शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तांबवे ग्रामस्थांनी घेतला १३ दिवसांऐवजी पाच दिवस दुखवटा पाळण्याचा निर्णय

By दिपक दुपारगुडे | Updated: April 21, 2023 14:32 IST

येणाऱ्या ग्रामसभेत ठराव पारित करण्यात येणार

दीपक दुपारगुडे, सोलापूर: तांबवे (टें) (ता. माढा) गावातील माणिक कोंडिबा खटके-पाटील यांच्या निधनानंतर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत पाच दिवसांचे सुतक व दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण गावानेच आता गावातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहा किंवा तेरा दिवसांचा दुखवटा न पाळता फक्त पाच दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या ग्रामसभेत ठरावही पारित करण्यात येणार आहे.

१५ एप्रिल रोजी माणिक कोंडिंबा खटके-पाटील यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली व नातवंड असा परिवार आहे. तांबवे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके- पाटील यांचे ते चुलते तर नितीन खटके-पाटील यांचे आजोबा होत. १७ एप्रिल रोजी तिसऱ्या दिवसाचा अर्थात सावडण्याचा विधी पार पडला. यावेळी कै. माणिक कोंडिबा खटके-पाटील यांच्या कुटुंबीयांनी व नागनाथ खटके-पाटील यांनी दहा दिवसांऐवजी पाच दिवसांचे सुतक अथवा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. यानंतर तांबवे गावातील सर्व प्रमुख मंडळींनी एकत्रित येऊन यापुढे गावातील कोणत्याही कुटुंबातील व्यक्ती दुर्दैवाने मयत झाल्यास दहाव्या दिवशीच्या विधीचा किंवा सुतकाचा कालावधी कमी करून पाच दिवसांचा करण्याचे ठरले आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत