शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उद्धवसेनेनंतर आता मनसेनेही टाकला 'कॅश बॉम्ब'; PWD खात्यात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
2
"रायगडचं चॅलेंज छ.संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं" दानवेंच्या 'कॅश बॉम्ब'वर गोगावलेंची प्रतिक्रिया
3
आता मेड इन इंडिया चिप्स जगभरात धुरळा उडवणार; इंटेल आणि टाटा यांची हा‍तमिळवणी, प्लॅन काय?
4
एव्हिएशन क्षेत्रात मोठी मागणी! कोणत्या एअरलाइनकडे किती पायलट? संसदेत आकडेवारी सादर
5
...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)
6
तब्बल ९०० वर्ष जुनं शिव मंदिर का बनलं थायलंड अन् कंबोडियातील युद्धाचं कारण? पंतप्रधानांना सोडावी लागली खुर्ची
7
शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक?
8
Mahayuti: भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."
9
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला IMFने पुन्हा दिले अब्जावंधीचे कर्ज! अटी-नियमही केले आणखी कडक 
11
Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण, निफ्टी १०० तर सेन्सेक्स ३०० अंकानी घसरला; 'हे' शेअर्स आपटले
12
शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
13
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाइन्सच्या जखमेवर मीठ, सरकार उचलणार कठोर पाऊल!
14
सरकारी नोकरी लागताच तो प्रेम विसरला, प्रेयसीला दगा दिला; चिडलेल्या तरुणीने चांगलाच इंगा दाखवला!
15
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
16
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
17
Nightlife: नाइट लाइफचे धिंडवडे; गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेचे देशात पडसाद उमटले
18
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
19
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
20
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचा वाद निर्माण करणे हा ट्रेंड नाही - मधूर भांडारकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 16:34 IST

वाद निर्माण करणे हा आपला ट्रेंड नसून वास्तव मांडण्याचा आपला प्रयत्न असतो असं दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी स्पष्ट केलं आहे

सोलापूर - एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावरून वाद निर्माण करायचा आणि त्यावर चर्चा घडवायची असा ट्रेंड असल्याची टीका होत असते. असे वाद निर्माण करणे हा आपला ट्रेंड नसून वास्तव मांडण्याचा आपला प्रयत्न असतो. मात्र त्या वास्तवाला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला की वादाची परिस्थिती निर्माण होते, असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केले.

प्रिसिजनच्या वतीने सोलापुरात आयोजित दुस-या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आले असता पत्रकारांशी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी समाजात अनेक विषय आहेत. मात्र त्यांचा शोध घ्यावा लागतो. चांदणी बार, इंदू सरकार, पेज थ्री, हिरोइन यासारखे विषय अशा घटनांमधूनच आलेले आहेत. समाजातील सत्यता दाखविण्यासाठी मी जोखीम घेतो. म्हणूनच माझे चित्रपट आरसा असतात, त्यामुळे प्रतिबिंबित होणारा विषय संबंधितांना अडचणीचा ठरतो. 

इंदू सरकारवर झालेल्या टीकेचा उल्लेख करून ते म्हणाले, या चित्रपटात आपण आणीबाणी दाखविली. प्रत्यक्षात अनेक पुस्तकांमधून, वृत्तपत्रातून या विषयावर लिहून आले आहे. त्यावर डॉक्युमेंट्री निघाल्या आहेत. मी तोच विषय चित्रपटातून मांडला असता बराच विरोध झाला. काँग्रेसकडून फोन आले. धमक्या मिळाल्या. अन्यत्र लिहून आले असताना चित्रपटालाच विरोध का ?  

असे प्रसंग आले की बदल करावे लागतात. चित्रपटाच्या नावात,गाण्यातील शब्दात बदल करून प्रसंगी चित्रपटातही बदल करावे लागतात. त्यामुळे मुळ कलाकृती हरविण्यचा धोका असतो, याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आपली कलाकृती जीवंत असावी असा आपला नेहमीच प्रयत्न असतो. आयुष्यात कधीही कॅमेºयासमोर न आलेली माणसे माझ्या चित्रपटात असतात. मी थेट फुटपाथवरची माणसे कॅमेºयासमोर उभी करतो, त्यामुळे आपली कलाकृती जीवंत वाटते. डायरेक्टर हा कलावंताला त्याच्या नजरेतून बघत असतो. सोलापुरातील अतुल कुलकर्णी याला चित्रपटात भूमिका देताना माझ्या डोळ्यासमोर अचानकपणे पोतया सावंत आला. हाच आपल्या चित्रपटातील पोतया सावंत असे ठरवून त्याच्यात तो ऊतरविला.

नव्या कलावंतांना संदेश देताना ते म्हणाले, या क्षेत्रात संघर्ष भरपूर आहे. त्याची तयारी ठेवायला हवी. अनेक नवनवे चेहरे येतात आणि नंतरच्या काळात गायबही होतात. ते जातात कुठे, याचा शोध या क्षेत्रात येऊ पहाणाºया पिढीने घ्यायला हवा. नव्या कलावंतांनी स्थिर राहावे, आधी त्यांनी आपल्या पदवीच्या शिक्षणावर भर द्यावा, त्यानंतरच या क्षेत्रातील करिअरचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी प्रा. समर नखाते, मनोज भागवत, प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Madhur Bhandarkarमधुर भांडारकर