शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

तांबवे ग्रामस्थांनी घेतला १३ दिवसांऐवजी पाच दिवस दुखवटा पाळण्याचा निर्णय

By दिपक दुपारगुडे | Updated: April 21, 2023 14:32 IST

येणाऱ्या ग्रामसभेत ठराव पारित करण्यात येणार

दीपक दुपारगुडे, सोलापूर: तांबवे (टें) (ता. माढा) गावातील माणिक कोंडिबा खटके-पाटील यांच्या निधनानंतर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत पाच दिवसांचे सुतक व दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण गावानेच आता गावातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहा किंवा तेरा दिवसांचा दुखवटा न पाळता फक्त पाच दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या ग्रामसभेत ठरावही पारित करण्यात येणार आहे.

१५ एप्रिल रोजी माणिक कोंडिंबा खटके-पाटील यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली व नातवंड असा परिवार आहे. तांबवे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके- पाटील यांचे ते चुलते तर नितीन खटके-पाटील यांचे आजोबा होत. १७ एप्रिल रोजी तिसऱ्या दिवसाचा अर्थात सावडण्याचा विधी पार पडला. यावेळी कै. माणिक कोंडिबा खटके-पाटील यांच्या कुटुंबीयांनी व नागनाथ खटके-पाटील यांनी दहा दिवसांऐवजी पाच दिवसांचे सुतक अथवा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. यानंतर तांबवे गावातील सर्व प्रमुख मंडळींनी एकत्रित येऊन यापुढे गावातील कोणत्याही कुटुंबातील व्यक्ती दुर्दैवाने मयत झाल्यास दहाव्या दिवशीच्या विधीचा किंवा सुतकाचा कालावधी कमी करून पाच दिवसांचा करण्याचे ठरले आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत