जून रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला व ४ जुलैच्या सोलापूर येथील मोर्चाला मराठा समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

----

फोटो : २७ नरेंद्र पाटील

४ जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बार्शीत राजेंद्र राऊत यांच्याशी चर्चा करताना आमदार नरेंद्र पाटील.